शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

‘खाकी’त महिला आठ टक्केच

By admin | Updated: March 8, 2016 09:34 IST

शासकीय सेवा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सबलीकरणाचे वारे जोरात वाहत असताना समाजातील महत्त्वाचा घटक असलेले पोलीस दल मात्र, त्याबाबत दुर्लक्षित राहिले आहे.

जमीर काझी,  मुंबईशासकीय सेवा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सबलीकरणाचे वारे जोरात वाहत असताना समाजातील महत्त्वाचा घटक असलेले पोलीस दल मात्र, त्याबाबत दुर्लक्षित राहिले आहे. बहुतांश सरकारी नोकऱ्यांमध्ये तरुणींचा सहभाग झपाट्याने वाढत असताना, ‘खाकी वर्दी’मधील महिलांचे प्रमाण जेमतेम आठ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे. महाराष्ट्रातील २ लाख ६ हजार ९६९ पोलिसांच्या फौजफाट्यात ‘सावित्रीं’ची संख्या जेमतेम २५ हजार ३११ इतकी आहे. विशेष म्हणजे, महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्याशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण ६० टक्क्यांवर असताना काही अपवाद वगळता, या प्रकरणाचा तपास पुरुष मंडळींकडूनच केला जातो. पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के जागेची तरतूद असली, तरी हे प्रमाण आतापर्यंतच्या कोणत्याच भरतीत भरले गेलेले नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यासाठी गृहविभागाकडून कोणतेही विशेष प्रयत्न केले गेलेले नाहीत. राज्यात शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्व विभागांत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत राहिली आहे. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये त्यांच्यासाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्याने, सर्वत्र महिलांचा बोलबाला दिसून येत आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने, अन्य खात्यातील भरतीवेळी तरुणांबरोबरच उमेदवार तरुणींची संख्या जागांच्या तिप्पट, चौपटीने असते. खाकी वर्दी मात्र, त्यासाठी अपवाद आहे. केवळ कॉन्स्टेबलच नव्हे, तर स्पर्धा परीक्षांद्वारे निवडल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्येही महिलांचे प्रमाण नगण्य आहे. यूपीएससी व एमपीएससीला बसणाऱ्या तरुणींची संख्या वाढत असली, तरी त्या पोलीस सेवेपेक्षा अन्य नागरी सेवेला प्राधान्य देतात. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांची वानवा जाणवत आहे. राज्य पोलीस दलात सध्या मीरा बोरवणकर या एकमेव महिला महासंचालक पदावर (विधि व तंत्रज्ञान) कार्यरत आहेत. रेल्वे संरक्षण दलामध्ये प्रतिनियुक्तीसाठी त्या इच्छुक असल्या, तरी त्याबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.त्यांच्यानंतर रश्मी शुक्ला व प्रज्ञा सरवदे या ज्येष्ठ अधिकारी असून, अनुक्रमे राज्य गुप्त वार्ताच्या आयुक्त व सिडकोमध्ये दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर, अर्चना त्यागी या मुख्यालयात विशेष महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून कार्यरत आहेत. शुक्ला यांचे नाव पुणे आयुक्त पदासाठी, तर त्यागी यांचे मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेसाठी चर्चेत आहे. मात्र, अन्य मातब्बर अधिकारीही त्यासाठी इच्छुक असल्याने, त्यांची वर्णी लागण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. पोलीस दलात आजमितीला महासंचालक दर्जाच्या एक, अप्पर महासंचालक पदावर (एडीजी) दोन व विशेष महानिरीक्षक (आयजी) पदावर एक महिला कार्यरत आहे. उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदावर एकही महिला नाही, तर डीसीपी म्हणून २९ तर उपअधीक्षक/सहायक आयुक्त दर्जाच्या ३४ महिला अधिकारी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. तर निरीक्षक व सहायक निरीक्षक पदी अनुक्रमे २२९ व ३८६ इतक्या महिला आहेत. त्यापैकी मोजक्या जणींचा अपवाद वगळता उर्वरितांची नेमणूक कमी महत्त्वाच्या किंवा मुख्यालय, नियंत्रण कक्ष अशा ठिकाणीच आहे. > ३१ जानेवारी २०१६ पर्यंतचे पोलीस दलातील महिलांचे प्रमाण पदसंख्यामहासंचालक१अप्पर महासंचालक२विशेष महानिरीक्षक१उपमहानिरीक्षक०अधीक्षक/अ. अधीक्षक२९उपअधीक्षक/ एसीपी ३४पोलीस निरीक्षक२२९सहायक निरीक्षक३८६उपनिरीक्षक१३०२सहायक फौजदार२५२हवालदार१०५८नाईक३८१६कॉन्स्टेबल१८,२६५एकूण२५,३११