शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील महिला, बालकांना गंभीर आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 06:15 IST

गर्भपाताच्या प्रमाणात वाढ, राष्टÑवादीची कार्यवाहीसाठी महिला आयोगाकडे मागणी

मुंबई : दुष्काळी भागातील महिलांना पाणी भरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले; शिवाय काही महिलांचा मृत्यूही झाला आहे. त्यांना गर्भपात, कंबरदुखीसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याची जबाबदारी राज्य सरकारची असून त्यांना कार्यवाही करण्यासाठी तातडीने सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी केली आहे.

महिला आयोगाकडे शिष्टमंडळासह सचिव मंजुषा मोळवणे यांनी हे मागण्यांचे निवेदन दिले. तसेच अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विषयाची दाहकता निदर्शनास आणली. चित्रा वाघ यांनी नुकत्याच सोलापूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामध्ये रोजगाराबाबतच्या सर्व समस्या, प्रश्न वाघ यांनी आयोगासमोर मांडल्या. तीनही जिल्ह्यांतील वास्तव भीषण आहे. स्वच्छ पाणी, टॉयलेट, त्यांच्या मुलांना अन्न, त्यांच्या शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या यांना अनुदान देण्याची त्यांची रास्त अशी मागणी आहे. सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेंतर्गत काम दिले जात आहे असे सांगितले जात आहे; परंतु त्याची माहिती चारा छावण्यांमध्ये दिली जात नाही. ग्रामसेवकांच्या माध्यमातून ती गावागावांत देण्याची गरज आहे. दुष्काळाची भीषणता इतकी आहे की, माणसांनी जगायचे कसे आणि जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न असल्याचे वाघ यांनी सांगितले.