शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

दुष्काळी भागातील महिला, बालकांना गंभीर आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 06:15 IST

गर्भपाताच्या प्रमाणात वाढ, राष्टÑवादीची कार्यवाहीसाठी महिला आयोगाकडे मागणी

मुंबई : दुष्काळी भागातील महिलांना पाणी भरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले; शिवाय काही महिलांचा मृत्यूही झाला आहे. त्यांना गर्भपात, कंबरदुखीसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याची जबाबदारी राज्य सरकारची असून त्यांना कार्यवाही करण्यासाठी तातडीने सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी केली आहे.

महिला आयोगाकडे शिष्टमंडळासह सचिव मंजुषा मोळवणे यांनी हे मागण्यांचे निवेदन दिले. तसेच अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विषयाची दाहकता निदर्शनास आणली. चित्रा वाघ यांनी नुकत्याच सोलापूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामध्ये रोजगाराबाबतच्या सर्व समस्या, प्रश्न वाघ यांनी आयोगासमोर मांडल्या. तीनही जिल्ह्यांतील वास्तव भीषण आहे. स्वच्छ पाणी, टॉयलेट, त्यांच्या मुलांना अन्न, त्यांच्या शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या यांना अनुदान देण्याची त्यांची रास्त अशी मागणी आहे. सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेंतर्गत काम दिले जात आहे असे सांगितले जात आहे; परंतु त्याची माहिती चारा छावण्यांमध्ये दिली जात नाही. ग्रामसेवकांच्या माध्यमातून ती गावागावांत देण्याची गरज आहे. दुष्काळाची भीषणता इतकी आहे की, माणसांनी जगायचे कसे आणि जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न असल्याचे वाघ यांनी सांगितले.