शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बँकेतून पैसे मिळत नसल्याच्या विवंचनेतून महिलेची आत्महत्या

By admin | Updated: January 5, 2017 21:39 IST

कलमाडी, ता.नंदुरबार येथील महिलेने मुलाच्या लग्नासाठी बडोदा बँकेच्या खात्यातून पैसे मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 5 - कलमाडी, ता.नंदुरबार येथील महिलेने मुलाच्या लग्नासाठी बडोदा बँकेच्या खात्यातून पैसे मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. दरम्यान, बडोदा बँकेच्या व्यवस्थापकांनी या आरोपाचे खंडन केले आहे. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कलमाडी येथील मालुबाई मोतिलाल पाटील (५५) या महिलेने गावालगतच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सकाळी ही बाब निदर्शनास आली. मालुबाई पाटील यांच्या मोठ्या मुलाचे लग्न ठरले होते. त्यासाठी पाटील कुटुंबाला पैशांची अडचण होती. मोतिलाल पाटील यांचे बडोदा बँकेच्या नंदुरबार शाखेत बचत खाते आहे. त्या खात्यातून पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केली. जिल्हा रुग्णालयात देखील नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक शिवाजी गावीत, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, शहरचे वाघमारे यांनी नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर पाच जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. तेथे कैफियत मांडण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी नातेवाईकांची समजूत घातली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याशीही बोलणे करून दिले. रावल यांनी संबधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नातेवाईकांचे समाधान झाल्यानंतर सायंकाळी उशीरा मालुबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत भूता पुंडलि्क पाटील यांनी तालुका पोलिसात खबर दिल्याने नोंद करण्यात आली आहे.