शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पाऊस, जंगल अन् झाडाझुडपांमध्ये धनगरवाड्यातील महिलेनं दिला चिमुकलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 00:03 IST

धनगरवाड्यापर्यंत रस्त्याची सुविधा नाही. म्हणून या गर्भवती महिलेला डोलीवरून आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यात येत होते

ठळक मुद्देभूदरगड तहसिल परिसरात येणाऱ्या धनगरवाडा येथे जवळपास २०० जणांची वस्ती आहेमात्र या वस्तीपर्यंत जाण्यासाठी ३ किमी चालत जावं लागतं. राधानगरी जंगलाला लागून असलेल्या या रस्त्याने एकटं जाणं खूप धोकादायक आहे.

कोल्हापूर – २१ व्या शतकात भारत देश विकसित देशांसोबत स्पर्धा करत आहे तर दुसरीकडे आजही भारतात असा भाग आहे ज्याठिकाणी मुलभूत सुविधांचाही अभाव पाहायला मिळतो. याठिकाणी रस्ते, वीज पोहचणंही दुर्गम आहे. त्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोल्हापूर जिल्ह्यातील वासनोली येथे धनगरवाड्यात रस्ते नसल्यानं एका गर्भवती महिलेला डोलीवरून डिलीव्हरीसाठी घेऊन जावं लागत होतं.

धनगरवाड्यापर्यंत रस्त्याची सुविधा नाही. म्हणून या गर्भवती महिलेला डोलीवरून आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यात येत होते मात्र वाटेतच या महिलेने मुलीला जन्म दिला. महिला आणि नवजात बालिकेला गारगोटीच्या ग्रामीण हॉस्पिटलला पोहचवण्यात आले. या दोघींचीही तब्येत सुखरूप आहे. भूदरगड तहसिल परिसरात येणाऱ्या धनगरवाडा येथे जवळपास २०० जणांची वस्ती आहे. मात्र या वस्तीपर्यंत जाण्यासाठी ३ किमी चालत जावं लागतं. सतत पडणाऱ्या पावसामुळे या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यात चिखल साचला आहे.

शुक्रवारी वस्तीत राहणाऱ्या २३ वर्षीय संगीता फटकारे यांना प्रसुती वेदना झाल्यानंतर घरच्यांनी आशासेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना संपर्क साधला. राधानगरी जंगलाला लागून असलेल्या या रस्त्याने एकटं जाणं खूप धोकादायक आहे. आशासेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्या मुसळधार पावसातही याच रस्त्याने धनगरवाड्यात पोहचल्या. संगीताची डिलीव्हरी तारीख २ जुलै सांगण्यात आली होती. पण १५ दिवस आधीच संगीताच्या पोटात दुखू लागले.

धनगरवाड्यापर्यंत जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही. त्यामुळे याठिकाणी रुग्णवाहिका पोहचणं दूरच राहिलं. येथील काही गावकऱ्यांनी संगीताला डोलीत बसवून पक्क्या रस्त्यापर्यंत नेत होते. तेव्हा वाटेतच संगीताला वेदना असहाय्य झाल्या. संगीताची अवस्था पाहून आशासेविकांनी वाटेतच डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतला. महिलेने घरातून डोलीत बसवून नेत असतानाच तिची डिलीव्हरी झाली. तिने लहान चिमुकलीला जन्म दिला असं आरोग्य अधिकारी डॉ. सचिन यत्नालकर यांनी सांगितले.

या घटनेने आपल्या मनात असंख्य प्रश्न उभे राहतील. जर एका महिलेला रस्त्यासारखी मुलभूत सुविधा नसल्याने अशाप्रकारे संकटाचा सामना करावा लागला असेल तर या क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यायला हवं. मतं मागताना विकासाचे खूप मोठमोठे आश्वासन दिली जातात परंतु निकाल लागल्यानंतर कोणी फिरकतही नाही असं स्थानिक लोक म्हणतात. रस्ते, पाणी आणि सार्वजनिक आरोग्याचा अभाव असलेल्या या क्षेत्रात दोन वेळचं कमवण्यासाठीही लोकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र