शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

मुसळधार पाऊस, जंगल अन् झाडाझुडपांमध्ये धनगरवाड्यातील महिलेनं दिला चिमुकलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 00:03 IST

धनगरवाड्यापर्यंत रस्त्याची सुविधा नाही. म्हणून या गर्भवती महिलेला डोलीवरून आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यात येत होते

ठळक मुद्देभूदरगड तहसिल परिसरात येणाऱ्या धनगरवाडा येथे जवळपास २०० जणांची वस्ती आहेमात्र या वस्तीपर्यंत जाण्यासाठी ३ किमी चालत जावं लागतं. राधानगरी जंगलाला लागून असलेल्या या रस्त्याने एकटं जाणं खूप धोकादायक आहे.

कोल्हापूर – २१ व्या शतकात भारत देश विकसित देशांसोबत स्पर्धा करत आहे तर दुसरीकडे आजही भारतात असा भाग आहे ज्याठिकाणी मुलभूत सुविधांचाही अभाव पाहायला मिळतो. याठिकाणी रस्ते, वीज पोहचणंही दुर्गम आहे. त्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोल्हापूर जिल्ह्यातील वासनोली येथे धनगरवाड्यात रस्ते नसल्यानं एका गर्भवती महिलेला डोलीवरून डिलीव्हरीसाठी घेऊन जावं लागत होतं.

धनगरवाड्यापर्यंत रस्त्याची सुविधा नाही. म्हणून या गर्भवती महिलेला डोलीवरून आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यात येत होते मात्र वाटेतच या महिलेने मुलीला जन्म दिला. महिला आणि नवजात बालिकेला गारगोटीच्या ग्रामीण हॉस्पिटलला पोहचवण्यात आले. या दोघींचीही तब्येत सुखरूप आहे. भूदरगड तहसिल परिसरात येणाऱ्या धनगरवाडा येथे जवळपास २०० जणांची वस्ती आहे. मात्र या वस्तीपर्यंत जाण्यासाठी ३ किमी चालत जावं लागतं. सतत पडणाऱ्या पावसामुळे या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यात चिखल साचला आहे.

शुक्रवारी वस्तीत राहणाऱ्या २३ वर्षीय संगीता फटकारे यांना प्रसुती वेदना झाल्यानंतर घरच्यांनी आशासेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना संपर्क साधला. राधानगरी जंगलाला लागून असलेल्या या रस्त्याने एकटं जाणं खूप धोकादायक आहे. आशासेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्या मुसळधार पावसातही याच रस्त्याने धनगरवाड्यात पोहचल्या. संगीताची डिलीव्हरी तारीख २ जुलै सांगण्यात आली होती. पण १५ दिवस आधीच संगीताच्या पोटात दुखू लागले.

धनगरवाड्यापर्यंत जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही. त्यामुळे याठिकाणी रुग्णवाहिका पोहचणं दूरच राहिलं. येथील काही गावकऱ्यांनी संगीताला डोलीत बसवून पक्क्या रस्त्यापर्यंत नेत होते. तेव्हा वाटेतच संगीताला वेदना असहाय्य झाल्या. संगीताची अवस्था पाहून आशासेविकांनी वाटेतच डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतला. महिलेने घरातून डोलीत बसवून नेत असतानाच तिची डिलीव्हरी झाली. तिने लहान चिमुकलीला जन्म दिला असं आरोग्य अधिकारी डॉ. सचिन यत्नालकर यांनी सांगितले.

या घटनेने आपल्या मनात असंख्य प्रश्न उभे राहतील. जर एका महिलेला रस्त्यासारखी मुलभूत सुविधा नसल्याने अशाप्रकारे संकटाचा सामना करावा लागला असेल तर या क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यायला हवं. मतं मागताना विकासाचे खूप मोठमोठे आश्वासन दिली जातात परंतु निकाल लागल्यानंतर कोणी फिरकतही नाही असं स्थानिक लोक म्हणतात. रस्ते, पाणी आणि सार्वजनिक आरोग्याचा अभाव असलेल्या या क्षेत्रात दोन वेळचं कमवण्यासाठीही लोकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र