शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

तुमच्या परवानगीशिवाय एकही इंच जमीन घेणार नाही

By admin | Updated: October 8, 2014 23:08 IST

उद्धव ठाकरे : राज्यात शिवशाही अवतरणार असल्याचे केले सूतोवाच

मालवण : पानाची टपरी असो वा चहाचा गाडा असो, यात निरूद्योग मंत्र्याची पार्टनरशीप आली. कोकणी माणसाच्या उरावर बसून कोकणच्या विकासाच्या पोकळ गप्पा मारण्याचे काम सुरू आहे. आता आई तुळजाभवानीच्या कृपेने महाराष्ट्रात शिवशाही अवतारणार आहे. त्यावेळी येथे कोण गुंडागर्दी करतो ते मी पाहतो. एक इंचही जमीन तुमच्या परवानगीशिवाय घेणार नाही आणि जे कोण घेतील त्यांना तुरूंगात डांबीन. माझ्या शिवशाहीत लोकांना आनंदी करेन. माझे सरकार हे तुमचेच सरकार असेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालवण येथे आयोजित जाहीर सभेत केले.शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा टोपीवाला हायस्कूलच्या भव्य पटांगणावर झाली. यावेळी ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी, नारायण राणे यांची थेट नावे न घेता टीका केली.महिषासुराचा राजकीय वध कराकोकणात आल्यानंतर मला घरात आल्यासारखे वाटते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भगवा आणि कोकण हे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांपासून सत्ता केंद्रातील सर्व पदे प्रथम कोकणी माणसाला दिली. यातूनच कोकणची पूर्ण जबाबदारी दिलेली व्यक्ती आपल्याच माणसाला खायला निघाली. यामुळे कोकणी माणसाची आणि शिवसेनेची जोडलेली नाळ तोडण्याचे काम या व्यक्तीने केले. मात्र शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुखांवरील प्रेम दाखवून दिले आहे. आता या महिषासुराचा कायमस्वरूपी राजकीय वध करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.शिवरायांचे तेज जगाला दाखवायुती कायम रहावी ही आमची शेवटपर्यंतची इच्छा होती. २५ वर्षांची मैत्री अधिक घट्ट व्हावी म्हणून माझ्या हातात होते तेवढे मी केले. मात्र दिल्लीतील कोणा एका नेत्याने युतीत बिघाडी केली. आई तुळजाभवानीच्या दारातच हा युती तुटल्याचा मेसेज मिळाला. आईचीच कृपा असेल तर महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल. शिवरायांचे तेज आणि भगव्याची शान अख्ख्या जगाला दाखवून देण्याची संधी शिवसैनिकांना मिळाली आहे. माझ्यासमोर जमलेल्या शिवसेनेच्या वारूळावर पाय ठेवण्याची हिंमत कोण करेल काय? भगव्याची सत्ता महाराष्ट्रात येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही, असे ठाकरे म्हणाले.सिंधुदुर्गच्या प्रश्नांना हातचिपी विमानतळ, तोंडवळी सी-वर्ल्ड, मच्छिमारांचे प्रश्न, सीआरझेड, मायनिंग, गौणखनिज या विषयांना हात घालत सिंधुदुर्गच्या विकासासाठी जनतेच्या इच्छेशिवाय एकही इंच जमीन घेणार नाही किंवा घेऊ देणार नाही. सिंधुदुर्गच्या प्रश्नासाठी वैभव नाईक ढाण्या वाघाप्रमाणे लढत आहे. माझ्या एका वाघासमोर शेळपट काँग्रेसची मंडळी लपून बसत आहेत. कोकणच्या विकासासाठी लोकांतून येणाऱ्या सूचनांमधून विकासाची डॉक्युमेंटरी तयार केली जाईल, असे अभिवचन उद्धव ठाकरे यांनी दिले.राणेंच्या भावनिक आवाहनाला जनता भीक घालणार नाही. माझी शेवटची निवडणूक सांगत फिरणाऱ्यांना जनताच आम्हीच ठरवली तुमची शेवटी निवडणूक आहे, असे सांगतील. मतदारांनी मुंबईच्या पार्सलला माघारी पाठविण्याचे निश्चित केले आहे. गुंडगिरी, दहशत आता संपवून विकासाचे वैभव स्विकारण्यासाठी मतदार उत्सुक आहेत, असेही ठाकरे म्हणाले.भराडी मातेला साकडेमुंबई महानगरपालिका, लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरभरून यश मिळण्यासाठी आंगणेवाडी येथील भराडी मातेला साकडे घातले होते. त्याची नवसफेड शिवसैनिकांनी त्याच उत्साहाने केली होती. आता पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्याचे साकडे उपस्थित शिवसैनिकांना साक्षी ठेऊन यावेळी उद्धव ठाकरे यांनी घातले. यावेळी शिवसैनिकांमधून आई जगदंबा आणि भराडी मातेचा जयघोष करण्यात आला. (प्रतिनिधी)