शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
4
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
5
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
6
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
7
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
8
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
11
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
14
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
15
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
16
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
17
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
18
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
19
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
20
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा

हिवाळी अधिवेशनाची सुरुवात गर्दीविना!

By admin | Updated: December 8, 2015 01:34 IST

एरवी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी यांची गर्दी दिसून येते. कोणाला मंत्र्यांना भेटायचे असते

नागपूर : एरवी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी यांची गर्दी दिसून येते. कोणाला मंत्र्यांना भेटायचे असते, तर कुणाला आमदारांच्या माध्यमातून समस्या मांडायच्या असतात. तर कुणी नुसतेच फोटोसेशन करण्यासाठी येतात. परंतु यंदा मात्र गर्दीची ही परंपरा खंडित झाली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश दिल्यामुळे कामकाजाशी संबंध नसलेल्या बाहेरील व्यक्तींना दुपारी २ पर्यंत प्रवेश नाकारण्यात आला.हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून येणाऱ्या लोकांमुळे अनेकदा परिसरात गर्दी होते व यामुळे कामकाजात अडथळा येतो. विधिमंडळ परिसरात अनावश्यक गर्दी वाढल्यामुळे प्रशासन आणि यंत्रणेवर ताण येतो. यामुळे कामकाजावर दुष्परिणाम होतो. शिवाय वाहतुकीचा खोळंबा होतो. ही बाब लक्षात घेऊन अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश रामराजे नाईक-निंबाळकर व हरिभाऊ बागडे यांनी दिले आहेत.हिवाळी अधिवेशनातील निवास, संरक्षण, स्वच्छता याचा आढावा घेण्यासाठी विधानमंडळामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, नागपूर विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. यावेळी कामकाजाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना दुपारी दोननंतर केवळ दोन तासांसाठीच प्रवेश देण्यात यावा. तसेच केवळ पालकमंत्री व मंत्र्यांच्या शिफारशीवरूनच दिवसभराचा पास देण्यात येईल, अशा सूचना त्यांनी केल्या. यामुळे सोमवारी दरवर्षीच्या तुलनेत कमी गर्दी दिसून आली. दुपारी २ नंतर अनेकांना प्रवेश देण्यात आला. परंतु तोपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज संपले होते. (प्रतिनिधी)शासनच अपंग आहे! - बच्चू कडूविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अभिनव आंदोलन करणारे म्हणून आ. बच्चू कडू ओळखले जातात. या वर्षीच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होताच, पहिल्याच दिवशी त्यांनी एक हात बांधलेल्या स्थितीत विधानभवन परिसरात प्रवेश केला. अपंगांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा सर्व खटाटोप केला. मागील वर्षी याच शासनाने अपंगांच्या मागण्या तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन शासनाने पाळले नाही, त्याचा निषेध म्हणून त्यांनी हात बांधून प्रवेश केला. ‘हे शासनच अपंग असून, या शासनानेच आता बांधून घ्यावे’ असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.