शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

९ महिन्यांत कारवाई करणार !

By admin | Updated: October 24, 2015 03:45 IST

राज्यभरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळे पाडण्यासाठी वर्षभराचा कालावधी मागणाऱ्या राज्य सरकारला फटकारत उच्च न्यायालयाने ही मोहीम नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे

मुंबई : राज्यभरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळे पाडण्यासाठी वर्षभराचा कालावधी मागणाऱ्या राज्य सरकारला फटकारत उच्च न्यायालयाने ही मोहीम नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. तसेच यासंबंधी काढलेल्या शासन निर्णयातही बदल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले.राज्य सरकारने शासन निर्णय काढण्याशिवाय प्रत्यक्षात काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टिस’ या एनजीओने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अभय ओक व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होती. राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सरकारचा २१ आॅक्टोबर २०१५चा शासन निर्णय खंडपीठापुढे सादर केला. या शासन निर्णयामध्ये सरकारने बेकायदेशीर धार्मिक स्थळे पाडण्याचा कार्यक्रम नमूद केला आहे. शासन निर्णयानुसार, २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची नियमित करायची धार्मिक स्थळे येत्या सहा महिन्यांत नियमित करण्यात येतील. तर स्थलांतरित करण्याची धार्मिक स्थळे सहा ते नऊ महिन्यांत हलवण्यात येतील, असे सांगितले.मात्र या शासन निर्णयावर खंडपीठाने आक्षेप घेतला. २९ सप्टेंबर २००९ नंतरची बेकायदेशीर बांधकामे पाडण्यासाठी आत्तापर्यंत राज्य सरकारला खूप वेळ दिला. आता अधिक वेळ मिळणार नाही. बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर तत्काळ कारवाई करण्यास सुरुवात करा आणि हा कार्यक्रम येत्या नऊ महिन्यांत संपवा. शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या कालावधीत सुधारणा करा, असा आदेश दिला.