शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

घटकपक्षांचा बळी देऊन युती वाचवणार?

By admin | Updated: September 23, 2014 16:22 IST

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीतील इतर घटकपक्षांचा बळी जाण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ - युती अभेद्यच राहणार याचा पुनरुच्चार करतानाच मंगळवारी संध्याकाळी घटकपक्षांशी चर्चा करून जागावाटपाचा नवा फॉर्म्युला जाहीर करू असे भाजपा-शिवसेनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांवर हटून बसलेले शिवसेना व भाजपा जागावाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी घटकपक्षांचाच बळी घेतील अशी दाट चिन्हे दिसत आहेत. 

गेल्या २५ वर्षांपासून असलेल्या भाजपा-सेना युतीत सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून वाद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपाने शिवेसेनेकडे विधानसभेच्या जागा वाढवून मागितल्या होत्या मात्र केंद्रात भाजपा तर महाराष्ट्रात शिवसेना हा इतक्या वर्षांपासून असलेला फॉर्म्युला बदलण्यास सेनेने नकार दिला होता. शिवसेनेने दिलेल्या ११९ जागांचा प्रस्ताव भाजपाला अमान्य आहे, मात्र १५१ जागांच्या खाली येण्यास सेनेने नकार दिला आहे. 

यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून भाजप सेना-नेत्यांमध्ये बैठका सुरू असून कोणीही तडजोड करण्यास तयार नसल्याने महायुतीच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र मंगळवारी भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शिवसेना- भाजपा नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत संध्याकाळी घटकपक्षांशी चर्चा करून जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर करू असे स्पष्ट केले. त्यामुळे आता सेना आपल्या जागांमध्ये कोणतीही तडजोड न करता घटकपक्षांच्या जागा भाजपाला देऊन महायुतीचे तिढा सोडवणार असेच चित्र दिसत आहे. शिवसेना १५० , भाजपा १२४ आणि मित्रपक्ष १४ असे जागावाटप असेल असे समजते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत (२००९) घटकपक्षांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. रामदास आठवलेंच्या 'रिपाइं'ने तब्बल ७९ जागा लढवल्या होत्या मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही उलट ७७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. हमखास निवडून येईल असा एकही उमेदवार नसल्याने आठवलेंना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे १० जागा मिळण्याची शक्यता धूसर आहे. विशेषत: सध्याच्या भाजपा-सेनेच्या जागासंघर्षात आठवलेंना दोन ते चार जागा मिळाल्या तरी पुष्कळ अशी स्थिती आहे. तर दुसरा घट पक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने २००९ साली २६ जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना अवघी एकच जागा जिंकता आली. त्यामुळे त्यांचीही बोळवण दोनचार जागांवर झाली तर आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये चांगला जम असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही गेल्या निवडणुकीत लढवलेल्या १४ जागांपैकी अवघ्या एका जागेवर विजय मिळाला होता. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता घटकपक्षांसाठी १० ते १२ जागा सोडून रौप्यमहोत्सवी शिवसेना- भाजपा युती वाचवली जाईल अशीच लक्षणे दिसत आहेत.
 
विधानसभा निवडणूक २००९
 
पक्षलढवलेल्या जागा जिंकलेल्या जागा
रिपाइं७९
राष्ट्रीय समाज पक्ष२६
स्वाभिमानी शेतकरी संघटना१४