शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

Maharashtra Politics: राजकारणात येणार का? समीर वानखेडे यांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “देशाची सेवा...” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 21:33 IST

Maharashtra News: एका कार्यक्रमात बोलताना राजकारणातील प्रवेशाविषयी सूचक विधान केले.

Maharashtra Politics: राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या दाव्यांमुळे आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राजकारणातील प्रवेशाविषयी समीर वानखेडे यांनी सूचक विधान केले आहे. शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. 

शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला समीर वानखेडे आले होते. मुंबईतील शिपवर रेड झाल्यानंतर राजकारण्यांनी आपल्यावर टीका करतात. यातून आमचे खच्चीकरण झाले होते. मात्र, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना धावून आली. तेव्हा आम्हाला वाटले की, आपले मनोधैर्य वाढविणारे कोणीतरी आहे. अशी संघटना पाठीशी उभी राहिल्यानंतर राजकीय लोक जे बोलत होते. त्यावर लोकांचा विश्वास बसला नाही, असे समीर वानखेडे म्हणाले. 

राजकारणात येणार का?

काही नेते सकाळी दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स करायचे. तेव्हा, तुला झोप येते का असे अनेक लोक विचारायचे? तेव्हा मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचो. तेव्हा सर्व भीती निघून जायची. वाटायचे येऊ देत कितीही मंत्री. हे तर १०० आणि २०० किरकोळ आहेत. त्यामुळे तुमचे आदर्श महापुरुष असले पाहिजेत, असे समीर वानखेडे यांनी सांगितले. तसेच यावेळी समीर वानखेडे यांना राजकारणात येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. मला देशाची, भारत मातेची सेवा करायची आहे. मग ते कोणत्याही स्वरूपात असो, असे उत्तर समीर वानखेडे यांनी दिले. यावर, मग राजकारण हाही देश सेवा करण्यासाठी प्लॅटफॉर्म असू शकतो का? असा सवाल करण्यात आला. यावर मात्र समीर वानखेडे यांनी ते काय आता काय सांगता येत नाही. असे म्हणत राजकारणात प्रवेश करण्यावर थेटपणे उत्तर देणे टाळले. 

दरम्यान, माझ्यावर आरोप करणारे राजकारणी आता कुठे आहेत. ते सर्वांना माहिती आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. माझी जात काढली. मात्र, त्यांना काही सापडले नाही. लोकांना काही काम नसते तेव्हा बाष्कळ चर्चा सुरू होते, अशी टीकाही समीर वानखेडे यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेPoliticsराजकारण