शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

PM मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल का? फडणवीसांचा उल्लेख होताच भय्याजी जोशी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Bhaiyyaji Joshi PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. साडेचार तासांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्याचबरोबर दीक्षाभूमीवरही ते गेले. त्यांनी माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजनही केले. मोदींच्या या दौऱ्याबद्दल आरएसएसचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी आनंद व्यक्त केला. माध्यमांकडून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना भय्याजी जोशी म्हणाले, "कालचा कार्यक्रम चांगला झाला. आम्ही आनंदी आहोत. सेवा करण्यात त्यांना आधीपासून आवड आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी अशा कामाला प्रेरणा दिली होती. मला वाटतं की काल त्यांचं इथं येणं आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणं, हे माधव नेत्रालयाची उंची वाढवणार आहे."

हेही वाचा >>"औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक, राजकीय पोळी भाजण्यास..."; राज ठाकरेंची टीका

मोदी आणि आरएसएसमध्ये दुरावा आहे का? 

मोदी आणि संघामध्ये दुरावा असल्याचे म्हटले जात होते? असा प्रश्न भय्याजी जोशी यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "दुरावा वगैरे काही नाहीये. आम्ही हे मानत नाही."

मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संमती लागेल, अशी चर्चा आहे?, असेही त्यांना विचारण्यात आले. 

या प्रश्नाला उत्तर देताना भय्याजी जोशी म्हणाले, "उत्तराधिकाऱ्याचा सध्या प्रश्नच कुठे आहे. संघात जी परंपरा आहे, त्यानुसार होईल. तो निर्णय आरएसएस घेईल", असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून चर्चा होत आहे, असा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. ते म्हणाले, 'याबद्दल मला काही कल्पना नाहीये." 

औरंगजेबाची कबरीबद्दल राज ठाकरेंची भूमिका, भय्याजी जोशी म्हणाले...

औरंगजेबाची कबर ठेवण्यात यावी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मांडली. भय्याजी जोशी म्हणाले, "औरंगजेबाचा विषय विनाकारण उचलून धरण्यात आला आहे. एक आहे की, त्याचा मृत्यू इथे झाला आहे, तर त्याची कबर इथे बनली आहे. ज्यांची श्रद्धा आहे, ते जातील. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाचीही कबर बनवली होती. भारताच्या विविधतेचं आणि उदारतेचं प्रतिक आहे. ती कबर राहिली पाहिजे. ज्याला जावं वाटेल, त्याने जावं", अशी भूमिका भय्याजी जोशी यांनी मांडली. 

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस