शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

PM मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल का? फडणवीसांचा उल्लेख होताच भय्याजी जोशी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Bhaiyyaji Joshi PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. साडेचार तासांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्याचबरोबर दीक्षाभूमीवरही ते गेले. त्यांनी माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजनही केले. मोदींच्या या दौऱ्याबद्दल आरएसएसचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी आनंद व्यक्त केला. माध्यमांकडून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना भय्याजी जोशी म्हणाले, "कालचा कार्यक्रम चांगला झाला. आम्ही आनंदी आहोत. सेवा करण्यात त्यांना आधीपासून आवड आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी अशा कामाला प्रेरणा दिली होती. मला वाटतं की काल त्यांचं इथं येणं आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणं, हे माधव नेत्रालयाची उंची वाढवणार आहे."

हेही वाचा >>"औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक, राजकीय पोळी भाजण्यास..."; राज ठाकरेंची टीका

मोदी आणि आरएसएसमध्ये दुरावा आहे का? 

मोदी आणि संघामध्ये दुरावा असल्याचे म्हटले जात होते? असा प्रश्न भय्याजी जोशी यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "दुरावा वगैरे काही नाहीये. आम्ही हे मानत नाही."

मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संमती लागेल, अशी चर्चा आहे?, असेही त्यांना विचारण्यात आले. 

या प्रश्नाला उत्तर देताना भय्याजी जोशी म्हणाले, "उत्तराधिकाऱ्याचा सध्या प्रश्नच कुठे आहे. संघात जी परंपरा आहे, त्यानुसार होईल. तो निर्णय आरएसएस घेईल", असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून चर्चा होत आहे, असा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. ते म्हणाले, 'याबद्दल मला काही कल्पना नाहीये." 

औरंगजेबाची कबरीबद्दल राज ठाकरेंची भूमिका, भय्याजी जोशी म्हणाले...

औरंगजेबाची कबर ठेवण्यात यावी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मांडली. भय्याजी जोशी म्हणाले, "औरंगजेबाचा विषय विनाकारण उचलून धरण्यात आला आहे. एक आहे की, त्याचा मृत्यू इथे झाला आहे, तर त्याची कबर इथे बनली आहे. ज्यांची श्रद्धा आहे, ते जातील. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाचीही कबर बनवली होती. भारताच्या विविधतेचं आणि उदारतेचं प्रतिक आहे. ती कबर राहिली पाहिजे. ज्याला जावं वाटेल, त्याने जावं", अशी भूमिका भय्याजी जोशी यांनी मांडली. 

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस