शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

PM मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल का? फडणवीसांचा उल्लेख होताच भय्याजी जोशी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Bhaiyyaji Joshi PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. साडेचार तासांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्याचबरोबर दीक्षाभूमीवरही ते गेले. त्यांनी माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजनही केले. मोदींच्या या दौऱ्याबद्दल आरएसएसचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी आनंद व्यक्त केला. माध्यमांकडून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना भय्याजी जोशी म्हणाले, "कालचा कार्यक्रम चांगला झाला. आम्ही आनंदी आहोत. सेवा करण्यात त्यांना आधीपासून आवड आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी अशा कामाला प्रेरणा दिली होती. मला वाटतं की काल त्यांचं इथं येणं आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणं, हे माधव नेत्रालयाची उंची वाढवणार आहे."

हेही वाचा >>"औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक, राजकीय पोळी भाजण्यास..."; राज ठाकरेंची टीका

मोदी आणि आरएसएसमध्ये दुरावा आहे का? 

मोदी आणि संघामध्ये दुरावा असल्याचे म्हटले जात होते? असा प्रश्न भय्याजी जोशी यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "दुरावा वगैरे काही नाहीये. आम्ही हे मानत नाही."

मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संमती लागेल, अशी चर्चा आहे?, असेही त्यांना विचारण्यात आले. 

या प्रश्नाला उत्तर देताना भय्याजी जोशी म्हणाले, "उत्तराधिकाऱ्याचा सध्या प्रश्नच कुठे आहे. संघात जी परंपरा आहे, त्यानुसार होईल. तो निर्णय आरएसएस घेईल", असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून चर्चा होत आहे, असा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. ते म्हणाले, 'याबद्दल मला काही कल्पना नाहीये." 

औरंगजेबाची कबरीबद्दल राज ठाकरेंची भूमिका, भय्याजी जोशी म्हणाले...

औरंगजेबाची कबर ठेवण्यात यावी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मांडली. भय्याजी जोशी म्हणाले, "औरंगजेबाचा विषय विनाकारण उचलून धरण्यात आला आहे. एक आहे की, त्याचा मृत्यू इथे झाला आहे, तर त्याची कबर इथे बनली आहे. ज्यांची श्रद्धा आहे, ते जातील. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाचीही कबर बनवली होती. भारताच्या विविधतेचं आणि उदारतेचं प्रतिक आहे. ती कबर राहिली पाहिजे. ज्याला जावं वाटेल, त्याने जावं", अशी भूमिका भय्याजी जोशी यांनी मांडली. 

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस