शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

रिकाम्या हाती परतणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:11 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यभर घोंगावलेले मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यभर घोंगावलेले मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे. सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मुंबईत राज्यव्यापी मोर्चा निघणार असून, या वेळी रिकाम्या हाती परतणार नसल्याचा निर्धार महामोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केला आहे.सकल मराठा समाजाच्या महामुंबई समितीमधील वीरेंद्र पवार यांनी सांगितले की, मुंबईतील महामोर्चासाठी सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी कंबर कसली आहे. दादरमधील शिवाजी मंदिर येथे महामोर्चाची वॉररूम तयार केली आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींसोबत झालेल्या संपर्कातून महामोर्चाचे सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नेमके किती लोक येतील, याची निश्चित आकडेवारी सांगणे चुकीचे ठरेल. मात्र मुंबई ठप्प पडेल, इतका मराठा समाज या महामोर्चात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.महामोर्चाची रंगीत तालीम म्हणून ६ आॅगस्टला नवी मुंबई आणि रायगडमध्ये दुपारी ३ वाजता बाइक रॅली काढण्यात येणार असल्याचे महामुंबई समितीचे विनोद पोखरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यभरात या आठवड्यात ठिकठिकाणी बाइक रॅली पाहायला मिळतील. मात्र महामोर्चा काढण्यात येणार असल्याने मुंबईत केवळ विभागनिहाय बाइक रॅली निघण्याची शक्यता आहे. तरीही नवी मुंबईतील बाइक रॅलीतून मुंबईच्या महामोर्चाचा अंदाज नक्कीच बांधता येईल.समन्वयक चर्चेस तयार नाही!महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेसाठी केलेल्या आवाहनाला समन्वय समिती अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील बैठक चेंबूरमध्ये रविवारी पार पडली. त्यात ९ आॅगस्ट २०१६पासून राज्यभरात ५८ मोर्चे निघाले असून, समाजाच्या सर्व मागण्या सरकारला माहिती असल्यावर चर्चा झाली. त्यामुळे सरकारने जी काही घोषणा करायची आहे, ती एकतर विधानसभेत करावी किंवा मोर्चाला सामोरे जाऊन करावी, असा समन्वयकांचा होरा आहे.मुंबईतील मोर्चासाठी कोल्हापूर सज्जकोल्हापूर : संपूर्ण महाराष्टÑभर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले, पण निर्णय नाही. आता ‘क्रांतिदिनी, क्रांती घडवू या’, ‘चलो मुंबई’ असा नारा देत सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा मराठा आरक्षणाचा धुरळा उडविण्यासाठी सारे सज्ज झाले. बैठका, रॅलीतून पुन्हा मावळे, रणरागिणी अंग झटकून कामाला लागले आहेत. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून किमान ५० हजार जण उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोर्चातील नियोजनाची सर्वस्वी जबाबदारी ही मावळे व रणरागिणीवर असते. त्यांची नोंदणी सध्या सकल मराठा समाज कार्यालयात केली जात आहे.औरंगाबादला दुचाकी रॅली-१औरंगाबाद : मुंबईत ९ आॅगस्टला काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.२सुमारे दोन कि़मी.पर्यंतच्या परिसरात दुचाकी होत्या. शिवछत्रपती महाविद्यालय येथून शिस्तीमध्ये निघालेली ही रॅली जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे सरकली. क्रांतिचौकात जोरदार घोषणा देतशिस्तीने पैठणगेट मार्गे सिटीचौक ते लेबर कॉलनीपर्यंत रॅली आली. तेथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.३कॅनॉट गार्डनमध्ये राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये कुठेही बेशिस्तपणा नव्हता. स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत केली. मोर्चात सामील होण्यासाठी कॉर्नर बैठका, सोशल मीडियातून एसएमएस पाठविण्याचे नियोजन सुरू आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीने सांगितले.