शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

तिस-या आघाडीसोबत जाणार नाही - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 20:15 IST

देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी आहे.

ठळक मुद्देतिस-या आघाडीसोबत जाणार नाही‘आमदारांची रावटी’ कार्यक्रम राबविणारपूर्वी जातीभेद होता, आता गावभेद निर्माण होतोय

- अनंत जाधव

सावंतवाडी : देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी आहे. त्यामुळे मुद्दे पटत नसल्यामुळे आपण स्वतंत्रपणे लढणार आहे. यासाठी कोणाची मदत घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.आमदार कडू हे एका कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे जात असताना सावंतवाडी येथे ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत रूपेश जाधव, समीर आचरेकर, अजय जाधव, प्रसाद मुळे, रोहन नलावडे आदी उपस्थित होते.शासन कोणाची मागणी नसताना गावात वेगवेगळ््या सोळा योजना राबवित आहे. यात तंटामुक्त, आदर्श, यशवंत ग्राम, हागणदारी मुक्त, श्रमदान अशा या योजना आहेत. या योजना सरकारकडे कोणी मागितल्या होत्या का? मग का सरकार राबवते? सरकारने या सर्व योजना बंद करून एकच योजना राबवावी, ती म्हणजे ‘उद्योगग्राम गाव योजना’. यातून शेतकºयाची आर्थिक समृध्दी होईल. त्यांच्या पिकाला भाव मिळेल, छोटे-छोटे उद्योग उभे राहतील. त्याने गावाची आर्थिक उन्नती होईल. यातून गाव सुखी होईल. मग गावात भांडणे होणार नाहीत. प्रत्येकाच्या घरी शौचालये येतील. यातून आदर्श गावाची निर्मिती होईल. शौचालये आली की हागणदारी मुक्त गाव होण्यास मदत होईल. या सर्व योजना आर्थिक स्थैर्यावर अवलंबून आहेत.त्यामुळे गाव व शहरातील आर्थिक दरी वाढवण्यिापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्या हाताला काम द्या. त्यामुळे गावातील गावभेद दूर होईल, असे मत त्यांनी यावेळी मांडले. आता सध्या गावात घरकुलासाठी दीड लाख, तर शहरात घरकुलसाठी अडीच लाख दिले जातात. मग ही आर्थिक दरी नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.पूर्वी जातीभेद होता, आता गावभेद निर्माण होतोयज्या योजना गावाने मागितल्या नाहीत त्यावर सरकार कोट्यवधी रूपये खर्च करते, पण ज्या सामान्य माणसाला, शेतकरी वर्गाला हव्या त्या योजना गावात राबविल्या जात नाहीत. त्यामुळेच गावात पूर्वी जातीभेद होता आता गावभेद निर्माण होऊ लागला आहे. गाव आणि शहरातील दरी रूंदावत चालली आहे. हे सर्व वेळीच दूर करा आणि गावात ‘उद्योगग्राम’सारख्या योजना आणा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली ‘आमदारांची रावटी’ कार्यक्रम राबविणारमी अंध अपंगासाठी काम करतो, पण सिंधुदुर्गमध्ये आल्यावर अनेक प्रश्न बघितले की या लोकांसाठी कधी कोणी आवाजच उठवला नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे मी भविष्यात ‘आमदारांची रावटी’ असा कार्यक्रम सावंतवाडीतून सुरू करणार आहे. यातून अंध-अपंगांचे प्रश्न प्रत्यक्ष गावात जाऊन सुटले पाहिजे यासाठी झटणार आहे. आॅगस्ट किंवा सप्टेंबरला हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, हळूहळू तो संपूर्ण कोकणात राबविण्यात येईल, अशी माहितीही आमदार कडू यांनी दिली. वास्तविक पाहता येथील लोकप्रतिनिधींनी अपंगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण ते लक्ष देताना दिसत नाहीत. शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या म्हणजे काम झाले असे समजू नये, तर प्रत्यक्ष या लोकांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू