शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

तिस-या आघाडीसोबत जाणार नाही - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 20:15 IST

देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी आहे.

ठळक मुद्देतिस-या आघाडीसोबत जाणार नाही‘आमदारांची रावटी’ कार्यक्रम राबविणारपूर्वी जातीभेद होता, आता गावभेद निर्माण होतोय

- अनंत जाधव

सावंतवाडी : देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी आहे. त्यामुळे मुद्दे पटत नसल्यामुळे आपण स्वतंत्रपणे लढणार आहे. यासाठी कोणाची मदत घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.आमदार कडू हे एका कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे जात असताना सावंतवाडी येथे ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत रूपेश जाधव, समीर आचरेकर, अजय जाधव, प्रसाद मुळे, रोहन नलावडे आदी उपस्थित होते.शासन कोणाची मागणी नसताना गावात वेगवेगळ््या सोळा योजना राबवित आहे. यात तंटामुक्त, आदर्श, यशवंत ग्राम, हागणदारी मुक्त, श्रमदान अशा या योजना आहेत. या योजना सरकारकडे कोणी मागितल्या होत्या का? मग का सरकार राबवते? सरकारने या सर्व योजना बंद करून एकच योजना राबवावी, ती म्हणजे ‘उद्योगग्राम गाव योजना’. यातून शेतकºयाची आर्थिक समृध्दी होईल. त्यांच्या पिकाला भाव मिळेल, छोटे-छोटे उद्योग उभे राहतील. त्याने गावाची आर्थिक उन्नती होईल. यातून गाव सुखी होईल. मग गावात भांडणे होणार नाहीत. प्रत्येकाच्या घरी शौचालये येतील. यातून आदर्श गावाची निर्मिती होईल. शौचालये आली की हागणदारी मुक्त गाव होण्यास मदत होईल. या सर्व योजना आर्थिक स्थैर्यावर अवलंबून आहेत.त्यामुळे गाव व शहरातील आर्थिक दरी वाढवण्यिापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्या हाताला काम द्या. त्यामुळे गावातील गावभेद दूर होईल, असे मत त्यांनी यावेळी मांडले. आता सध्या गावात घरकुलासाठी दीड लाख, तर शहरात घरकुलसाठी अडीच लाख दिले जातात. मग ही आर्थिक दरी नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.पूर्वी जातीभेद होता, आता गावभेद निर्माण होतोयज्या योजना गावाने मागितल्या नाहीत त्यावर सरकार कोट्यवधी रूपये खर्च करते, पण ज्या सामान्य माणसाला, शेतकरी वर्गाला हव्या त्या योजना गावात राबविल्या जात नाहीत. त्यामुळेच गावात पूर्वी जातीभेद होता आता गावभेद निर्माण होऊ लागला आहे. गाव आणि शहरातील दरी रूंदावत चालली आहे. हे सर्व वेळीच दूर करा आणि गावात ‘उद्योगग्राम’सारख्या योजना आणा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली ‘आमदारांची रावटी’ कार्यक्रम राबविणारमी अंध अपंगासाठी काम करतो, पण सिंधुदुर्गमध्ये आल्यावर अनेक प्रश्न बघितले की या लोकांसाठी कधी कोणी आवाजच उठवला नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे मी भविष्यात ‘आमदारांची रावटी’ असा कार्यक्रम सावंतवाडीतून सुरू करणार आहे. यातून अंध-अपंगांचे प्रश्न प्रत्यक्ष गावात जाऊन सुटले पाहिजे यासाठी झटणार आहे. आॅगस्ट किंवा सप्टेंबरला हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, हळूहळू तो संपूर्ण कोकणात राबविण्यात येईल, अशी माहितीही आमदार कडू यांनी दिली. वास्तविक पाहता येथील लोकप्रतिनिधींनी अपंगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण ते लक्ष देताना दिसत नाहीत. शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या म्हणजे काम झाले असे समजू नये, तर प्रत्यक्ष या लोकांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू