शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

तिस-या आघाडीसोबत जाणार नाही - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 20:15 IST

देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी आहे.

ठळक मुद्देतिस-या आघाडीसोबत जाणार नाही‘आमदारांची रावटी’ कार्यक्रम राबविणारपूर्वी जातीभेद होता, आता गावभेद निर्माण होतोय

- अनंत जाधव

सावंतवाडी : देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी आहे. त्यामुळे मुद्दे पटत नसल्यामुळे आपण स्वतंत्रपणे लढणार आहे. यासाठी कोणाची मदत घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.आमदार कडू हे एका कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे जात असताना सावंतवाडी येथे ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत रूपेश जाधव, समीर आचरेकर, अजय जाधव, प्रसाद मुळे, रोहन नलावडे आदी उपस्थित होते.शासन कोणाची मागणी नसताना गावात वेगवेगळ््या सोळा योजना राबवित आहे. यात तंटामुक्त, आदर्श, यशवंत ग्राम, हागणदारी मुक्त, श्रमदान अशा या योजना आहेत. या योजना सरकारकडे कोणी मागितल्या होत्या का? मग का सरकार राबवते? सरकारने या सर्व योजना बंद करून एकच योजना राबवावी, ती म्हणजे ‘उद्योगग्राम गाव योजना’. यातून शेतकºयाची आर्थिक समृध्दी होईल. त्यांच्या पिकाला भाव मिळेल, छोटे-छोटे उद्योग उभे राहतील. त्याने गावाची आर्थिक उन्नती होईल. यातून गाव सुखी होईल. मग गावात भांडणे होणार नाहीत. प्रत्येकाच्या घरी शौचालये येतील. यातून आदर्श गावाची निर्मिती होईल. शौचालये आली की हागणदारी मुक्त गाव होण्यास मदत होईल. या सर्व योजना आर्थिक स्थैर्यावर अवलंबून आहेत.त्यामुळे गाव व शहरातील आर्थिक दरी वाढवण्यिापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्या हाताला काम द्या. त्यामुळे गावातील गावभेद दूर होईल, असे मत त्यांनी यावेळी मांडले. आता सध्या गावात घरकुलासाठी दीड लाख, तर शहरात घरकुलसाठी अडीच लाख दिले जातात. मग ही आर्थिक दरी नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.पूर्वी जातीभेद होता, आता गावभेद निर्माण होतोयज्या योजना गावाने मागितल्या नाहीत त्यावर सरकार कोट्यवधी रूपये खर्च करते, पण ज्या सामान्य माणसाला, शेतकरी वर्गाला हव्या त्या योजना गावात राबविल्या जात नाहीत. त्यामुळेच गावात पूर्वी जातीभेद होता आता गावभेद निर्माण होऊ लागला आहे. गाव आणि शहरातील दरी रूंदावत चालली आहे. हे सर्व वेळीच दूर करा आणि गावात ‘उद्योगग्राम’सारख्या योजना आणा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली ‘आमदारांची रावटी’ कार्यक्रम राबविणारमी अंध अपंगासाठी काम करतो, पण सिंधुदुर्गमध्ये आल्यावर अनेक प्रश्न बघितले की या लोकांसाठी कधी कोणी आवाजच उठवला नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे मी भविष्यात ‘आमदारांची रावटी’ असा कार्यक्रम सावंतवाडीतून सुरू करणार आहे. यातून अंध-अपंगांचे प्रश्न प्रत्यक्ष गावात जाऊन सुटले पाहिजे यासाठी झटणार आहे. आॅगस्ट किंवा सप्टेंबरला हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, हळूहळू तो संपूर्ण कोकणात राबविण्यात येईल, अशी माहितीही आमदार कडू यांनी दिली. वास्तविक पाहता येथील लोकप्रतिनिधींनी अपंगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण ते लक्ष देताना दिसत नाहीत. शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या म्हणजे काम झाले असे समजू नये, तर प्रत्यक्ष या लोकांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू