शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भाजपबरोबर जाणार नाही; काँग्रेसबरोबरच ‘राष्ट्रवादी’ : तटकरे

By admin | Updated: November 5, 2015 01:05 IST

कोल्हापूरकर नाराज

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसबरोबरच आघाडी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, मंगळवारी तशी घोषणाही झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.महापालिकेत काँग्रेसचे २७, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी ४१ सदस्यांची गरज असते. दोन्ही काँग्रेसचे मिळून ४२ सदस्य होतात. शिवाय दोन अपक्षांनी यापूर्वीच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोन पक्षांकडे स्पष्ट बहुमत असताना भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी महापौर भाजपचाच होईल, असे जाहीर करून खळबळ उडवून दिली. तसे करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा द्यावा लागतो. त्याशिवाय हे शक्य होत नाही. पालकमंत्र्यांनीही राजकारणात काहीही चमत्कार होतात, असे आत्मविश्वाासपूर्वक सांगितल्याने राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने तटकरे यांच्याशी संपर्क साधला. तटकरे म्हणाले, कोल्हापुरात दोन्ही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. स्थानिक जनतेचा जनादेशही तसाच आहे. या दोन पक्षांच्या आघाडीची रितसर घोषणाही झाली आहे. शिवाय काँग्रेसबरोबर आघाडी करून राष्ट्रवादी सत्तेत येत असताना भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. पालकमंत्री पाटील हे कोणत्या संख्याबळावर महापौर करणार हे तुम्ही त्यांनाच विचारलेले बरे.कोल्हापूरकर नाराजऐन निवडणुकीत कदमवाडीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर व ताराराणी आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सत्यजित कदम यांच्यात राडा झाला. दोघांचीही कार्यालये फोडण्यात आली. लाटकर यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. प्रचारात ताराराणी आघाडीचे संयोजक असलेले माजी महापौर सुनील कदम आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यात जोरदार चिखलफेक झाली. तरीही ते सगळेच पंचगंगेत बुडवून ताराराणी आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा महापौर होऊ नये यासाठी ‘राष्ट्रवादी’ला बिनशर्त पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिल्याने त्याबद्दलही लोकांतून नाराजी व्यक्त झाली. कुटुंबातील तीन पक्षांतून तिघे राजकारण करणारे महाडिक शहाणे की त्यांना निवडून देणारी कोल्हापूरची जनता मूर्ख, अशी विचारणा मुश्रीफ यांनीच केली होती. महाडिक गटाच्या हालचालीवर शहरवासीयांत उलटसुलट चर्चा सुरू आहे.