शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईचे ‘उल्हासनगर’ करणार का?

By admin | Updated: October 13, 2015 04:15 IST

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासाठी धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने कडवट टीका करत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासाठी धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने कडवट टीका करत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे का, असा संतप्त सवाल केला. राज्य सरकार बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला.दिघा गावातील ९६ बेकायदेशीर इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीला दिले आहेत. एमआयडीसीने दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करत बांधकामांवर हातोडा चालवण्याचे काम तत्काळ हाती घेतले. त्यावर स्थानिक रहिवाशांनी ‘कॅम्पा कोला’साठी वेगळा न्याय आणि आपल्यासाठी वेगळा न्याय का? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. जनक्षोभ लक्षात घेता नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात धोरण आखण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे हंगामी महाअधिवक्ता अनिल सिंग यांनी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर सरकारला नक्की काय हवे आहे, अशी विचारणा खंडपीठाने अ‍ॅड. सिंग यांच्याकडे केली.‘तुम्हाला आमच्या आदेशावर स्थगिती हवी आहे का?’ अशी विचारणा खंडपीठाने केल्यावर अ‍ॅड. सिंग यांनी या बांधकाम तोडण्याच्या मोहिमेमध्ये ज्या बांधकामांना सरकारचे धोरणांतर्गत संरक्षण मिळण्याची शक्यता आहे, त्या बांधकामांवरही हातोडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती हवी असल्याचे खंडपीठाला सांगितले.त्यावर खंडपीठाने संतप्त होत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे का? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्याच्या भूमिकेचे परिणाम काय होतील, याची कल्पना सरकारने केली आहे का, असा थेट प्रश्न करत खंडपीठाने सरकारच्या भूमिकेवर कडवट टीका केली.‘अशा प्रकारे तुम्ही बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत आहात. भविष्यात लोक मैदानावर किंवा रस्त्यांवर बेकायदेशीर बांधकामे उभारतील. तुमचे हेच उद्दिष्ट आहे का?’ असे खंडपीठाने म्हटले.सरकारला बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन द्यायचे नाही, असे अ‍ॅड. सिंग यांनी सांगितले. ‘सरकारला बेकायदेशीर (पान ५ वर)