शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महापौर होणार सर्वसामान्यांच्या आऊट ऑफ रिच?

By admin | Updated: April 18, 2017 22:13 IST

दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवास्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे महापौर निवासस्थान भायकळा येथील राणीच्या बागेत हलवण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई ,दि.18 - दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवास्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे महापौर निवासस्थान भायकळा येथील राणीच्या बागेत हलवण्यात येणार आहे. मात्र विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रस्तावाचा विरोध करीत अतिरिक्त आयुक्तांचा मलबार हिल येथील बंगल्यात महापौरांचे निवासस्थान तयार करण्याची मागणी केली आहे. मात्र, मलबार हिलमध्ये उच्चभ्रू वस्ती असल्याने तसेच ते वाहतुकीच्या दृष्टीनेही सोयीचे नसल्याने महापौर सर्वसामान्यांच्या आऊट ऑफ रिच जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
महापौर निवासस्थानाबाबत निर्णय होईपर्यंत महापौर महाडेश्वर यांना समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या दादर येथील प्रशस्त महापौर बंगल्यात काहीकाळ मुक्काम करता आला आहे. मात्र येथे स्मारक उभारण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर महापौरांना राणीच्या बागेतील अतिरिक्त आयुक्तांसाठी राखीव पूर्वीचा बंगला देण्यात येणार आहे. परंतु या प्रस्तावाला शिवसेना नेत्यांनी पूर्वीपासूनच नकार घंटा वाजवली आहे. त्यानुसार विद्यमान महापौरांनीही तीच री ओढली आहे. महापौर बंगल्याची शान व गरीमेला साजेसा बंगला देण्याचा तगादा महापौरांनी प्रशासनाकडे लावला आहे. 
 
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प ) आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) यांचे निवासस्थान असलेले बंगले महापौर निवासस्थानाची देण्याची मागणी महाडेश्वर यांनी केली आहे. मलबारहिल येथे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांसाठी राखीव दोनच बंगले आहेत. या बंगल्यावरच महापौरांनी दावा केला आहे. मात्र महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांना भेटण्यासाठी दररोज शेकडो नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने हा बांगला गैरसोयीचा ठरणार आहे. त्यामुळे महापौरांची ही मागणी मान्य झाल्यास नागरिकांना त्यांच्या भेठीगाठी घेणे दुर्लभ होण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी 
 
राणीच्या बागेत बंगला यासाठी नको .... 
-महापौरांना भेटण्यासाठी शेकडो नागरिक निवासस्थानी येत असतात. तसेच अनेक सामाजिक उपक्रम व कार्यक्रमही महापौर बंगल्यात होत असतात, मात्र राणीची बाग ही शांतता क्षेत्रात गणली जाते. त्यामुळे महापौर निवासस्थानावरील वर्दळीचा राणीबागेत प्राण्यांना त्रास होईल. 
 
-संध्याकाळी ६ नंतर आवाजास प्रतिबंध आहे. मात्र कार्यक्रमानिमित्त ध्वनीक्षेपक लावणे अपरिहार्य आहे. परंतु प्राण्यांना त्याचा त्रास व महापौरांवर टीका होईल. 
 
-राणी बागेतील जागा तुलनात्मक दृष्ट्या अपुरी व गैरसोयीची असल्याने महापौर बंगल्यावर येणाऱ्या पाहुण्यांचे आदरतिथ्य करण्यात कमतरता राहील.