शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

महाराष्ट्राला ‘युनिफॉर्म हब’ बनविणार

By admin | Updated: December 31, 2016 02:39 IST

देशातील शिक्षण, उद्योग क्षेत्रांसह विविध ठिकाणी लागणाऱ्या युनिफॉर्म निर्मितीची वार्षिक उलाढाल १८ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. विडी उद्योगांसारख्या संकटात

- राजा माने, सोलापूरदेशातील शिक्षण, उद्योग क्षेत्रांसह विविध ठिकाणी लागणाऱ्या युनिफॉर्म निर्मितीची वार्षिक उलाढाल १८ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. विडी उद्योगांसारख्या संकटात आलेल्या कामगारांसाठी हे उद्योगक्षेत्र पर्याय ठरू शकते. ती क्षमता महाराष्ट्रात असल्यानेच आमचा ‘मेक इन इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राला देशातील ‘युनिफॉर्म हब’ बनविण्याचा संकल्प आहे, असे राज्याचे सहकार, वस्त्रोद्योग व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना सांगितले. युनिफॉर्म निर्मितीचे क्षेत्र खूप मोठे आहे. १८ हजार कोटींच्या या उद्योगात आपल्या महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. त्यात अधिक लक्ष घालून काम केले तर ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत आपण महाराष्ट्राला ‘युनिफॉर्म हब’ बनवू शकतो. आपल्या संपूर्ण राज्याच्या शालेय गणवेश निर्मितीत सोलापूरचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात एक हजार गणवेश उत्पादक आहेत. ५० हजारांहून अधिक कामगारांना हा उद्योग रोजगार उपलब्ध करतो. याशिवाय २३ देशांना येथून निर्यात केली जाते. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी, भिवंडी, अमरावती यांसारख्या शहरांमध्ये रोजगार निर्मितीला चालना देण्याची क्षमता या उद्योगात आहे. त्याच कारणाने आम्ही येत्या पाच ते सात जानेवारी यादरम्यान सोलापुरात देशातील पहिले युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन आयोजित करीत आहोत. ज्यात मफतलालसारख्या उद्योग समूहांसह देश-विदेशातील उद्योग सहभागी होत आहेत, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.सहकार क्षेत्र मोडीत कोणी काढले जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता आम्ही सहकार क्षेत्र विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे देशमुख म्हणाले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक सहकारी संस्थांना मदत करून उभे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जिल्हा बँकांच्या बाबतीतही आमची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेली आहे. ज्या ठिकाणी जिल्हा बँका कमकुवत आहेत त्या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून विकास संस्थांना थेट कर्ज देऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची सोय आम्ही केली. विकास सोसायट्या हा शेतकरी आणि ग्रामीण विकासाचा मुख्य आधार आहे, हे जाणूनच ज्याच्या नावावर सात-बारा त्याला सभासदत्व हे धोरण आम्ही अवलंबले. असे राज्यात प्रथमच घडत आहे, असेही त्यांनी सांगितले.