शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

महाराष्ट्राला ‘युनिफॉर्म हब’ बनविणार

By admin | Updated: December 31, 2016 02:39 IST

देशातील शिक्षण, उद्योग क्षेत्रांसह विविध ठिकाणी लागणाऱ्या युनिफॉर्म निर्मितीची वार्षिक उलाढाल १८ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. विडी उद्योगांसारख्या संकटात

- राजा माने, सोलापूरदेशातील शिक्षण, उद्योग क्षेत्रांसह विविध ठिकाणी लागणाऱ्या युनिफॉर्म निर्मितीची वार्षिक उलाढाल १८ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. विडी उद्योगांसारख्या संकटात आलेल्या कामगारांसाठी हे उद्योगक्षेत्र पर्याय ठरू शकते. ती क्षमता महाराष्ट्रात असल्यानेच आमचा ‘मेक इन इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राला देशातील ‘युनिफॉर्म हब’ बनविण्याचा संकल्प आहे, असे राज्याचे सहकार, वस्त्रोद्योग व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना सांगितले. युनिफॉर्म निर्मितीचे क्षेत्र खूप मोठे आहे. १८ हजार कोटींच्या या उद्योगात आपल्या महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. त्यात अधिक लक्ष घालून काम केले तर ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत आपण महाराष्ट्राला ‘युनिफॉर्म हब’ बनवू शकतो. आपल्या संपूर्ण राज्याच्या शालेय गणवेश निर्मितीत सोलापूरचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात एक हजार गणवेश उत्पादक आहेत. ५० हजारांहून अधिक कामगारांना हा उद्योग रोजगार उपलब्ध करतो. याशिवाय २३ देशांना येथून निर्यात केली जाते. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी, भिवंडी, अमरावती यांसारख्या शहरांमध्ये रोजगार निर्मितीला चालना देण्याची क्षमता या उद्योगात आहे. त्याच कारणाने आम्ही येत्या पाच ते सात जानेवारी यादरम्यान सोलापुरात देशातील पहिले युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन आयोजित करीत आहोत. ज्यात मफतलालसारख्या उद्योग समूहांसह देश-विदेशातील उद्योग सहभागी होत आहेत, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.सहकार क्षेत्र मोडीत कोणी काढले जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता आम्ही सहकार क्षेत्र विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे देशमुख म्हणाले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक सहकारी संस्थांना मदत करून उभे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जिल्हा बँकांच्या बाबतीतही आमची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेली आहे. ज्या ठिकाणी जिल्हा बँका कमकुवत आहेत त्या ठिकाणी राज्य सहकारी बँकेकडून विकास संस्थांना थेट कर्ज देऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची सोय आम्ही केली. विकास सोसायट्या हा शेतकरी आणि ग्रामीण विकासाचा मुख्य आधार आहे, हे जाणूनच ज्याच्या नावावर सात-बारा त्याला सभासदत्व हे धोरण आम्ही अवलंबले. असे राज्यात प्रथमच घडत आहे, असेही त्यांनी सांगितले.