शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज चालणार का ?

By admin | Updated: December 14, 2015 02:32 IST

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे

अतुल कुलकर्णी, नागपूरहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे. कर्जमाफीच्या भूमिकेवर कायम राहत कामकाज बंद पाडण्याचे राजकीय लाभ जास्त आहेत, असा मुद्दा समोर आल्याने सोमवारी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.नुसती चर्चा नको, कर्जमाफी द्या, असे म्हणत विरोधकांनी पहिला आठवडा कामकाज रोखून धरले. दुसऱ्याही आठवड्यात हीच भूमिका कायम ठेवली तर तो इतिहास घडेल. नागपूर अधिवेशन सलग दोन आठवडे कामकाजाविना असे कधीही घडलेले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी विधीमंडळाचे कामकाज रोखून धरले असा राज्यभर संदेश जाईल, असा विरोधकांचा कयास आहे. टू जी घोटाळ्यावरुन भाजपाने सलग दोन अधिवेशन लोकसभेचे कामकाज होऊ दिले नव्हते, याची आठवण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात करून दिली होती. त्यामुळे तीच रणनिती भाजपासरकारविरुध्द वापरावी, असे काँग्रेसमध्ये अनेकांचे मत आहे. मात्र विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील कोणती भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. जर कामकाजात भाग घेतला तर एवढे दिवस कामकाज का रोखले म्हणून माध्यमे झोडून काढतील. विरोधकांना शरद पवार यांचा वाढदिवस, शेतकऱ्यांसाठीचा काँग्रेसचा मोर्चा या गोष्टी जास्त महत्वाच्या होत्या अशी टीका होईल. शिवाय दुष्काळ, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरील विरोधकांच्या भाषणापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला जास्त प्राधान्य मिळेल. आघाडी सरकारच्या काळातल्या चुकीच्या नियोजनामुळे हे सगळे घडत आहे, असा हल्ला मुख्यमंत्र्यांनी चढवला तर तोही सहन करावा लागेल. त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी, त्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच नागपुरातले अधिवेशन आम्ही होऊ दिले नाही असे राज्यभर सांगता येईल, असे विरोधकाचे राजकीय गणित आहे.मात्र दुसऱ्या आठवड्यात सत्ताधाऱ्यांना काही करून कामकाज चालू ठेवायचे आहे. विरोधकांना कामकाज बंद पाडण्याचे व शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या विषयी सहानुभूती निर्माण होऊ न देण्यासाठी शनिवार, रविवार मोर्चेबांधणी सुरु होती. सोमवारी सकाळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आहे. त्यात अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची रणनिती ठरले असे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.