शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज चालणार का ?

By admin | Updated: December 14, 2015 02:32 IST

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे

अतुल कुलकर्णी, नागपूरहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे. कर्जमाफीच्या भूमिकेवर कायम राहत कामकाज बंद पाडण्याचे राजकीय लाभ जास्त आहेत, असा मुद्दा समोर आल्याने सोमवारी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.नुसती चर्चा नको, कर्जमाफी द्या, असे म्हणत विरोधकांनी पहिला आठवडा कामकाज रोखून धरले. दुसऱ्याही आठवड्यात हीच भूमिका कायम ठेवली तर तो इतिहास घडेल. नागपूर अधिवेशन सलग दोन आठवडे कामकाजाविना असे कधीही घडलेले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी विधीमंडळाचे कामकाज रोखून धरले असा राज्यभर संदेश जाईल, असा विरोधकांचा कयास आहे. टू जी घोटाळ्यावरुन भाजपाने सलग दोन अधिवेशन लोकसभेचे कामकाज होऊ दिले नव्हते, याची आठवण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात करून दिली होती. त्यामुळे तीच रणनिती भाजपासरकारविरुध्द वापरावी, असे काँग्रेसमध्ये अनेकांचे मत आहे. मात्र विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील कोणती भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. जर कामकाजात भाग घेतला तर एवढे दिवस कामकाज का रोखले म्हणून माध्यमे झोडून काढतील. विरोधकांना शरद पवार यांचा वाढदिवस, शेतकऱ्यांसाठीचा काँग्रेसचा मोर्चा या गोष्टी जास्त महत्वाच्या होत्या अशी टीका होईल. शिवाय दुष्काळ, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरील विरोधकांच्या भाषणापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला जास्त प्राधान्य मिळेल. आघाडी सरकारच्या काळातल्या चुकीच्या नियोजनामुळे हे सगळे घडत आहे, असा हल्ला मुख्यमंत्र्यांनी चढवला तर तोही सहन करावा लागेल. त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी, त्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच नागपुरातले अधिवेशन आम्ही होऊ दिले नाही असे राज्यभर सांगता येईल, असे विरोधकाचे राजकीय गणित आहे.मात्र दुसऱ्या आठवड्यात सत्ताधाऱ्यांना काही करून कामकाज चालू ठेवायचे आहे. विरोधकांना कामकाज बंद पाडण्याचे व शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या विषयी सहानुभूती निर्माण होऊ न देण्यासाठी शनिवार, रविवार मोर्चेबांधणी सुरु होती. सोमवारी सकाळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आहे. त्यात अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची रणनिती ठरले असे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.