शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

‘महाजेन्को’ च्या प्रकल्पाची पाहणी करणार

By admin | Updated: December 17, 2014 00:27 IST

पर्यावरण मंत्रालयाचे नियम मोडून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) चंद्रपूर वीज केंद्रात न धुतलेला कच्चा कोळसा वापरत असल्याची बाब राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गंभीरतेने

रामदास कदम : त्रुटी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासननागपूर : पर्यावरण मंत्रालयाचे नियम मोडून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) चंद्रपूर वीज केंद्रात न धुतलेला कच्चा कोळसा वापरत असल्याची बाब राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गंभीरतेने घेतली आहे. या केंद्राला येत्या दोन-तीन दिवसांत भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कदम यांनी मंगळवारी लोकमत भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे चंद्रपूर वीज केंद्रात ‘महाजेन्को’ कडून उल्लंघन केले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. याबाबत विचारणा केली असता, पर्यावरण विभागाचे सचिव राजीव कुमार यांच्यासमवेत या केंद्राची पाहणी करूव नेमके कशाप्रकारे पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे किती प्रमाणात पालन होत आहे, याचा आढावा घेऊ. जर यात त्रुटी आढळल्या तर नियमानुसार निश्चित कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कदम यांनी राज्यातील पर्यावरणाबाबत चर्चा केली. जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून कुठल्याही स्थितीत आम्ही नमते घेणार नाही, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. कोकणातील स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पासाठी कोकणातीलच मातीचा उपसा करून समुद्रात भराव घालण्यात येईल. यामुळे कोकणच्या पर्यावरणाची हानी होऊ शकते. संपुआ सरकारने फ्रेंच कंपनीसोबत एक लाख मेगावॅट ऊर्जानिर्मितीसाठी करार केला. परंतु देशातील निरनिराळ्या ठिकाणी ही ऊर्जा निर्माण होऊ शकते, मग जैतापूरचा आग्रह का, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)आम्ही फडणवीसांच्या पाठीशीशिवसेना व भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. विचारभिन्नता जरी असली तरी त्यामुळे राज्याच्या प्रशासनावर काहीही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्तबगार व हुशार व्यक्ती आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात राज्य विकासाचे शिखर गाठेल. आमचा पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले.