ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - अमेरिकेने ओसामा बिन लादेनच्या बाबतीत जे धाडस दाखवलं तसं धाडस भारतातील राज्यकर्ते दाऊद इब्राहीम आणि हाफीज सईदच्या बाबतीत दाखवतील का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. भारताला धाडस दाखवण शक्य नसेल दाऊद, हाफीजच्या बाबतीत बोटं मोडूनही काहीच उपयोग नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
दाऊद इब्राहीमचे फोनवरीस संभाषण उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दाऊद आणि हाफीज सईद हे पाकमध्ये राजकीय छत्रछायेखाली वावरत असून यासाठी आणखी पुरावे गोळा करण्याची गरज नाही. दाऊदच्या हालचालींवर नजर असल्याचे भारताकडून सांगितले जाते. पण हाफीस सईदही भारतावर लक्ष ठेवून असतो. हा नजरबंदीचा खेळ सुरुच राहील असे खोचक विधानही त्यांनी केले. दाऊदच्या फोन टेपमध्ये नवीन काहीच नसून हा सारा खेळ असाच सुरु राहील असे त्यांनी म्हटले आहे.