शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

CoronaVirus: सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या भागांसाठी सरकारचा प्लान तयार? आरोग्यमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:14 IST

Coronavirus कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या भागांत पूर्ण जमावबंदी लागू करण्याचा विचार

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढल्यानं राज्य सरकारनं आता महत्त्वाची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील दिवसांत काही विशिष्ट भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं या भागात पूर्ण जमावबंदीचा विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. त्यामुळे कोरोना हॉटस्पॉटवर लवकरच पूर्ण जमावबंदी लागू होऊ शकते.गेल्या काही दिवसांत कोरोबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनाचं निदान होत असल्यानं लागण झालेल्या रुग्णांवर तातडीनं उपचार करणं शक्य होत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात कोविड रुग्णालयांची उभारणी करण्याचं काम सुरू आहे. एन-९५ मास्क आणि व्हेंटिलेटर्सचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाणार आहे, असं टोपेंनी सांगितलं.सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्याचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. निझामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या १३०० जणांचा शोध घेण्यात यश आलं असून त्यांना क्वॉरेंटाईन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. केंद्राच्या सर्व सूचनांचं राज्याकडून पालन करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. या बैठकीत सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे थकीत असलेल्या जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. राज्याचे १६ हजार कोटी रुपये केंद्रानं अद्याप दिलेले नाहीत. सध्याची आर्थिक परिस्थिती पैशाची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे केंद्रानं राज्याचा जीएसटीचा वाटा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्याचं टोपेंनी सांगितलं. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे