शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पंचनामे अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; विजय वडेट्टीवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 14:28 IST

विजय वडेट्टीवारांचा लातूर दौरा; नुकसानीची पाहणी करुन ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

जळकोट (जि. लातूर): लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिले.जळकोट येथील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जि.प.चे गटनेते संतोष तिडके, अभय साळुंके, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, सत्यवान पाटील दळवे, मारुती पांडे, गजानन दळवे, बालाजी ठाकूर, प्रा. शाम डावळे, दस्तगीर शेख, नगरसेवक महेश शेट्टे, संग्राम नामवाड, सरपंच मंगेश गोरे, मुखेडचे माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उपसभापती सुभाष पाटील, चेअरमन अशोक डांगे, शंकर शेट्टी उपस्थित होते.मंत्री वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने आम्ही पाहणी दौरे करत आहोत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शासनाच्या कॅबिनेटमध्ये नुकसानीची परिस्थिती सादर करुन जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू.शासन शेतकऱ्यांच्या पाठिशीप्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी तालुक्यातील नुकसानीचा आढावा सादर केला. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असून पीकविमा कंपनी, राज्य शासनाच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही मदत करू. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार