शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

पंचनामे अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; विजय वडेट्टीवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 14:28 IST

विजय वडेट्टीवारांचा लातूर दौरा; नुकसानीची पाहणी करुन ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

जळकोट (जि. लातूर): लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिले.जळकोट येथील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जि.प.चे गटनेते संतोष तिडके, अभय साळुंके, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, सत्यवान पाटील दळवे, मारुती पांडे, गजानन दळवे, बालाजी ठाकूर, प्रा. शाम डावळे, दस्तगीर शेख, नगरसेवक महेश शेट्टे, संग्राम नामवाड, सरपंच मंगेश गोरे, मुखेडचे माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उपसभापती सुभाष पाटील, चेअरमन अशोक डांगे, शंकर शेट्टी उपस्थित होते.मंत्री वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने आम्ही पाहणी दौरे करत आहोत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शासनाच्या कॅबिनेटमध्ये नुकसानीची परिस्थिती सादर करुन जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू.शासन शेतकऱ्यांच्या पाठिशीप्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी तालुक्यातील नुकसानीचा आढावा सादर केला. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असून पीकविमा कंपनी, राज्य शासनाच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही मदत करू. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार