शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दिव्यांगांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करणार

By admin | Updated: March 28, 2016 01:51 IST

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिल्या होत्या. परंतु भाजपा सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाचे अपंग धोरण

नागपूर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिल्या होत्या. परंतु भाजपा सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाचे अपंग धोरण जवळजवळ तयार झाले आहे. त्यात दिव्यांगांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील तिसऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग साहित्य, कला व उद्योजकता संमेलनात दिव्यांग उद्योगभूषण पुरस्कारांचे वितरण झाले. एक हजार अपंगांना कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. गेल्या सव्वा वर्षात राज्य शासनाने दिव्यांगांसाठी २७ शासन निर्णय निर्गमित केले आहेत. अपंग धोरणाला अंतिम स्वरूप देण्याअगोदर विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्र्यांना त्यादृष्टीने सूचना करण्यात आली होती व ते काम वेगात सुरू आहे. धोरण लवकरच तयार होईल व त्याला मान्यतादेखील मिळवून देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग सहजपणे येऊ शकले पाहिजे, अशी सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. शिवाय केंद्र शासनाच्या सुगम्य भारत योजनेअंतर्गतदेखील विविध प्रकल्प राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.विविध संस्थांमध्ये दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यावर सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. संमेलनाध्यक्ष डॉ. विनोद आसुदानी यांनी दिव्यांगांच्या मनातील वेदना बोलून दाखविल्या. दिव्यांग व्यक्तींना आजदेखील समाजात हवा तो सन्मान मिळत नाही. त्यांना कुणाची दया नको, तर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी हवी असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१६ व्यक्तींचा गौरव : जयसिंग चव्हाण, डॉ. रविंद्र नांदेडकर, नसिमा हुरजूक, भावेश भाटिया, बंदे नवाज नदाफ, अमोल वाळके, राजेश खडके, दीपक सोनी, सुनील ठाकरे, बिरजू चौधरी, किशोर नेवे, भास्कर हिवराळे, अशोक भोईर, माधुरी भालेराव, मेघा काळे, अशोक मुन्ने या १६ उद्योगपतींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.