शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करणार

By admin | Updated: March 28, 2016 01:51 IST

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिल्या होत्या. परंतु भाजपा सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाचे अपंग धोरण

नागपूर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिल्या होत्या. परंतु भाजपा सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाचे अपंग धोरण जवळजवळ तयार झाले आहे. त्यात दिव्यांगांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील तिसऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग साहित्य, कला व उद्योजकता संमेलनात दिव्यांग उद्योगभूषण पुरस्कारांचे वितरण झाले. एक हजार अपंगांना कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. गेल्या सव्वा वर्षात राज्य शासनाने दिव्यांगांसाठी २७ शासन निर्णय निर्गमित केले आहेत. अपंग धोरणाला अंतिम स्वरूप देण्याअगोदर विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्र्यांना त्यादृष्टीने सूचना करण्यात आली होती व ते काम वेगात सुरू आहे. धोरण लवकरच तयार होईल व त्याला मान्यतादेखील मिळवून देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग सहजपणे येऊ शकले पाहिजे, अशी सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. शिवाय केंद्र शासनाच्या सुगम्य भारत योजनेअंतर्गतदेखील विविध प्रकल्प राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.विविध संस्थांमध्ये दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यावर सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. संमेलनाध्यक्ष डॉ. विनोद आसुदानी यांनी दिव्यांगांच्या मनातील वेदना बोलून दाखविल्या. दिव्यांग व्यक्तींना आजदेखील समाजात हवा तो सन्मान मिळत नाही. त्यांना कुणाची दया नको, तर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी हवी असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१६ व्यक्तींचा गौरव : जयसिंग चव्हाण, डॉ. रविंद्र नांदेडकर, नसिमा हुरजूक, भावेश भाटिया, बंदे नवाज नदाफ, अमोल वाळके, राजेश खडके, दीपक सोनी, सुनील ठाकरे, बिरजू चौधरी, किशोर नेवे, भास्कर हिवराळे, अशोक भोईर, माधुरी भालेराव, मेघा काळे, अशोक मुन्ने या १६ उद्योगपतींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.