शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

मुंबई-रायगड जलप्रवास लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 04:39 IST

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. या चारही बंदरांवरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्याकरिता शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सुरक्षित व सुरळीत प्रवासी वाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४९ प्रवासी जेट्टीच्या ठिकाणी प्रसाधनगृह, प्रवासी शेड, आसन व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, अपंग व वृद्ध व्यक्तींकरिता व्हीलचेअर वा बॅटरीवर चालणाºया गाड्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत आहे. २०१७-१८ मध्ये ३० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून पावसाळ्यानंतर कामे हाती घेण्यात येतील, तसेच गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी दिल्याची माहिती विधानपरिषद सदस्य आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.मुंबईतील भाऊचा धक्का येथून रायगड जिल्ह्यातील मोरा (ता.उरण) व रेवस (ता.अलिबाग) अशी जलप्रवासी वाहतूक करण्यात येते. गेटवे आॅफ इंडिया आणि भाऊचा धक्का येथील जेट्टी सुविधा या मुंबई बंदर विश्वस्त यांच्या अखत्यारीत येतात, तर मांडवा, घारापुरी, मोरा व रेवस येथील जेट्टी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या नियंत्रणाखाली येतात. या सर्व मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत खासगी जलवाहतूक संस्थांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.विधानपरिषद सभागृहामध्ये लक्षवेधी सूचना विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोºहे यांनी दाखल केली होती. मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून प्रवास करण्यासाठी असलेल्या बोटी जुनाट व गळक्या असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. गैरसोयी दूर करण्याऐजवी बंदर विभागाचे अधिकारी आणि बोटींचे मालक यांच्यातील संगनमतामुळे मालकांकडून प्रवाशांच्या होणाºया असुरक्षितेबाबत व वाढत्या तिकिटदराबाबत आतापर्यंत कोणतीच सक्षम कार्यवाही होत नसल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी व प्रवासी बोटीची अवाजवी शुल्कवाढ रोखण्यास्तव शासनाने हस्तक्षेप करून याप्रकरणी निर्णयात्मक कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. नीलम गोºहे यांनी या वेळी सांगितले. याच लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.मोरा जेट्टीवर विद्युत व्यवस्था सुस्थितीत कार्यरत आहे. जोरदार पावसामुळे रेवस जेट्टी येथील विद्युत व्यवस्था तात्पुरती बंद असून ती पूर्ववत सुरू करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.मोरा व रेवस येथे मासळी उतरविण्यासाठी मच्छीमारांकरिता स्वतंत्र जेट्टी नसल्यामुळे प्रवासी जेट्टीवर मासळी उतरविली जाते.या मासळीचा प्रवासी वर्गाला त्रास होऊ नये याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या क्षेत्रीय कर्मचारावर्गामार्फत मच्छीमारांना वेळोवेळी सूचना करण्यात येत असते. त्याचबरोबर जेट्टी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असते, असे मुख्यमंत्रांनी स्पष्ट केले.