शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-रायगड जलप्रवास लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 04:39 IST

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. या चारही बंदरांवरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्याकरिता शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सुरक्षित व सुरळीत प्रवासी वाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४९ प्रवासी जेट्टीच्या ठिकाणी प्रसाधनगृह, प्रवासी शेड, आसन व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, अपंग व वृद्ध व्यक्तींकरिता व्हीलचेअर वा बॅटरीवर चालणाºया गाड्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत आहे. २०१७-१८ मध्ये ३० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून पावसाळ्यानंतर कामे हाती घेण्यात येतील, तसेच गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी दिल्याची माहिती विधानपरिषद सदस्य आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.मुंबईतील भाऊचा धक्का येथून रायगड जिल्ह्यातील मोरा (ता.उरण) व रेवस (ता.अलिबाग) अशी जलप्रवासी वाहतूक करण्यात येते. गेटवे आॅफ इंडिया आणि भाऊचा धक्का येथील जेट्टी सुविधा या मुंबई बंदर विश्वस्त यांच्या अखत्यारीत येतात, तर मांडवा, घारापुरी, मोरा व रेवस येथील जेट्टी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या नियंत्रणाखाली येतात. या सर्व मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत खासगी जलवाहतूक संस्थांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.विधानपरिषद सभागृहामध्ये लक्षवेधी सूचना विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोºहे यांनी दाखल केली होती. मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून प्रवास करण्यासाठी असलेल्या बोटी जुनाट व गळक्या असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. गैरसोयी दूर करण्याऐजवी बंदर विभागाचे अधिकारी आणि बोटींचे मालक यांच्यातील संगनमतामुळे मालकांकडून प्रवाशांच्या होणाºया असुरक्षितेबाबत व वाढत्या तिकिटदराबाबत आतापर्यंत कोणतीच सक्षम कार्यवाही होत नसल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी व प्रवासी बोटीची अवाजवी शुल्कवाढ रोखण्यास्तव शासनाने हस्तक्षेप करून याप्रकरणी निर्णयात्मक कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. नीलम गोºहे यांनी या वेळी सांगितले. याच लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.मोरा जेट्टीवर विद्युत व्यवस्था सुस्थितीत कार्यरत आहे. जोरदार पावसामुळे रेवस जेट्टी येथील विद्युत व्यवस्था तात्पुरती बंद असून ती पूर्ववत सुरू करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.मोरा व रेवस येथे मासळी उतरविण्यासाठी मच्छीमारांकरिता स्वतंत्र जेट्टी नसल्यामुळे प्रवासी जेट्टीवर मासळी उतरविली जाते.या मासळीचा प्रवासी वर्गाला त्रास होऊ नये याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या क्षेत्रीय कर्मचारावर्गामार्फत मच्छीमारांना वेळोवेळी सूचना करण्यात येत असते. त्याचबरोबर जेट्टी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असते, असे मुख्यमंत्रांनी स्पष्ट केले.