शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-रायगड जलप्रवास लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 04:39 IST

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. या चारही बंदरांवरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्याकरिता शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सुरक्षित व सुरळीत प्रवासी वाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४९ प्रवासी जेट्टीच्या ठिकाणी प्रसाधनगृह, प्रवासी शेड, आसन व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, अपंग व वृद्ध व्यक्तींकरिता व्हीलचेअर वा बॅटरीवर चालणाºया गाड्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत आहे. २०१७-१८ मध्ये ३० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून पावसाळ्यानंतर कामे हाती घेण्यात येतील, तसेच गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी दिल्याची माहिती विधानपरिषद सदस्य आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.मुंबईतील भाऊचा धक्का येथून रायगड जिल्ह्यातील मोरा (ता.उरण) व रेवस (ता.अलिबाग) अशी जलप्रवासी वाहतूक करण्यात येते. गेटवे आॅफ इंडिया आणि भाऊचा धक्का येथील जेट्टी सुविधा या मुंबई बंदर विश्वस्त यांच्या अखत्यारीत येतात, तर मांडवा, घारापुरी, मोरा व रेवस येथील जेट्टी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या नियंत्रणाखाली येतात. या सर्व मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत खासगी जलवाहतूक संस्थांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.विधानपरिषद सभागृहामध्ये लक्षवेधी सूचना विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोºहे यांनी दाखल केली होती. मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून प्रवास करण्यासाठी असलेल्या बोटी जुनाट व गळक्या असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. गैरसोयी दूर करण्याऐजवी बंदर विभागाचे अधिकारी आणि बोटींचे मालक यांच्यातील संगनमतामुळे मालकांकडून प्रवाशांच्या होणाºया असुरक्षितेबाबत व वाढत्या तिकिटदराबाबत आतापर्यंत कोणतीच सक्षम कार्यवाही होत नसल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी व प्रवासी बोटीची अवाजवी शुल्कवाढ रोखण्यास्तव शासनाने हस्तक्षेप करून याप्रकरणी निर्णयात्मक कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. नीलम गोºहे यांनी या वेळी सांगितले. याच लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.मोरा जेट्टीवर विद्युत व्यवस्था सुस्थितीत कार्यरत आहे. जोरदार पावसामुळे रेवस जेट्टी येथील विद्युत व्यवस्था तात्पुरती बंद असून ती पूर्ववत सुरू करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.मोरा व रेवस येथे मासळी उतरविण्यासाठी मच्छीमारांकरिता स्वतंत्र जेट्टी नसल्यामुळे प्रवासी जेट्टीवर मासळी उतरविली जाते.या मासळीचा प्रवासी वर्गाला त्रास होऊ नये याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या क्षेत्रीय कर्मचारावर्गामार्फत मच्छीमारांना वेळोवेळी सूचना करण्यात येत असते. त्याचबरोबर जेट्टी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असते, असे मुख्यमंत्रांनी स्पष्ट केले.