शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

संमेलनाला शिक्षकांची उपस्थिती रोडावणार?

By admin | Updated: January 30, 2017 01:55 IST

शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांकडून तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

जान्हवी मोर्ये, डोंबिवलीशहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांकडून तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात नाराजीचा सूर असून ते संमेलनाला पाठ दाखवण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलनाला मराठी हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिक्षकांना संमेलनास उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांना तीन दिवस भरपगारी रजा दिली जाणार आहे. मात्र, दुसरीकडे आयोजकांनी त्यांना संमेलनात सहभागी होण्यासाठी शुल्कात सूट दिलेली नाही. त्यांच्याकडून तीन हजारांचे शुल्क आकारले जाणार आहे. ते भरण्यास शिक्षक तयार नाहीत. परंतु, अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना संमेलनात सहभागी होण्यासाठी सक्ती करीत आहेत, अशी माहिती काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी मराठीवर उपजीविका असणाऱ्यांनी शुल्क भरल्यास त्यात काही वावगे नाही. त्यांच्याकडून हे मराठीसाठी दान समजले जाईल. तसेच मराठीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १० रुपये द्यावे, असेही आवाहन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी कमीतकमी १० रुपये व जास्तीतजास्त १०० रुपये दिले तरी आयोजकांना चालणार आहे. ही बाब उघडपणे केली जाणार नसली तरी हा निधी घेतला जाणार आहे. संमेलनासाठी आतापर्यंत एक कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. अन्य माध्यमांतून आणखी ६० लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. निधी कमी जमा झाल्याने विविध मार्गांनी मदत कशी मिळेल, यावर आयोजकांचा अधिक भर आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना वेठीस धरले जात आहे, अशी भावना काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. साहित्य संमेलन हा उत्सव नाही. तरी त्याला उत्सवाचे स्वरूप आले आहे. उत्सवप्रिय शिक्षकांना संमेलनात सहभागी होण्याची घाई झाली आहे. खरोखर विद्यादान करणारे शिक्षक संमेलनापासून दूर राहिल्यास तेथे केवळ उत्सवप्रिय शिक्षकांची गर्दी दिसू शकते. संमेलनास चाळिशीच्या पुढील वर्ग उपस्थित असतो. सध्याची पिढी ही मराठीऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याने तिला संमेलनाविषयी आवड व अप्रूप नाही. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही कितपत सहभागी होतील, याविषयी शंकाच व्यक्त होत आहे. केडीएमसीच्या क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन होत आहे. मात्र, तेथे पालिकेचे अवघे दोन सुरक्षा कर्मचारी असल्याने ते अपुरे पडत आहेत. त्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याने चौकी उभारावी, अशी विनंती पालिकेने केली होती. मात्र, चौकी उभारणे शक्य नसून २ फेब्रुवारीपासून २४ तास बंदोबस्त ठेवला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.क्रीडासंकुलात पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा, मैदान असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, रात्री मैदानात मद्यपान, चरस, गांजा आदी अमली पदार्थांचे खुलेआम सेवन केले जाते. भुरट्या चोरांनी बाथरूममधील नळ आदी साहित्य चोरून नेले आहे. स्वच्छतागृहही खराब करतात. त्यामुळे चौकी उभारावी, अशी विनंती पालिकेने आगरी युथ फोरमने केली होती. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे चौकी उभारणे शक्य नाही. मात्र, मान्यवर येणार असल्याने २ फेब्रुवारीपासून २४ तास बंदोबस्त तैनात केला जाईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, यामुळे संमेलन पाच एकर जागेवर भरणार असून दोन खाजगी सुरक्षारक्षक कसे पुरतील, असा प्रश्न आयोजकांना आहे.