शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

संमेलनाला शिक्षकांची उपस्थिती रोडावणार?

By admin | Updated: January 30, 2017 01:55 IST

शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांकडून तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

जान्हवी मोर्ये, डोंबिवलीशहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांकडून तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात नाराजीचा सूर असून ते संमेलनाला पाठ दाखवण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलनाला मराठी हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिक्षकांना संमेलनास उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांना तीन दिवस भरपगारी रजा दिली जाणार आहे. मात्र, दुसरीकडे आयोजकांनी त्यांना संमेलनात सहभागी होण्यासाठी शुल्कात सूट दिलेली नाही. त्यांच्याकडून तीन हजारांचे शुल्क आकारले जाणार आहे. ते भरण्यास शिक्षक तयार नाहीत. परंतु, अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना संमेलनात सहभागी होण्यासाठी सक्ती करीत आहेत, अशी माहिती काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी मराठीवर उपजीविका असणाऱ्यांनी शुल्क भरल्यास त्यात काही वावगे नाही. त्यांच्याकडून हे मराठीसाठी दान समजले जाईल. तसेच मराठीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १० रुपये द्यावे, असेही आवाहन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी कमीतकमी १० रुपये व जास्तीतजास्त १०० रुपये दिले तरी आयोजकांना चालणार आहे. ही बाब उघडपणे केली जाणार नसली तरी हा निधी घेतला जाणार आहे. संमेलनासाठी आतापर्यंत एक कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. अन्य माध्यमांतून आणखी ६० लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. निधी कमी जमा झाल्याने विविध मार्गांनी मदत कशी मिळेल, यावर आयोजकांचा अधिक भर आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना वेठीस धरले जात आहे, अशी भावना काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. साहित्य संमेलन हा उत्सव नाही. तरी त्याला उत्सवाचे स्वरूप आले आहे. उत्सवप्रिय शिक्षकांना संमेलनात सहभागी होण्याची घाई झाली आहे. खरोखर विद्यादान करणारे शिक्षक संमेलनापासून दूर राहिल्यास तेथे केवळ उत्सवप्रिय शिक्षकांची गर्दी दिसू शकते. संमेलनास चाळिशीच्या पुढील वर्ग उपस्थित असतो. सध्याची पिढी ही मराठीऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याने तिला संमेलनाविषयी आवड व अप्रूप नाही. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही कितपत सहभागी होतील, याविषयी शंकाच व्यक्त होत आहे. केडीएमसीच्या क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन होत आहे. मात्र, तेथे पालिकेचे अवघे दोन सुरक्षा कर्मचारी असल्याने ते अपुरे पडत आहेत. त्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याने चौकी उभारावी, अशी विनंती पालिकेने केली होती. मात्र, चौकी उभारणे शक्य नसून २ फेब्रुवारीपासून २४ तास बंदोबस्त ठेवला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.क्रीडासंकुलात पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा, मैदान असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, रात्री मैदानात मद्यपान, चरस, गांजा आदी अमली पदार्थांचे खुलेआम सेवन केले जाते. भुरट्या चोरांनी बाथरूममधील नळ आदी साहित्य चोरून नेले आहे. स्वच्छतागृहही खराब करतात. त्यामुळे चौकी उभारावी, अशी विनंती पालिकेने आगरी युथ फोरमने केली होती. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे चौकी उभारणे शक्य नाही. मात्र, मान्यवर येणार असल्याने २ फेब्रुवारीपासून २४ तास बंदोबस्त तैनात केला जाईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, यामुळे संमेलन पाच एकर जागेवर भरणार असून दोन खाजगी सुरक्षारक्षक कसे पुरतील, असा प्रश्न आयोजकांना आहे.