शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

माणसांपेक्षा वन्यप्राणी अधिक सिव्हीलाईज; प्रकाश आमटेंची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 13:59 IST

माणसांच्या कृत्यांना पशूची उपमाही देता येणार नाही.

कल्याण: समाजात काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी सकाळचे वर्तमान पत्र उघडले की त्यात बलात्कार, चोऱ्या, खून अशा बातम्या वाचायला मिळतात. अगदी गाडी ओव्हरटेक केली म्हणून राग येऊन हाणामारी होते. अशावेळी माणसाला पशूची उपमा दिली जाते. मात्र, माणसांच्या कृत्यांना पशूची उपमाही देता येणार नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर मनुष्यपेक्षा वन्यप्राणी चांगले आहेत, असेही त्यांनी म्हटले.  आदिवासी भागात काम करीत असताना अनाथ असलेले सिंह, वाघ, आसवल, तरस यासारखे प्राणी आम्ही पाळले आहेत. अगदी विषारी साप सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी कधीही मला इजा पोहचविली नाही. माणसाने त्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांनी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत प्रवेश केला असेल, ही बाबही आमटे यांनी नमूद केली. माणसाने सुसंस्कृत असायले हवे. माणूस सिव्हीलाईज झाला असे म्हणण्याऐवजी पशू सिव्हीलाईज चांगल्या प्रकारे झाला आहे, असे म्हणायची वेळ आली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आमटे यांच्या सहचरिणी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी आमटे यांनी सांगितले की, आज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर बलात्कार केले जात आहे. मुलीची भ्रूणहत्या होत आहे. हे प्रकार आदिवासी समाजात घडत नाही. ते सुसंस्कृत नागरी जीवनापेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत. आदिवासी समाजाकडे शिक्षण नाही. त्यांची जीवनशैली ठरलेली आहे. त्यांच्या समाजाने ती मान्य केलेली आहे. स्त्री-भ्रूण आणि बलात्काराच्या घटनेपासून ते दूर आहेत. त्यांच्या समाजात ते घडत नाही. त्याचा त्यांना अभिमान असल्याचे मंदाकिनी आपटे यांनी सांगितले. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवRapeबलात्कार