शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

माणसांपेक्षा वन्यप्राणी अधिक सिव्हीलाईज; प्रकाश आमटेंची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 13:59 IST

माणसांच्या कृत्यांना पशूची उपमाही देता येणार नाही.

कल्याण: समाजात काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी सकाळचे वर्तमान पत्र उघडले की त्यात बलात्कार, चोऱ्या, खून अशा बातम्या वाचायला मिळतात. अगदी गाडी ओव्हरटेक केली म्हणून राग येऊन हाणामारी होते. अशावेळी माणसाला पशूची उपमा दिली जाते. मात्र, माणसांच्या कृत्यांना पशूची उपमाही देता येणार नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर मनुष्यपेक्षा वन्यप्राणी चांगले आहेत, असेही त्यांनी म्हटले.  आदिवासी भागात काम करीत असताना अनाथ असलेले सिंह, वाघ, आसवल, तरस यासारखे प्राणी आम्ही पाळले आहेत. अगदी विषारी साप सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी कधीही मला इजा पोहचविली नाही. माणसाने त्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांनी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत प्रवेश केला असेल, ही बाबही आमटे यांनी नमूद केली. माणसाने सुसंस्कृत असायले हवे. माणूस सिव्हीलाईज झाला असे म्हणण्याऐवजी पशू सिव्हीलाईज चांगल्या प्रकारे झाला आहे, असे म्हणायची वेळ आली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आमटे यांच्या सहचरिणी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी आमटे यांनी सांगितले की, आज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर बलात्कार केले जात आहे. मुलीची भ्रूणहत्या होत आहे. हे प्रकार आदिवासी समाजात घडत नाही. ते सुसंस्कृत नागरी जीवनापेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत. आदिवासी समाजाकडे शिक्षण नाही. त्यांची जीवनशैली ठरलेली आहे. त्यांच्या समाजाने ती मान्य केलेली आहे. स्त्री-भ्रूण आणि बलात्काराच्या घटनेपासून ते दूर आहेत. त्यांच्या समाजात ते घडत नाही. त्याचा त्यांना अभिमान असल्याचे मंदाकिनी आपटे यांनी सांगितले. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवRapeबलात्कार