शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बायकोच म्हणते, नवऱ्याची नसबंदी नको गं बाई! प्रगतशील महाराष्ट्रातलं जळजळीत वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 08:44 IST

Sterilization in Maharashtra: नसबंदी फक्त स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाल्यासारखी स्थिती आहे, असे एका बाजूला आकडेवारीवरून दिसत असले तरी, यामागचे वास्तव मात्र वेगळेच आहे

कोल्हापूर : नवऱ्याच्या नसबंदीला बायकोकडूनच विरोध होत असल्याचे कोल्हापूर या प्रगतशील जिल्ह्यातील वास्तव आहे. स्त्रिया स्वत:ची शस्त्रक्रिया करून घेतात; पण नवऱ्याला करू देत नाहीत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत केवळ ११ टक्के पुरुष शस्त्रक्रिया झाल्या आहेत. याऊलट नंदूरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात हेच प्रमाण ७० टक्के आहे. नवऱ्याची शक्ती कमी होण्याचे स्त्रियांच्या मनात वर्षानुवर्षे साचलले गैरसमजाचे मळभ दूर केले, तरच नसबंदीला मान्यता मिळणार आहे.

नसबंदी फक्त स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाल्यासारखी स्थिती आहे, असे एका बाजूला आकडेवारीवरून दिसत असले तरी, यामागचे वास्तव मात्र वेगळेच आहे. कुटुंबनियोजनअंतर्गत नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, तर बायको पटकन पुढे येते. नवऱ्याने इच्छा व्यक्त केली तरीदेखील बायको तयार होत नाही. त्यामुळे २०१८ पासून मार्च २०२० पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर ७८. ६२ टक्के शस्त्रक्रिया या स्त्रियांच्या झाल्या आहेत, तर केवळ ९ टक्केच पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

गेल्यावर्षी मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यात कुटुंब नियोजनाच्या एकूण १४ हजार ७८ शस्त्रक्रिया झाल्या. त्यापैकी पुरुषांच्या १५२, तर स्त्रियांच्या१३ हजार ९२६ शस्त्रक्रिया झाल्या. यात पुरुष नसबंदीसाठी १६०८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होतेे, त्यापैकी केवळ १५२ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या.

२०१८ मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया -

स्त्री - १३ हजार ३४७ (७५.३१ टक्के)

पुरुष -१७४ (१० टक्के)

२०१९ मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया

-स्त्री -१३ हजार ९२६ (७८.६२ टक्के)

पुरुष - १५२ (९ टक्के )

काय आहेत गैरसमज

नसबंदीविषयी स्त्री आणि पुरुष अशा दोघांमध्ये गैरसमजच जास्त असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार प्रबाेधन करूनही सुशिक्षित लोकदेखील अशिक्षितांसारखेच बोलत असल्याचे अनुभव आरोग्य विभागाला येतात. नसबंदी केली की पुरुषार्थावर परिणाम होईल, त्यांची शक्ती जाईल, त्यांना आयुष्यभराचे अधूपण येईल, अंगमेहनतीची कामे करता येणार नाहीत, असे अनेक गैरसमज मनावर खोलवर रुजले आहेत.

गेल्यावर्षी केवळ दोन टक्के नसबंदी

कोल्हापुरात २०१८ आणि २०१९ अशा मागील दोन वर्षांत १४ हजार ७८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण गेल्यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम झाला. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत स्त्रियांचे उद्दिष्ट १७ हजार ७१३ पैकी केवळ ६ हजार ९३१, तर पुरुषांच्या १६०८ उद्दिष्टापैकी केवळ ३३ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या आहेत. वर्षभरात स्त्रियाची ३९, तर पुरुषांची केवळ २ टक्केच नसबंदी शस्त्रक्रिया झाली.

गैरसमज जास्त असल्यानेच पुरुषांचा नसबंदीचा टक्का स्त्रियांच्या आणि इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी आहे. आरोग्य विभाग सातत्याने जनजागृती करत आहे, पण यावर मानसिकतेत बदल हाच एकमेव उपाय आहे. - डॉ. एफ. ए. देसाई, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र