शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बायकोच म्हणते, नवऱ्याची नसबंदी नको गं बाई! प्रगतशील महाराष्ट्रातलं जळजळीत वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 08:44 IST

Sterilization in Maharashtra: नसबंदी फक्त स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाल्यासारखी स्थिती आहे, असे एका बाजूला आकडेवारीवरून दिसत असले तरी, यामागचे वास्तव मात्र वेगळेच आहे

कोल्हापूर : नवऱ्याच्या नसबंदीला बायकोकडूनच विरोध होत असल्याचे कोल्हापूर या प्रगतशील जिल्ह्यातील वास्तव आहे. स्त्रिया स्वत:ची शस्त्रक्रिया करून घेतात; पण नवऱ्याला करू देत नाहीत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत केवळ ११ टक्के पुरुष शस्त्रक्रिया झाल्या आहेत. याऊलट नंदूरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात हेच प्रमाण ७० टक्के आहे. नवऱ्याची शक्ती कमी होण्याचे स्त्रियांच्या मनात वर्षानुवर्षे साचलले गैरसमजाचे मळभ दूर केले, तरच नसबंदीला मान्यता मिळणार आहे.

नसबंदी फक्त स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाल्यासारखी स्थिती आहे, असे एका बाजूला आकडेवारीवरून दिसत असले तरी, यामागचे वास्तव मात्र वेगळेच आहे. कुटुंबनियोजनअंतर्गत नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, तर बायको पटकन पुढे येते. नवऱ्याने इच्छा व्यक्त केली तरीदेखील बायको तयार होत नाही. त्यामुळे २०१८ पासून मार्च २०२० पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर ७८. ६२ टक्के शस्त्रक्रिया या स्त्रियांच्या झाल्या आहेत, तर केवळ ९ टक्केच पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

गेल्यावर्षी मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यात कुटुंब नियोजनाच्या एकूण १४ हजार ७८ शस्त्रक्रिया झाल्या. त्यापैकी पुरुषांच्या १५२, तर स्त्रियांच्या१३ हजार ९२६ शस्त्रक्रिया झाल्या. यात पुरुष नसबंदीसाठी १६०८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होतेे, त्यापैकी केवळ १५२ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या.

२०१८ मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया -

स्त्री - १३ हजार ३४७ (७५.३१ टक्के)

पुरुष -१७४ (१० टक्के)

२०१९ मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया

-स्त्री -१३ हजार ९२६ (७८.६२ टक्के)

पुरुष - १५२ (९ टक्के )

काय आहेत गैरसमज

नसबंदीविषयी स्त्री आणि पुरुष अशा दोघांमध्ये गैरसमजच जास्त असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार प्रबाेधन करूनही सुशिक्षित लोकदेखील अशिक्षितांसारखेच बोलत असल्याचे अनुभव आरोग्य विभागाला येतात. नसबंदी केली की पुरुषार्थावर परिणाम होईल, त्यांची शक्ती जाईल, त्यांना आयुष्यभराचे अधूपण येईल, अंगमेहनतीची कामे करता येणार नाहीत, असे अनेक गैरसमज मनावर खोलवर रुजले आहेत.

गेल्यावर्षी केवळ दोन टक्के नसबंदी

कोल्हापुरात २०१८ आणि २०१९ अशा मागील दोन वर्षांत १४ हजार ७८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण गेल्यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम झाला. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत स्त्रियांचे उद्दिष्ट १७ हजार ७१३ पैकी केवळ ६ हजार ९३१, तर पुरुषांच्या १६०८ उद्दिष्टापैकी केवळ ३३ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या आहेत. वर्षभरात स्त्रियाची ३९, तर पुरुषांची केवळ २ टक्केच नसबंदी शस्त्रक्रिया झाली.

गैरसमज जास्त असल्यानेच पुरुषांचा नसबंदीचा टक्का स्त्रियांच्या आणि इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी आहे. आरोग्य विभाग सातत्याने जनजागृती करत आहे, पण यावर मानसिकतेत बदल हाच एकमेव उपाय आहे. - डॉ. एफ. ए. देसाई, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र