शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘पत्नी चविष्ट स्वयंपाक करत नाही, हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:49 IST

पत्नी लवकर उठत नाही व ती स्वादिष्ट स्वयंपाकही करत नाही. ती कर्तव्यदक्ष पत्नी नसल्याने, तिच्यापासून घटस्फोट मिळावा, यासाठी एका व्यक्तीने उच्च न्यायालयात अपील केला.

मुंबई : पत्नी लवकर उठत नाही व ती स्वादिष्ट स्वयंपाकही करत नाही. ती कर्तव्यदक्ष पत्नी नसल्याने, तिच्यापासून घटस्फोट मिळावा, यासाठी एका व्यक्तीने उच्च न्यायालयात अपील केला. मात्र, हे घटस्फोटासाठीचे कारण असू शकत नाही, असे म्हणत, उच्च न्यायालयाने त्याचे अपील गुरुवारी फेटाळले.ही वागणूक म्हणजे क्रूरता नाही, असे स्पष्ट करत, न्या. के. के. तातेड आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सांताक्रुझ येथे राहणाºया व्यक्तीने, वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध केलेले अपील निकाली काढले. अर्जदाराने याचिकेद्वारे केलेले आरोप म्हणजे क्रूरता नाही, असा कुुटुंब न्यायालयाने काढलेल्या निष्कर्ष योग्य आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.याचिकाकर्त्याची पत्नी नोकरदार महिला आहे, तरीही ती अतिरिक्त भार सहन करत आहे. किराणा माल भरणे, पती व त्याच्या पालकांसाठी स्वयंपाक करणे आणि अन्य घरगुती कामे ती करत होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. पत्नी स्वादिष्ट स्वयंपाक करत नाही किंवा सकाळी लवकर उठत नाही, हे पतीने केलेले आरोप घटस्फोटाचे कारण म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कुटुंब न्यायालयानेही याच कारणाने घटस्फोट अर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने, याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. कुटुंब न्यायालयाने चुकीचा निर्णय दिल्याचे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे.पत्नीला लवकर उठवायला गेल्यावर, ती मला व माझ्या पालकांना शिवीगाळ करते. ती पुरेसा व स्वादिष्ट स्वयंपाक करत नाही. एके दिवशी मी कामावरून घरी उशिरा परतल्यावर तिने साधे पाणीही मला दिले नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केला आहे. मात्र, पत्नीने सर्व आरोप फेटाळले. कामाला जाण्यापूर्वी मी सर्व कुटुंबीयांसाठी स्वयंपाक करून जात होते, असे पत्नीने न्यायालयाला सांगितले. आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तिने शेजाºयांचे व काही नातेवाइकांचे लेखी जबाबही न्यायालयात सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते याचिकाकर्त्याच्या घरी जायचे, तेव्हा याचिकाकर्त्याची पत्नी घरगुती कामात व्यस्त असायची.पती व त्याचे आई-वडीलच आपल्याला वाईट वागणूक देत असल्याचा आरोप पत्नीने केला. त्यावर न्यायालयाने पत्नी तिच्या पतीला व त्याच्या पालकांना सतत शिवीगाळ करत असे, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे म्हटले. ‘प्रतिवादी (पत्नी) सतत याचिकाकर्त्याला आणि त्याच्या पालकांना शिवीगाळ आणि धमकी देत होती, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. याचिकाकर्ता घरी उशिरा येत आणि त्याची पत्नी स्वादिष्ट स्वयंपाक बनवत नसे व त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करत होती, ही क्रूरता नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.>उच्च न्यायालयाने अपील फेटाळले‘प्रतिवादी एक नोकरदार महिला आहे, हे विसरता येणार नाही. ती काम करून अतिरिक्त भार सहन करत आहे. कामावरून घरी परताना ती भाजी व किराणामाल विकत घेते. तर सकाळी घर सोडण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक करून निघते. त्यामुळे दररोज घरी परतल्यावर पत्नीने एक ग्लास पाणी देण्याच्या पतीच्या अपेक्षेबाबत कुटुंब न्यायालयाने केलेली टीका योग्य आहे,’ असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्याचा अपील फेटाळले.

टॅग्स :Mumbaiमुंबई