शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ का करीत नाही?

By admin | Updated: November 28, 2014 01:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा सातत्याने घसरत असून, विद्यार्थी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहेत. ही स्थिती बदलण्यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले तातडीने

विद्वत परिषद बैठक : सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवरनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा सातत्याने घसरत असून, विद्यार्थी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहेत. ही स्थिती बदलण्यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले तातडीने उचलण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात विचार करून ठोस भूमिका तयार करून विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ करण्याची आवश्यकता असल्याचा सूर विद्वत परिषदेच्या बैठकीत उमटला. गुरुवारी झालेल्या बैठकीत निरनिराळ्या मुद्यांवर सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.नागपूर विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालये व त्यातील अभ्यासक्रम बंद करण्याचे २५ ते ३० प्रस्ताव विद्यापीठासमोर आले आहेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने रोडावते आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून काहीच ठोस पावले उचलण्यात येत नसल्याने, हे प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यापीठ केवळ पदव्या देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. डॉ. बबन तायवाडे यांनी विद्यार्थीसंख्या घटण्याची समस्या संपूर्ण राज्यभरात आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याकडे विद्यार्थी का जातात याचा अभ्यास आवश्यक आहे, अशी सूचना केली.उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.डी.बी.पाटील यांनी विद्यापीठाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. महाविद्यालयांना मान्यता प्रदान करताना तेथे पायाभूत सुविधा आहेत का, याचा विचार विद्यापीठ करते का? क्षमता मूल्यमापनाशिवायच बृहत् आराखडा का बनतो? महाविद्यालयांची व विद्यापीठाची ही दयनीय स्थिती विद्यापीठानेच निर्माण केली आहे. महाविद्यालयांची संख्या एखाद्या चक्रीवादळासारखी वाढत गेली तर असेच चित्र दिसेल, या शब्दात पाटील यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले.(प्रतिनिधी)प्रणालीतच समस्यायावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी विद्यापीठाच्या प्रणालीतच समस्या आहेत, अशी कबुली दिली. विद्यापीठात आजघडीला असंख्य समस्या आहेत. या समस्यांचा तोडगा सदस्यांनी सुचवावा, यासाठी कुठल्याही ‘अजेंडा’ न ठेवता बैठक बोलविण्याची गरज आहे. प्राधिकरणांत अनेकदा समस्यांचे निवारण होत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.