शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ का करीत नाही?

By admin | Updated: November 28, 2014 01:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा सातत्याने घसरत असून, विद्यार्थी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहेत. ही स्थिती बदलण्यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले तातडीने

विद्वत परिषद बैठक : सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवरनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा सातत्याने घसरत असून, विद्यार्थी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहेत. ही स्थिती बदलण्यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले तातडीने उचलण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात विचार करून ठोस भूमिका तयार करून विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ करण्याची आवश्यकता असल्याचा सूर विद्वत परिषदेच्या बैठकीत उमटला. गुरुवारी झालेल्या बैठकीत निरनिराळ्या मुद्यांवर सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.नागपूर विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालये व त्यातील अभ्यासक्रम बंद करण्याचे २५ ते ३० प्रस्ताव विद्यापीठासमोर आले आहेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने रोडावते आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून काहीच ठोस पावले उचलण्यात येत नसल्याने, हे प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यापीठ केवळ पदव्या देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. डॉ. बबन तायवाडे यांनी विद्यार्थीसंख्या घटण्याची समस्या संपूर्ण राज्यभरात आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याकडे विद्यार्थी का जातात याचा अभ्यास आवश्यक आहे, अशी सूचना केली.उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.डी.बी.पाटील यांनी विद्यापीठाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. महाविद्यालयांना मान्यता प्रदान करताना तेथे पायाभूत सुविधा आहेत का, याचा विचार विद्यापीठ करते का? क्षमता मूल्यमापनाशिवायच बृहत् आराखडा का बनतो? महाविद्यालयांची व विद्यापीठाची ही दयनीय स्थिती विद्यापीठानेच निर्माण केली आहे. महाविद्यालयांची संख्या एखाद्या चक्रीवादळासारखी वाढत गेली तर असेच चित्र दिसेल, या शब्दात पाटील यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले.(प्रतिनिधी)प्रणालीतच समस्यायावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी विद्यापीठाच्या प्रणालीतच समस्या आहेत, अशी कबुली दिली. विद्यापीठात आजघडीला असंख्य समस्या आहेत. या समस्यांचा तोडगा सदस्यांनी सुचवावा, यासाठी कुठल्याही ‘अजेंडा’ न ठेवता बैठक बोलविण्याची गरज आहे. प्राधिकरणांत अनेकदा समस्यांचे निवारण होत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.