शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्त वाकडे यांना बदलीनंतरही ‘रिलिव्ह’ का नाही?

By admin | Updated: August 22, 2016 00:41 IST

आयुक्त सी. एच. वाकडे यांची महानिरीक्षक पदोन्नतीवर बदली होऊन तीन आठवडे उलटत आले तरी त्यांना अद्याप ‘रिलिव्ह’ करण्यात आलेले नाही

पुणे : गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे यांची महानिरीक्षक पदोन्नतीवर बदली होऊन तीन आठवडे उलटत आले तरी त्यांना अद्याप ‘रिलिव्ह’ करण्यात आलेले नाही. वाकडे यांच्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आग्रही असून त्यांना पुण्यातच ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपद महानिरीक्षक दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आयुक्तालयामार्फत तसा प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे वाकडे बदलीच्या ठिकाणी का जात नाहीत, तसेच आयुक्तही त्यांना का सोडत नाहीत याची उलटसुलट चर्चा पोलीस दलासह पुणेकरांमध्ये रंगली आहे.शासनाच्या गृह विभागाने २८ जुलै रोजी सी. एच. वाकडे आणि चंद्रशेखर दैठणकर यांना महानिरीक्षकपदी पदोन्नती दिली. यापूर्वी पुण्यात काम केलेल्या दैठणकरांना नागपूरहून पुन्हा पदोन्नतीवर पुण्यातीलच राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या संचालकपदी नेमण्यात आले. तर वाकडे यांना तुरुंग प्रशासनाच्या मुख्यालय महानिरीक्षकपदी नेमण्यात आले. सध्या पुण्यामध्ये अतिरिक्त आयुक्तपदाच्या चार जागा आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दक्षिण आणि उत्तर विभागाचे दोन तर प्रशासन आणि गुन्हे शाखेचे प्रत्येकी एक अशी चार पदे आहेत. यातील उत्तर आणि दक्षिणची पदे बराच काळ रिक्त होती. त्याचा अतिरिक्त कार्यभारही वाकडे यांच्याकडेच होता. काही महिन्यांपूर्वीच शशिकांत शिंदे यांची उत्तर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाली. गुन्हे शाखेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांची पदोन्नतीने कारागृह विभागात जून २०१५मध्ये बदली झाली होती.मुंबईच्या पीसीआरमधून वाकडे यांनी पुण्याला अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली. वाकडे यांनी नागपूरला काम केले असल्यामुळे तो अनुभव पुण्याला येण्यामध्ये उपयोगी आल्याची चर्चा त्या वेळी रंगली होती. वाकडे यांनी यापूर्वी पुण्यात काम केलेले आहेच. यासोबतच तेलगी प्रकरणाचा तपासही त्यांनी केला आहे. पुण्यामध्ये येऊन एक वर्ष झालेल्या वाकडेंना पदोन्नती मिळाल्यावर त्यांना नेमणुकीच्या ठिकाणी जाण्यासाठी सोडणे आवश्यक होते. मात्र, त्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे त्यांनी प्रत्यक्ष भेटून सोडण्याविषयी विनंती केली होती. मात्र, आयुक्तांनी त्याला नकार देत हे पदच उन्नत करून घेण्याविषयी चर्चा केली होती. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपद महानिरीक्षक दर्जाचे झाल्यास शहरामध्ये दोन महानिरीक्षक होतील. सध्या कायदा-सुव्यवस्थेची प्रमुख जबाबदारी असलेल्या सह आयुक्त सुनील रामानंद यांच्या बदलीचीही मध्यंतरी बरीच चर्चा झाली होती. त्यांची बदली झाल्यावर वाकडे सह आयुक्त होतील अशीही अटकळ बांधण्यात येत होती. शहर पोलीस दलाला शिस्तीचा बडगा उगारून ‘सुतासारखे सरळ’ आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामानंद यांचा बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धसका घेतलेला आहे. त्यातच पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर शुक्ला यांनीही शिस्तीचा बडगा उगारला. मात्र, पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्यांच्या प्रकरणात मॅट कोर्टामध्ये नामुष्की ओढवलेल्या अतिवरिष्ठांना आपल्या आदेशापासून माघार घ्यावी लागली. >कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे कारण ?सध्या शहर पोलीस दलामध्ये सह आयुक्त सुनील रामानंद यांचे खात्यांतर्गत माहितीचे जाळे मजबूत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यापासून आयुक्तालयापर्यंतच्या बारीकसारीक घटनांची त्यांना माहिती मिळते. अशातच पोलीस आयुक्तांना मात्र आपल्या हक्काचे अधिकारी हवे आहेत. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र, महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. सध्याची शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता पाहता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे वाकडेंना सोडण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे तितकेसे तर्कसुसंगत नाही. ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ या म्हणीचा प्रत्यय सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे. पोलीस दलामध्ये पुणे शहर हे स्वतंत्र ‘केडर’ मानले जाते. त्यामुळेच की काय परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुण्याचा मोह सुटत नसल्याचे चित्र आहे.