शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अतिरिक्त आयुक्त वाकडे यांना बदलीनंतरही ‘रिलिव्ह’ का नाही?

By admin | Updated: August 22, 2016 00:41 IST

आयुक्त सी. एच. वाकडे यांची महानिरीक्षक पदोन्नतीवर बदली होऊन तीन आठवडे उलटत आले तरी त्यांना अद्याप ‘रिलिव्ह’ करण्यात आलेले नाही

पुणे : गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे यांची महानिरीक्षक पदोन्नतीवर बदली होऊन तीन आठवडे उलटत आले तरी त्यांना अद्याप ‘रिलिव्ह’ करण्यात आलेले नाही. वाकडे यांच्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आग्रही असून त्यांना पुण्यातच ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपद महानिरीक्षक दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आयुक्तालयामार्फत तसा प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे वाकडे बदलीच्या ठिकाणी का जात नाहीत, तसेच आयुक्तही त्यांना का सोडत नाहीत याची उलटसुलट चर्चा पोलीस दलासह पुणेकरांमध्ये रंगली आहे.शासनाच्या गृह विभागाने २८ जुलै रोजी सी. एच. वाकडे आणि चंद्रशेखर दैठणकर यांना महानिरीक्षकपदी पदोन्नती दिली. यापूर्वी पुण्यात काम केलेल्या दैठणकरांना नागपूरहून पुन्हा पदोन्नतीवर पुण्यातीलच राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या संचालकपदी नेमण्यात आले. तर वाकडे यांना तुरुंग प्रशासनाच्या मुख्यालय महानिरीक्षकपदी नेमण्यात आले. सध्या पुण्यामध्ये अतिरिक्त आयुक्तपदाच्या चार जागा आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दक्षिण आणि उत्तर विभागाचे दोन तर प्रशासन आणि गुन्हे शाखेचे प्रत्येकी एक अशी चार पदे आहेत. यातील उत्तर आणि दक्षिणची पदे बराच काळ रिक्त होती. त्याचा अतिरिक्त कार्यभारही वाकडे यांच्याकडेच होता. काही महिन्यांपूर्वीच शशिकांत शिंदे यांची उत्तर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाली. गुन्हे शाखेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांची पदोन्नतीने कारागृह विभागात जून २०१५मध्ये बदली झाली होती.मुंबईच्या पीसीआरमधून वाकडे यांनी पुण्याला अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली. वाकडे यांनी नागपूरला काम केले असल्यामुळे तो अनुभव पुण्याला येण्यामध्ये उपयोगी आल्याची चर्चा त्या वेळी रंगली होती. वाकडे यांनी यापूर्वी पुण्यात काम केलेले आहेच. यासोबतच तेलगी प्रकरणाचा तपासही त्यांनी केला आहे. पुण्यामध्ये येऊन एक वर्ष झालेल्या वाकडेंना पदोन्नती मिळाल्यावर त्यांना नेमणुकीच्या ठिकाणी जाण्यासाठी सोडणे आवश्यक होते. मात्र, त्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे त्यांनी प्रत्यक्ष भेटून सोडण्याविषयी विनंती केली होती. मात्र, आयुक्तांनी त्याला नकार देत हे पदच उन्नत करून घेण्याविषयी चर्चा केली होती. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपद महानिरीक्षक दर्जाचे झाल्यास शहरामध्ये दोन महानिरीक्षक होतील. सध्या कायदा-सुव्यवस्थेची प्रमुख जबाबदारी असलेल्या सह आयुक्त सुनील रामानंद यांच्या बदलीचीही मध्यंतरी बरीच चर्चा झाली होती. त्यांची बदली झाल्यावर वाकडे सह आयुक्त होतील अशीही अटकळ बांधण्यात येत होती. शहर पोलीस दलाला शिस्तीचा बडगा उगारून ‘सुतासारखे सरळ’ आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामानंद यांचा बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धसका घेतलेला आहे. त्यातच पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर शुक्ला यांनीही शिस्तीचा बडगा उगारला. मात्र, पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्यांच्या प्रकरणात मॅट कोर्टामध्ये नामुष्की ओढवलेल्या अतिवरिष्ठांना आपल्या आदेशापासून माघार घ्यावी लागली. >कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे कारण ?सध्या शहर पोलीस दलामध्ये सह आयुक्त सुनील रामानंद यांचे खात्यांतर्गत माहितीचे जाळे मजबूत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यापासून आयुक्तालयापर्यंतच्या बारीकसारीक घटनांची त्यांना माहिती मिळते. अशातच पोलीस आयुक्तांना मात्र आपल्या हक्काचे अधिकारी हवे आहेत. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र, महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. सध्याची शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता पाहता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे वाकडेंना सोडण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे तितकेसे तर्कसुसंगत नाही. ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ या म्हणीचा प्रत्यय सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे. पोलीस दलामध्ये पुणे शहर हे स्वतंत्र ‘केडर’ मानले जाते. त्यामुळेच की काय परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुण्याचा मोह सुटत नसल्याचे चित्र आहे.