शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

बदायूँतील गुन्ह्याची कठोर कलमान्वये नोंद का नाही?

By admin | Updated: June 2, 2014 23:29 IST

अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कठोर कलमान्वये का केली नाही ते स्पष्ट करावे, अशी विचारणा केंद्राने उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.

केंद्राची राज्याला विचारणा : दुबळ्या वर्गावर अत्याचाराचेच प्रकरण
नवी दिल्ली : बदायूँ येथील दोन बहिणींवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाची नोंद अनुसूचित जाती-अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कठोर कलमान्वये का केली नाही ते स्पष्ट करावे, अशी विचारणा केंद्राने उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे. 
गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले, कायदा आहे, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीला अत्याचारापासून वाचविण्यासाठी तो बनविला गेला आहे. बदायूँचे प्रकरण हे दुबळ्य़ा वर्गावर केलेल्या अत्याचाराचे स्पष्ट उदाहरण आहे. राज्य सरकारने आरोपींविरुद्ध अत्याचार प्रतिबंध कायदा का लावला नाही हे आपल्याला ठाऊक नाही. हा एक गंभीर गुन्हा  आहे आणि दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रानेही बदायूँ हत्येचा निषेध केला आहे.  
सीपीआयची राज्यभर निदर्शने
लखनौ- सामूहिक बलात्कार व हत्येच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (सीपीआय) राज्यभर निदर्शने करण्याचे निश्चित केले आहे. 
 
पासवान पीडितांना भेटले
-बदायूँ- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी येथील सामूहिक बलात्कार व हत्येला बळी पडलेल्या दोन मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांची मागणी पंतप्रधानांसमोर ठेवण्याचे आश्वासन दिले.
- यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अद्याप पीडित कुटुंबाला भेट न दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 
 
 
तसेच यामागे राज्य सरकार व आरोपींदरम्यान काही साटेलोटे असल्याच्या शक्यतेकडेही अंगुलनिर्देश केला. 
पासवान यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव चिराग पासवान होते जे अलीकडेच लोकसभेत निवडून आले असून पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. यावेळी चिराग पासवान यांनी सरकार नागरिकांना वीज व पाणी उपलब्ध करून देण्यात असक्षम असले तरी किमान सुरक्षा पुरवू शकते, सुरक्षेचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सरकारने पुरविलाच पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मुलायमसिंग यांच्या, बलात्कारी मुलांना फाशी दिले जाऊ नये या वक्तव्याने आरोपींना बलात्काराला प्रेरित केल्याची शक्यता व्यक्त केली.
या कुटुंबाला भेट दिल्यानंतर रामविलास पासवान यांनी, हे कुटुंब अतिशय भयभीत असून या गावात एक कायमस्वरुपी पोलीस ठाणो असावे अशी मागणी व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी वेगाने व निर्भया प्रकरणाप्रमाणोच केली जावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. आरोपींना कठोरतम शिक्षा दिली जावी ज्यामुळे गुन्हेगारांना जरब  बसेल. या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशीही मागणी केली. यावेळी त्यांनी बलात्काराच्या घटनांचे मुख्य कारण घरोघरी शौचालय नसणो हे असल्याचे सांगितले. सुलभ शौचालयाची व्यवस्था सर्व देशभरात केली जाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या पीडित कुटुंबाने राज्य सरकारकडून नुकसानभरपाईची रक्कम घेण्यास नकार दिल्याचे सांगून पासवान यांनी, त्यांना फक्त न्याय हवा आहे असे म्हटले.
उसहैत गावातील कटरा सादतगंज भागात मंगळवारी रात्री शौचासाठी म्हणून बाहेर पडलेल्या 14 व 15 वर्षाच्या दोन चुलत बहिणींचे मृतदेह दुस:या दिवशी सकाळी झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळले होते. शवविच्छेदन अहवालात त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते.
 
भाजपाची  निदर्शने
लखनौ : बदायूँ बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारवर दबाव आणण्यासाठी आज भाजपाने येथे निदर्शने केली.  
भाजपाच्या महिला कार्यकत्र्यानी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भाजपा कार्यकत्र्याना पांगविण्यासाठी पाण्याचा मारा केला. यामुळे अनेक कार्यकत्र्याना जखमा झाल्याचे पक्ष कार्यकत्र्याचे म्हणणो होते.