शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मराठवाड्याला एवढे पाणी हवे कशाला?

By admin | Updated: November 19, 2015 02:05 IST

गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा

मुंबई : गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, नऊ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. पिण्यासाठी एवढे पाणी मुबलक असल्याने उर्वरित पाणी जायकवाडीमध्ये सोडण्यात येऊ नये, अशी अंतरिम मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.संबंधित याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत, उच्च न्यायालयाने पाणीप्रश्नावरील याचिकांची सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. ‘जीएमआयडीसी’ने नाशिक-नगरच्या धरणांमधून जायकवाडीला १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी पिण्यासाठी आणि पिकांसाठी सोडण्यात येत आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. ‘जीएमआयडी’च्या निर्णयाला नाशिक-नगरकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवर अंतरिम दिलासा देताना, उच्च न्यायालयाने नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्यासाठी केवळ पिण्यापुरतेच पाणी सोडण्यात यावे, असा आदेश ‘जीएमआयडीसी’ला दिला.पिण्यापुरते पाणी सोडण्याचा आदेश असतानाही राज्य सरकार मराठवाड्याला १२.८४ टीएमसी पाणी सोडणार आहे. त्यात पिण्यासाठी आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकारला मराठवाड्याला पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, याचा हिशेब करून, तेवढेच पाणी सोडण्याचा आदेश द्यावा. उर्वरित ३. ८४ टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये सोडू नये, अशी मागणी करणारा अर्ज न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारपासूनच उच्च न्यायालयाला मूळ याचिकांवर अंतिम सुनावणी घेणे बंधनकारक होते. मात्र, याचिकाकर्ते अंतिम युक्तिवादासाठी तयार नसल्याने, खंडपीठाने त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम सुनावणीची तारीख पुढे ढकण्यासंदर्भातील आदेश घेऊन येण्यास सांगितले.