शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

मराठवाड्याला एवढे पाणी हवे कशाला?

By admin | Updated: November 19, 2015 02:05 IST

गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा

मुंबई : गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, नऊ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. पिण्यासाठी एवढे पाणी मुबलक असल्याने उर्वरित पाणी जायकवाडीमध्ये सोडण्यात येऊ नये, अशी अंतरिम मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.संबंधित याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत, उच्च न्यायालयाने पाणीप्रश्नावरील याचिकांची सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. ‘जीएमआयडीसी’ने नाशिक-नगरच्या धरणांमधून जायकवाडीला १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी पिण्यासाठी आणि पिकांसाठी सोडण्यात येत आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. ‘जीएमआयडी’च्या निर्णयाला नाशिक-नगरकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवर अंतरिम दिलासा देताना, उच्च न्यायालयाने नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्यासाठी केवळ पिण्यापुरतेच पाणी सोडण्यात यावे, असा आदेश ‘जीएमआयडीसी’ला दिला.पिण्यापुरते पाणी सोडण्याचा आदेश असतानाही राज्य सरकार मराठवाड्याला १२.८४ टीएमसी पाणी सोडणार आहे. त्यात पिण्यासाठी आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकारला मराठवाड्याला पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, याचा हिशेब करून, तेवढेच पाणी सोडण्याचा आदेश द्यावा. उर्वरित ३. ८४ टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये सोडू नये, अशी मागणी करणारा अर्ज न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारपासूनच उच्च न्यायालयाला मूळ याचिकांवर अंतिम सुनावणी घेणे बंधनकारक होते. मात्र, याचिकाकर्ते अंतिम युक्तिवादासाठी तयार नसल्याने, खंडपीठाने त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम सुनावणीची तारीख पुढे ढकण्यासंदर्भातील आदेश घेऊन येण्यास सांगितले.