शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

अनंत चतुर्दशीलाच बाप्पाचं विसर्जन का केलं जातं ? याचे कारण असे की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 06:20 IST

 ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी पाहुणचार घ्यायला आलेले लाडके गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतणार आहेत. पण अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ?

ठळक मुद्देअनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाहीकधी कधी भाद्रपद पौर्णिमेच्याच दिवशी अपराण्हकाळी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा असेल तर त्याच दिवशी महालयारंभ व प्रतिपदा श्राद्ध असते. महालयारंभापासून पितृपक्ष सुरू होतो. याच वर्षी उद्या बुधवारी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी महालयारंभ आलेला आहे.

मुंबई, दि. 5 - ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी पाहुणचार घ्यायला आलेले लाडके गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतणार आहेत. गणपतीबाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्याच दिवशी का करतात याबाबत माहिती दिली आहे खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी. 

आज मंगळवार, ५ सप्टेंबर, अनंत चतुर्दशी! आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे. तरीही आज संपूर्ण दिवस गणेशमूर्तींचे विसर्जन करायला हरकत नाही. अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. पण मग अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ? याचे कारण असे की, कधी कधी भाद्रपद पौर्णिमेच्याच दिवशी अपराण्हकाळी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा असेल तर त्याच दिवशी महालयारंभ व प्रतिपदा श्राद्ध असते. महालयारंभापासून पितृपक्ष सुरू होतो. याच वर्षी उद्या बुधवारी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी महालयारंभ आलेला आहे. म्हणून गणेशमूर्ती विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून अनंत चतुर्दशी हा ठरविलेला आहे.

त्यामुळे आज गणेशमूर्तींचे विसर्जन होते आहे. या वर्षी दशमी तिथीची वृद्धी (म्हणजे दशमी तिथी दोन दिवस सूर्योदयाला) झाल्यामुळे बाराव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. आज मंगळवार असला तरी गणेशमूर्तींचे विसर्जन करावयाचे आहे. कारण मंगळवारचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. गणेशोत्सवाचे हे दिवस खूप आनंदात जात असतात. गणपतीचे आणि आपले एक जिव्हाळ्याचे नाते तयार होते. गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यावर घर काय किंवा मंडप काय ओकाओका वाटू लागतो. गणेशोत्सवाचे हे दिवस संपूच नयेत असे सर्वांना वाटत असते. म्हणून गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी भक्तांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडतात की ‘गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!’

आज सर्व जण शेवटच्या आरतीच्या वेळी एकत्र येतात, परंतु उत्साह नसतो. कारण आज बाप्पाला निरोप द्यायचा असतो. वातावरण गंभीर असते. प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून मूर्तीमध्ये देवत्व आणलेले असते, मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तरपूजेनंतर मंत्र म्हणून ते देवत्व काढून घ्यायचे असते. आरतीनंतर घरातील सर्व मंडळी आपापल्या मनात श्रीगणेशाची प्रार्थना करीत असतात. खरं म्हटलं तर जे आपण गणेशाकडे मागत असतो ते मिळविणे आपल्याच हाती असते. म्हणूनच स्वत:च्या प्रगतीसाठी आपणच प्रयत्न करावयास हवेत.

घरातील सर्वांनी प्रार्थना करून झाल्यावर गणेशाने लवकर पुन्हा येण्यासाठी त्याच्या हातावर दही घातले जाते. आणि नमस्कार करून मंत्र म्हटले जातात...‘यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवम्।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनायच ।।आवाहितदेवतां विसर्जयामि ।।'नंतर मूर्ती विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होतो. सर्व जण आपल्या आवडत्या बाप्पाच्या नावाचा जयघोष करीत असतात आणि बाप्पाला विनंती करीत असतात...‘गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!’- दा. कृ. सोमण,पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन