शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

कर्जमाफीमुळे सरकारच्या पोटात का दुखते? शरद पवार यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 03:05 IST

अडचणीत सापडलेल्या शेतक-याला कर्जमाफी द्यायचे म्हटले की, सरकारच्या पोटात दुखते. मात्र, गेल्या १५ दिवसांत राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे दिले, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

अकलूज (ता़.माळशिरस, जि़.सोलापूर) : अडचणीत सापडलेल्या शेतक-याला कर्जमाफी द्यायचे म्हटले की, सरकारच्या पोटात दुखते. मात्र, गेल्या १५ दिवसांत राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे दिले, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.अकलूज येथे रत्नाई महिला वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते़ या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील आदी नेते उपस्थित होते.पवार म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ८० हजार कोटी रुपये भरले. मात्र, शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत़ अर्थव्यवस्था समृद्ध करणाºया शेती व्यवसायालाच प्रोत्साहन मिळत नाही़ आज साखरेला किंमत नाही़ भाजपा सरकारला पिकवणा-यांपेक्षा खाणा-यांचीच जास्त चिंता आहे. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका पवार यांनी मांडली.‘ते’ बाहेरचे लोक शोधा-कोरेगाव-भीमामध्ये स्थानिकांमुळे नव्हे, तर बाहेरच्या लोकांनी हिंसाचार केला. सरकारने त्या बाहेरच्यांना शोधून कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही पवार यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना केली.दोन्ही काँग्रेसमध्ये एकी-नागपूर अधिवेशनानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आले असून, आता या सरकारच्या विरोधात एकत्रित काम करण्याची भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी