शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्याला विमानात चढण्यापासून का रोखले नाही? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 20, 2017 08:21 IST

विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका म्हणजे एक सोहळाच ठरला. मल्ल्यांच्या औटघटकेच्या अटकेचे श्रेय जे घेत आहेत त्यांनी ‘सुटके’चे श्रेयसुद्धा घ्यावे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 20 - ब्रिटनमध्ये विजय मल्ल्याला झालेली अटक आणि सुटकेवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारच्या बरोबरीने विमान कंपन्यांवर निशाणा साधला आहे. विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका म्हणजे एक सोहळाच ठरला. मल्ल्यांच्या औटघटकेच्या अटकेचे श्रेय जे घेत आहेत त्यांनी ‘सुटके’चे श्रेयसुद्धा घ्यावे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
‘मल्ल्यास पकडून कधी आणणार?’ असे सवाल देशात सातत्याने विचारले जात आहेत. काँग्रेस राजवटीत मल्ल्यांनी कर्ज घेतले व बुडवले, पण भाजप राजवटीत हे महाशय पळून गेले. तेव्हा सरकारी यंत्रणा झोपा काढत होती काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. 
 
हिंदुस्थानी विमान कंपन्यांचा पाहुणचार घेतच ते लंडन येथे उतरले व तेव्हादेखील मल्ल्या यांच्या फसवणुकीचे प्रताप जगजाहीर झालेच होते. मग या ‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्या यांना विमानात चढण्यापासून का रोखले नाही किंवा सरकारी तपास यंत्रणांना कळवून ‘राष्ट्रीय’ इमानदारीचे कर्तव्य का पार पाडले नाही? शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड प्रकरणात विमान कंपन्या ‘बंदी’ हुकूम बजावतात व देश बुडवणाऱ्या मल्ल्यांना पळून जाण्यास मदत करतात. जणू काही मल्ल्यांना पळता यावे यात सरकार आणि विमान कंपन्यांची भागीदारीच होती असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
-  विजय मल्ल्या यांना लंडन येथे हातकडय़ा घातल्या असून पुढील चोवीस तासांत तोंडावर बुरखा घालून त्यांना फरफटत आणले जाईल असे यशस्वी वातावरण ज्यांनी निर्माण केले ते तोंडावर आपटले आहेत. प्रत्यक्षात श्रीमान मल्ल्या हे झटपट जामीन मिळवून पुन्हा लंडनमध्ये हिंडूफिरू लागले आहेत. देशातील बँकांना आठ-नऊ हजार कोटींना चुना लावून विजय मल्ल्या पळून गेले. बँका बुडाल्या आणि मल्ल्या उडाले ते अद्यापि आमच्या हाती लागायला तयार नाहीत. सरकारने त्यांना ‘भगोडा’ घोषित केले. इंग्लंडमध्ये त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी आपण वारंवार करीत असलो तरी त्यास यश आलेले नाही. 
 
-  ‘मल्ल्यास पकडून कधी आणणार?’ असे सवाल देशात सातत्याने विचारले जात आहेत. काँग्रेस राजवटीत मल्ल्यांनी कर्ज घेतले व बुडवले, पण भाजप राजवटीत हे महाशय पळून गेले. तेव्हा सरकारी यंत्रणा झोपा काढत होती काय? पुन्हा मल्ल्या हे काही ‘मि. इंडिया’प्रमाणे अदृश्य वगैरे होऊन पळून गेले नाहीत. हिंदुस्थानी विमान कंपन्यांचा पाहुणचार घेतच ते लंडन येथे उतरले व तेव्हादेखील मल्ल्या यांच्या फसवणुकीचे प्रताप जगजाहीर झालेच होते. मग या ‘देशभक्त’ विमान कंपन्यांनी मल्ल्या यांना विमानात चढण्यापासून का रोखले नाही किंवा सरकारी तपास यंत्रणांना कळवून ‘राष्ट्रीय’ इमानदारीचे कर्तव्य का पार पाडले नाही? 
 
- शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड प्रकरणात विमान कंपन्या ‘बंदी’ हुकूम बजावतात व देश बुडवणाऱ्या मल्ल्यांना पळून जाण्यास मदत करतात. जणू काही मल्ल्यांना पळता यावे यात सरकार आणि विमान कंपन्यांची भागीदारीच होती. देशाला नऊ हजार कोटींना फसवणाऱ्यांपासून धोका नाही, पण न्याय्य हक्कांसाठी जाब विचारणाऱ्यांपासून राष्ट्रीय सुरक्षा आणि आमच्या अर्थव्यवस्थेस भलताच धोका निर्माण झाला आहे. मल्ल्या सापडत नाहीत, सापडले तर इकडे आणता येत नाही, दाऊदला पकडता येत नाही, कुलभूषण जाधवांची फाशी आणि पाकिस्तानची मुजोरी रोखता येत नसली तरी आमचे आंतरराष्ट्रीय धोरण आणि दाबदबाव संपूर्णपणे यशस्वी झालेत असेच म्हणावे लागेल, विजय मल्ल्या प्रकरणात सरकारचे हसे झाले आहे काय यावर आम्ही पामर काय बोलणार! मल्ल्या म्हणे स्वतःच मध्य लंडन पोलीस ठाण्यात हजर झाले व तिथेच अटक दाखवून लंडन पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
 
-  आमच्या देशात आसाराम बापूला जामीन मिळत नाही, आडवाणीसारख्यांच्या डोक्यावर अयोध्या खटल्याची टांगती तलवार ठेवली जाऊ शकते. कुणाला सोडायचे व कुणाला सडवायचे हे कायद्याच्या चौकटीत बसवले जाते व यालाच आमच्याकडे कायद्याचे राज्य म्हणतात, पण नऊ हजार कोटींचा ‘भगोडा’ मात्र लंडनला अटकेचे नाट्य घडवून सुटतो. मल्ल्यांची अटक व सुटका म्हणजे ठरवून लिहिलेली पटकथा तर नसावी ना, या शंकेला वाव आहे. कारण या कायदेशीर प्रक्रियेद्वारा हिंदुस्थानातील प्रत्यार्पणाला मल्ल्यानी एकप्रकारे रोखण्याचाच डाव टाकला असे काही कायदेतज्ञ सांगत आहेत. शिवाय ‘प्रकरण न्यायप्रविष्ट’ झाल्याने इतरही अनेक कायदेशीर पर्याय मल्ल्यांसाठी खुले होऊ शकतात. पुन्हा खालच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात जाण्याचा मार्ग आहेच. या सर्व गोष्टींचा पुरेपूर वापर करून हा खटला बराच काळ चालू ठेवण्याचा प्रयत्न मल्ल्यांना करता येईल. साहजिकच तेवढे त्यांचे प्रत्यार्पण लांबेल. तेव्हा विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका म्हणजे एक सोहळाच ठरला. अशा सोहळ्यातच देश रमला आहे. मल्ल्या जणू बीअरचा ग्लास ओठाला लावत लंडनच्या पोलीस ठाण्यात गेले. तिथे सगळ्यांनी मिळून ‘चिअर्स’ केले, पण बीअरचा उत्साही फेस मात्र इकडच्यांच्या तोंडाला आला. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए! मल्ल्यांच्या औटघटकेच्या अटकेचे श्रेय जे घेत आहेत त्यांनी ‘सुटके’चे श्रेयसुद्धा घ्यावे.