शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

चंद्रकांतदादा, असे का वागलात?

By admin | Updated: January 15, 2015 23:27 IST

शेतकऱ्यांचा संतप्त सवाल : आटपाडीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण?

अविनाश बाड -आटपाडी -रोम जळत असताना निरो राजा उंच टेकडीवर बसून ‘फिडेल’ वाजवत होता. इतिहासातील गाजलेल्या या गोष्टीचा अगदी तसाच जळजळीत अनुभव सध्या आटपाडीतील शेतकरी घेत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पणनमंत्री चंद्रकांत पाटील आटपाडीत आले आणि डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नाऐवजी त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीतच अधिक रस दाखविला. त्यांच्या या भूमिकेने डाळिंब उत्पादकांच्या नैराश्येत भर पडली. नैराश्येचा पहिला बळी बुधवारी गेला. चंद्रकांतदादा, या आत्महत्येस जबाबदार कोण? असा प्रश्न आता संतप्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.शेतमालाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्याने निर्यात कमी होईल आणि देशांतर्गत आवक वाढली, तर मागणीपेक्षा पुरवठा जादा झाल्यास आपोआप स्वस्ताई येईल, या केंद्र शासनाच्या धोरणांमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अत्यंत कमी प्रमाणात डाळिंबाची निर्यात होत असल्याने आणि थंडीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी डाळिंबाची निम्म्या दराने खरेदी सुरू केली आहे.थंडी संपेल आणि दर वाढतील, या आशेने शेतकरी डाळिंबे पक्व होऊनही तोडण्यास उशीर करत आहेत. त्यामुळे हजारो डाळिंबे जमिनीवर पडून फुटत आहेत. ही उललेली डाळिंबे ज्यूस आणि अनारदाना उद्योग बंद असल्याने खरेदी होत नाहीत. त्यामुळे अनेक बागांतून टनाने अशी उलकी डाळिंबे शेतकऱ्यांना अक्षरश: कचऱ्यात फेकून द्यावी लागत आहेत.अशी सगळी इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली असताना, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पणनमंत्री गेल्या रविवारी (दि. ११ जानेवारीला) आटपाडीत मंत्री झाल्यावर पहिल्यांदा आले. स्रेह्यांच्या निवासस्थानी ते रमले. व्यापारी पेठेतून सत्कार स्वीकारत बाजार पटांगणातील कार्यक्रमाच्या स्थळी गेले. राज्यात बदललेल्या सरकारचे मंत्री पहिल्यांदा आटपाडीत आले, म्हणून मोठ्या आशेने तालुकावासीय कार्यक्रमाला आले होते. पण तालुकावासीयांच्या पदरी घोर निराशा पडली. इथला डाळिंब उत्पादकांचा ज्वलंत प्रश्न त्यांना माहीत नसेल, तर इथे येण्यापूर्वी त्यांना कुणीच कशी माहिती दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला. त्यांना शेतकरी, अडतदार भेटले. थोडा वेळ जाता-जाता बाजार समितीतील डाळिंब सौद्यांना भेट देण्याची विनंती केली, पण कसले काय?ते म्हणाले, उपस्थित प्रत्येकांनी मोबाईल काढा आणि मी सांगतो त्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन भाजपचे सदस्य व्हा. ज्या पणन विभागाची शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्याची जबाबदारी आहे आणि ज्या विभागाला नुसत्या आटपाडीतून ६८ लाख रुपये कररूपाने मिळतात, त्या विभागाचे मंत्री आटपाडीत येऊन डाळिंब उत्पादकांची व्यथा समजून घेऊन त्यावर काही उपाययोजना करणार नसतील, तर याला काय म्हणावे?