शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेला ‘टक्का’ कोणाचा? राज्यात ६२.८८% मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 06:19 IST

औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, माढा, सांगली आणि सातारा या सहा ठिकाणी २०१४च्या तुलनेत मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा वा तोट्याचा यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज बांधणे सुरू झाले आहे.

- यदु जोशीमुंबई : राज्यात मंगळवारी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात १४ जागांसाठी सरासरी ६२.८८ मतदान झाले. औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, माढा, सांगली आणि सातारा या सहा ठिकाणी २०१४च्या तुलनेत मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा वा तोट्याचा यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज बांधणे सुरू झाले आहे.औरंगाबादमध्ये काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यात जोरदार चौरंगी लढत झाली. त्यामुळे येथे मतदानाचा टक्का वाढलेला दिसतो. बारामतीत २.७१ टक्के मतदान वाढल्याने दोन्ही बाजूंनी मतदारांचा उत्साह गेल्या वेळेपेक्षा अधिक होता हे स्पष्ट होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात तेथे अटीतटीची लढत दिसते. साताऱ्यात उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) विरुद्ध नरेंद्र पाटील (शिवसेना) या औत्सुक्यपूर्ण लढतीने मतदानाचा टक्का ३.५८ ने वाढविला. सांगलीत संजयकाका पाटील (भाजप), विशाल पाटील (स्वाभिमानी) यांच्यातील थेट लढतीत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पाडळकर यांचेही आव्हान होते. या चुरशीमुळे मतदान वाढले असे मानले जात आहे. माढात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील संघर्षपूर्ण लढतीचे प्रतिबिंब मतदानातही उमटल्याचे दिसते. तेथेही मतदान वाढले. रायगडमध्ये दुहेरी लढत असूनही मतदान कमी झाले.अहमदनगरमध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यात जोरदार लढत असल्याचे वाढलेल्या टक्केवारीवरून दिसते. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेना, स्वाभिमान पक्ष व काँग्रेस अशी तिहेरी लढत असतानाही मतदान ३.८७ टक्क्यांनी कमी झाले. जळगाव, रावेर, जालना, पुणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर व हातकणंगलेमध्ये मतदानाचा टक्का घसरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात काटे की टक्कर असलेल्या हातकणंगलेमध्ये मतदानाचा टक्का गेल्या वेळपेक्षा २.७२ ने घसरला असला तरी ७०.७० टक्के मतदान प्रचंड चुरस दाखविते. कोल्हापुरात २.७२ टक्क्याने मतदान कमी झाले खरे, पण तिथेही सत्तरी गाठली गेली. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात घमासान लढाई आहे.भाजपकडून सातत्याने एक्झिट पोलआतापर्यंत झालेल्या तिन्ही टप्प्यांतील लढतींत नेमका कल कोणाकडे होता हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून सातत्याने नामवंत संस्थांकडून एक्झिट पोल करवून घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई आहे; पण राजकीय पक्ष वा प्रसारमाध्यमे असा एक्झिट पोल त्यांच्या आकलनासाठी घेतात. भाजपने देशातील एका नामवंत कंपनीला हे काम दिले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सत्तेत असल्यानंतर विशिष्ट यंत्रणांकडून अहवाल घेता येतात. तसे ते सातत्याने घेण्याचे कामदेखील सुरू आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019