शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

मुख्यमंत्री पद राहिले बाजूला, आता चर्चा सरकार कुणाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 16:40 IST

मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १८ दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. भाजपला १०५ तर शिवसेनाला ५६ जागांवर विजय मिळाल्याने पुन्हा युतीचेचं सरकार येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे होते, तर भाजप ते देण्यासाठी तयर नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाचा ही चर्चा गेल्या काही दिवस पाहायला मिळत होती. मात्र आता राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, सरकार कुणाची होणार अशी चर्चा सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या बहुमतामुळे पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार येणार असल्याचे निश्चित समजले जात होते. मात्र सत्तेत ५०-५० च्या फॉर्म्युलानुसारच सत्तास्थापना होईल व मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार ह्या अटीवर सेना अडून बसली होती. तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा मुख्यमंत्री आमचाच होणार असे दावा केला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती.

त्यातच भाजपने माघार घेतल्याने राज्यपाल यांनी शिवसेनेला सत्तेस्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सुद्धा दिलेल्या वेळात इतर पक्षाचा पाठींबा असल्याचे पत्र सादर करू न शकल्याने,राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे. मात्र शिवसेनच्या पाठींब्याशिवाय राष्ट्रवादी सुद्धा सत्तास्थापना करू शकत नाही.

तर शिवसेना मुख्यमंत्री पदावर अजूनही अडलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसचे वरिष्ठ नेते याला तयार होतील का ? अशी चर्चा आहे. त्यांनतरचं सत्तास्थापनेचा तिढा सुटणार आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवडे राज्यात मुख्यमंत्री कुणाचा होणार याची चर्चा सुरु असताना आता सरकार कुणाचे येणार अशी चर्चा पाहायला मिळत आहे.