शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुख्यमंत्री पद राहिले बाजूला, आता चर्चा सरकार कुणाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 16:40 IST

मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १८ दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. भाजपला १०५ तर शिवसेनाला ५६ जागांवर विजय मिळाल्याने पुन्हा युतीचेचं सरकार येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे होते, तर भाजप ते देण्यासाठी तयर नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाचा ही चर्चा गेल्या काही दिवस पाहायला मिळत होती. मात्र आता राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, सरकार कुणाची होणार अशी चर्चा सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या बहुमतामुळे पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार येणार असल्याचे निश्चित समजले जात होते. मात्र सत्तेत ५०-५० च्या फॉर्म्युलानुसारच सत्तास्थापना होईल व मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार ह्या अटीवर सेना अडून बसली होती. तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा मुख्यमंत्री आमचाच होणार असे दावा केला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती.

त्यातच भाजपने माघार घेतल्याने राज्यपाल यांनी शिवसेनेला सत्तेस्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सुद्धा दिलेल्या वेळात इतर पक्षाचा पाठींबा असल्याचे पत्र सादर करू न शकल्याने,राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे. मात्र शिवसेनच्या पाठींब्याशिवाय राष्ट्रवादी सुद्धा सत्तास्थापना करू शकत नाही.

तर शिवसेना मुख्यमंत्री पदावर अजूनही अडलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसचे वरिष्ठ नेते याला तयार होतील का ? अशी चर्चा आहे. त्यांनतरचं सत्तास्थापनेचा तिढा सुटणार आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवडे राज्यात मुख्यमंत्री कुणाचा होणार याची चर्चा सुरु असताना आता सरकार कुणाचे येणार अशी चर्चा पाहायला मिळत आहे.