शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पद राहिले बाजूला, आता चर्चा सरकार कुणाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 16:40 IST

मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १८ दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. भाजपला १०५ तर शिवसेनाला ५६ जागांवर विजय मिळाल्याने पुन्हा युतीचेचं सरकार येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे होते, तर भाजप ते देण्यासाठी तयर नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाचा ही चर्चा गेल्या काही दिवस पाहायला मिळत होती. मात्र आता राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, सरकार कुणाची होणार अशी चर्चा सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या बहुमतामुळे पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार येणार असल्याचे निश्चित समजले जात होते. मात्र सत्तेत ५०-५० च्या फॉर्म्युलानुसारच सत्तास्थापना होईल व मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार ह्या अटीवर सेना अडून बसली होती. तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा मुख्यमंत्री आमचाच होणार असे दावा केला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती.

त्यातच भाजपने माघार घेतल्याने राज्यपाल यांनी शिवसेनेला सत्तेस्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सुद्धा दिलेल्या वेळात इतर पक्षाचा पाठींबा असल्याचे पत्र सादर करू न शकल्याने,राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे. मात्र शिवसेनच्या पाठींब्याशिवाय राष्ट्रवादी सुद्धा सत्तास्थापना करू शकत नाही.

तर शिवसेना मुख्यमंत्री पदावर अजूनही अडलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसचे वरिष्ठ नेते याला तयार होतील का ? अशी चर्चा आहे. त्यांनतरचं सत्तास्थापनेचा तिढा सुटणार आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवडे राज्यात मुख्यमंत्री कुणाचा होणार याची चर्चा सुरु असताना आता सरकार कुणाचे येणार अशी चर्चा पाहायला मिळत आहे.