शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

वृद्धाने केले संपूर्ण गाव व्यसनमुक्त!

By admin | Updated: June 13, 2015 01:56 IST

व्यसनापायी संपूर्ण गावाचीच राखरांगोळी होताना पाहून खिन्न झालेल्या वृद्धाने पुढाकार घेऊन गावातील तरूणांच्या सहकार्याने संपूर्ण गावच व्यसनमुक्त करून वेगळा

प्रताप नलावडे, बीडव्यसनापायी संपूर्ण गावाचीच राखरांगोळी होताना पाहून खिन्न झालेल्या वृद्धाने पुढाकार घेऊन गावातील तरूणांच्या सहकार्याने संपूर्ण गावच व्यसनमुक्त करून वेगळा आदर्श घालून दिला आहे. व्यसनमुक्तीसाठी गावातील प्रत्येकाला शपथ देतानाच कोणी व्यसन केले तर त्याला मोठा दंड आकारण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. १२ दिवसांपासून या गावात दारू, विडी, सिगारेट, तंबाखू आणि गुटखा विक्री बंद करण्यात आली आहे. बीड जिल्'ातील शिरूर कासार तालुक्यातील बरगवाडी हे अडीच हजार लोकसंख्येचे डोंगरकुशीतील गाव. गावातील ९० टक्के लोक ऊस तोडणी कामगार आणि मोलमजुरी करणारे. गावातील ७० ते ८० टक्के लोक दारू , तंबाखू, आणि गुटख्याच्या आहारी गेलेली. गावात सतत भांडणे, मारामारी आणि कटकटी. व्यसनाने इतका विळखा घातलेला की सकाळपासूनच अनेकजण दारूच्या नशेत झिंगलेले असायचे. गावात एखादे लग्न दुपारी १२ च्या मुहुर्तावर असले तर ते लग्न सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान लागायचे. व्यसनामुळे गावाची होणारी दुर्दशा पाहून सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गुरसाळे यांनी पुढाकार घेतला आणि गावातील संभाजी जाधवल दीपक मुळीक, अशोक मुळीक, संतोष बर्ग, सोनाजी तुपे आणि उपसरपंच अंकुश यादव यांच्याशी गावालाच व्यसनमुक्त करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली. यासाठी संभाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात व्यसनमुक्तीवर एक व्याख्यान ठेवण्यात आले. सगळा गाव यासाठी जमा झाला होता. महिलांचीही उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशी महिलांनी गुरसाळे यांना गावात व्यसनमुक्ती झाली पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी करण्याचा आग्रह धरला. गावात बैठका सुरू झाल्या. सुरूवातीला फारसे लोक येत नसत. परंतु हळूहळू लोक जमू लागले आणि ३१ मे चा मुहुर्त गाठून संपूर्ण गावाने व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचा निर्णय झाला. गुरसाळे यांनी प्रत्येकाला व्यसनमुक्तीची शपथ दिली. अगदी मुलाच्या वयाच्या तरूणाचेही गुरसाळे पाय धरताना पाहून अनेकजण खजिल झाले. याचवेळी गावात दारू विक्री करणाऱ्या चौघांनी गुरसाळे यांचे पाय धरले आणि यापुढे गावात आम्ही दारू, गुटखा, तंबाखू असे काहीच विकणार नाही. तसे आढळून आले तर आम्हाला दंड करा, असा प्रस्ताव ठेवला. गावात अशी विक्री करणाऱ्यासाठी पन्नास हजार रूपये दंड तर व्यसन करणाऱ्याला पाच हजार रूपये दंडाची रक्कम गावकऱ्यांनी निश्चित केली. या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समितीही तयार करण्यात आली.