शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आमदारकी सोडून नारायण राणेंसोबत भाजपात जाणार कोण?

By अतुल कुलकर्णी | Updated: August 20, 2017 00:17 IST

मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावरुन दोन्ही पक्षांत चर्चेला ऊत आलेला असताना त्यांच्यासोबत किती आमदार येणार याची आधी खात्री करा, अशी अट भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घातल्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश बिकट बनला आहे. जे आमदार राणेंसोबत जातील, त्यांना सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. अन्यथा पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदारकी जाईल, ...

मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावरुन दोन्ही पक्षांत चर्चेला ऊत आलेला असताना त्यांच्यासोबत किती आमदार येणार याची आधी खात्री करा, अशी अट भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घातल्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश बिकट बनला आहे. जे आमदार राणेंसोबत जातील, त्यांना सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. अन्यथा पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदारकी जाईल, असा त्याग कोण करणार? हाही प्रश्न आहेच.अमित शहा शनिवारी भोपाळमध्ये होते. त्यांनी तेथून महाराष्टÑातील भाजपाच्या नेत्याला फोन केला आणि राणेंसोबत किती आमदार येतील, याची खात्री करा. मग पुढे ठरवू, असे सांगितले. तो निरोप राणेंना पोहोचवला गेला. त्यामुळे आमदारकीवर पाणी सोडून दोन अडीच वर्षांसाठी निवडणुकीला पुन्हा सामोरे जायची हिंमत किती जण दाखवतील, याची चाचपणी सुरू आहे.राणे काँग्रेसमध्ये नेते आहेत, त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नमती भूमिका घेतली. पक्षांतरबंदी कायद्यान्वये आमदारकी जात असल्यानेच अशोक चव्हाण यांनी ‘कारवाईचा प्रश्नच येत नाही’, अशी भूमिका घेतली आहे. शिवाय पक्षाचा एक आमदार कमी झाला, तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडून जाऊ शकते. ते गमावण्याची काँग्रेसची इच्छा नाही.राणेंसोबत नितेश राणे व कालिदास कोळंबकर यांची नावे चर्चेत आहेत पण कोळंबकर यांना राणेंचा शिक्का लावून भाजपात जायचे नाही, असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात. जे कोणी पक्ष सोडून भाजपात जातील, त्यांच्याविरुद्ध पोटनिवडणुकीत मतभेद विसरून एकच उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना यांनी घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांचे यावर एकमत आहे.काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, भाजपाच्या दारात राणेंसारखा माजी मुख्यमंत्री उभा आहे आणि तीन महिने भाजपा दार उघडत नाही हे अपमानास्पद आहे. मी कोणताही निर्णय घेतला नाही, असे राणे म्हणतात. पण काँग्रेस सोडणार नाही असे सांगतही नाहीत. त्यांनीच स्वत:भोवती संशय निर्माण केल्याचे, हा नेता म्हणाला.कदाचित राणे यांना आपल्या विरुद्धच्या चौकशा नको असाव्यात, असा चिमटाही त्याने काढला. अन्य पक्षातून भाजपामध्ये येणाºयांना मंत्री करत असाल तर मग आम्ही सतरंज्याच उचलायच्या का?, असा सूर भाजपामध्ये निघत आहे. पक्षाची स्थिती चांगली असताना एका नेत्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाºयांची नाराजी घ्यायची का?, अशी चर्चा भाजपाच्या गोटात आहे.राणे म्हणतात...मी शनिवारी सिंधुदुर्गात असताना, दिल्लीला गेल्याच्या बातम्या आल्या. आज मी दिवसभर आॅफिसात असताना बैठका घेत आहे, अशा बातम्या येत आहेत. ज्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांना बोलावणार असे सांगितले जाते. त्याचे कामच पूर्ण झालेले नाही. त्याला महिना लागेल. त्यानंतर उद्घाटनाची तारीख ठरेल. मी कोणाला बोललो नाही, भेटलो नाही तरीही तुम्हीच बातम्या चालवत आहात, असे राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे