शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बंद ‘घड्याळा’ला चावी कोण देणार?

By admin | Updated: October 21, 2014 00:52 IST

गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीने मोठमोठे बिल्डर, व्यावसायिक, कंत्राटदार पक्षाशी जोडले. पण जनसमर्थन असलेले दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते पक्षाशी जोडले नाहीत. तसा पुढाकारही कुणी घेताना दिसले नाही.

नेते मतदारसंघात खूश : जनसमर्थन असलेले कार्यकर्ते दूरच नागपूर : गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीने मोठमोठे बिल्डर, व्यावसायिक, कंत्राटदार पक्षाशी जोडले. पण जनसमर्थन असलेले दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते पक्षाशी जोडले नाहीत. तसा पुढाकारही कुणी घेताना दिसले नाही. त्यामुळे पक्षात गर्दी वाढली, पण पक्षासाठी मतांची गर्दी वाढली नाही. जे ‘ताकद’वर होते, मागे-पुढे करणारे होते त्यांनाच पुण्या-मुंबईतील नेत्यांचे अधिक पाठबळ मिळाले. पण सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यात नेते कमी पडले. मग पक्ष वाढणार कसा? जेव्हा राजकीय लढाई लढायची असते तेव्हा कार्यकर्तेच कामी येतात. हितसंबंधापोटी पक्षात घुसखोरी करणारी माणसे अशा लढाईच्या वेळीच बिळात घुसतात. तसे झालेही. दोन माजी मंत्र्यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या उर्वरित उमेदवारांना मिळालेली मते पाहिली तर असा काही पक्ष नागपुरात आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आता या बंद पडलेल्या ‘घड्याळा’ला वेळीच चावी देण्याची गरज आहे. त्यासाठी नेत्यांनी गटबाजी दूर सारून पक्षाचे काम करणाऱ्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे नेते येऊन-जाऊन ‘फिफ्टी-फिफ्टी’ची भाषा करायचे. शहर जिल्ह्यात आपली ताकद वाढली आहे, असा विश्वास नेत्यांना द्यायचे. नेत्यांनीही त्यावर विश्वास ठेवला. काँग्रेसशी आघाडी तोडत प्रत्येकाला ताकद दाखविण्याची संधी दिली. पण नागपुरात या संधीने अनेकांचे पितळ उघडे पाडले. आपल्या पक्षाची किती ताकद आहे, हे स्थानिक नेत्यांना चांगलेच ठाऊक होते. पण कुणीच वास्तवाचा विचार केला नाही. आता विधानसभा निवडणुकीने उपराजधानीत राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती पोलखोल केली आहे. नागपूर शहरात दिग्गज नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व केले. पण खऱ्या अर्थाने पक्ष सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणे त्यांना जमले नाही. पक्षाचा बिल्ला लावायचा अन् राजकीय तडजोडी करायच्या, यामुळे पक्ष जनसामान्यांत रुजला नाही. आधीच छोटेखानी संघटन अन् त्यातही सतराशेसाठ भानगडी, हेवेदावे. ही सोंगे पाहून अनेकांनी पक्षाचा मार्ग सोडला. नागपूर ग्रामीणमधील राष्ट्रवादी अनिल देशमुख व रमेश बंग या दोन माजी मंत्र्यांच्या गटात विभागली आहे. तर शहर राष्ट्रवादी अजय पाटील व पाटील विरोधक अशा दोन गटात वाटल्या गेली आहे. विशेष म्हणजे या वाटणीवरही देशमुख-बंग गटबाजीचीच छाया आहे. ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. एखाद्या शहर अध्यक्षाला करू द्या मुक्तपणे काम, घेऊ द्या निर्णय, अशी ठोस भूमिका कुणीच घेताना दिसले नाही. जिल्हा परिषद, महापालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. मात्र, या निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाहिजे तसे बळ पक्षाकडून मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व महापालिकेतही राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले. स्थानिक पातळीवर सक्षम कार्यकर्तेच नसतील तर पक्षाची वाढ होणार तरी कशी? नेते एवढ्यावर थांबले नाही. जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याचा पुण्यातून आदेश आला आणि नेत्यांनी होकारार्थी मान डोलावली. अनिल देशमुख, रमेश बंग यापैकी कुणीही या निर्णयाला उघड विरोध केला नाही. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला एखाद दुसरे पद मिळाले, पण भाजपने अध्यक्षपद स्वत:कडे घेऊन जिल्ह्याचा कारभार चालविला. गावोगावच्या भाजप कार्यकर्त्याला पाठबळ दिले आणि त्याच कार्यकर्त्यांच्या हातून या नेत्यांनी स्वत:चा पराभव करून घेतला. गेली २० वर्षे अनिल देशमुख यांची काटोल मतदारसंघावर पकड होती. या मतदारसंघातील सर्व राजकीय वारे अनिलबाबू म्हणतील त्या दिशेने वाहत होते. कुणाच्या कामात काडी करायची नाही, कुणाशी वैर घ्यायचे नाही, असा त्यांचा स्वभाव. त्यामुळे मतदारसंघात सगळीकडे गोडीगुलाबीचे वातावरण राहिले. पण यामुळे पक्ष वाढला नाही. पक्षवाढीसाठी बऱ्याचदा खंबीर भूमिका घ्यावी लागते. दुसऱ्या पक्षाच्या दोन-चार कार्यकर्त्यांशी वैर घ्यावे लागते. पण अनिलबाबूत्या भानगडीत पडले नाही. एक व्यक्ती म्हणून हे त्यांनी चांगलेच केले; पण पक्षाचा नेता म्हणून त्यांची हीच कृती पक्षवाढीसाठी अडचणीची ठरली. गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रमेश बंगदेखील मतदारसंघाबाहेर फारसे पडले नाही. हिंगण्यातील कार्यकर्ता सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. पण या प्रयत्नात मतदारसंघाबाहेरील त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले. यामुळे काटोल अन् हिंगण्याबाहेरचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोरका झाल्याचे चित्र होते. घड्याळीची टीक टीक सुरू ठेवायची असेल तर यापुढे तरी जनाधार असलेल्यांना पक्षाशी जोडावे लागेल. त्यांची चार कामे करून द्यावी लागतील. नाहीतर आज हाती आलेला भोपळा पुढेही कायम राहील, यात शंका नाही. (प्रतिनिधी)