शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नाट्य परिषद अध्यक्षपदाचा ‘प्रसाद’ कुणाला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:44 IST

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेण्याचे सूतोवाच, नाट्य परिषदेचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी केले आहे. त्यानुसार, या बैठकीत नव्या कार्यकारिणीविषयी खलबते होतील. एकूण ६० सदस्यांच्या नियामक मंडळातून १९ जणांची कार्यकारिणी निर्माण केली जाईल. एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक प्रमुख कार्यवाह, तीन सहकार्यवाह, एक खजिनदार आणि अकरा सदस्य असे या कार्यकारिणीचे स्वरूप असेल. या कार्यकारिणीवर वर्चस्व ठेवण्यासाठी नियामक मंडळाच्या ३१ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. हा आकडा गाठण्यासाठी आता दोन्ही पॅनल्सनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

- राज चिंचणकरअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि यात कुणाचे पारडे जड, यावरचा पडदाही दूर झाला. या निवडणुकीत मुंबईत चौरंगी लढतीचे चित्र अपेक्षित असताना, खरा सामना ‘आपलं पॅनल’ आणि ‘मोहन जोशी पॅनल’ यांच्यातच रंगला. या दोन्ही पॅनल्सनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निकालावर मुंबई शहर व उपनगरात ‘आपलं पॅनल’चा वरचष्मा दिसून आला, परंतु खरी लढाई पुढेच आहे. आतापर्यंत या निवडणूक नाट्याची लेखनप्रक्रिया पार पडली असली, तरी प्रत्यक्षात रंगमंचावर प्रमुख भूमिका कोण साकारणार हे निश्चित व्हायचे आहे. मुंबईत जरी ‘आपलं पॅनल’ जिंकल्याचे चित्र असले, तरी उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेल्या अधिकाधिक उमेदवारांचा पाठिंबा ज्यांना मिळेल, त्यावरच नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदाचा ‘प्रसाद’ कुणाच्या ओंजळीत पडणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.मुंबईतील १६ जागांपैकी ११ जागा ‘आपलं पॅनल’ने खिशात घातल्या आहेत, तर ‘मोहन जोशी पॅनल’ला ५ जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहन जोशी यांचा स्वत:चा अर्ज निवडणूक प्रक्रियेतून बाद झाल्याने त्यांना ही निवडणूक लढविता आली नाही, परंतु तरीही त्यांच्या सहकाºयांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवित, त्यांच्याच नावाने पॅनल बनवून ही निवडणूक लढविली. मुंबईत या पॅनलला माजी मारता आली नसली, तरी महाराष्ट्रातील बिनविरोध जिंकून आलेल्या काही उमेदवारांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे ‘मोहन जोशी पॅनल’कडून सांगण्यात येत आहे. आता जिंकून आलेले काही उमेदवारही त्यांच्या पाठीशी असल्याचे या पॅनलचा दावा आहे.यातील अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीला उभे न राहतादेखील मोहन जोशी यांचा अध्यक्षपदावरचा दावा अजून निकालात निघालेला नाही. ‘माझ्या सहकाºयांनी गळ घातली, तर मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारीन,’ असे मोहन जोशी यांनी निवडणुकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्याचा सूचक अर्थ आता अनेकांना समजून चुकला आहे. अशा प्रकारे अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठीची तरतूद असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे भविष्यात मोहन जोशी यांच्या हाती अध्यक्षपदाचा ‘प्रसाद’ पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.‘आपलं पॅनल’ ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढले, त्या प्रसाद कांबळी यांनी मुंबई तर स्वत:च्या ताब्यात घेतली आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळविण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. अर्थात, त्यांच्या पॅनलमध्ये नाट्यसृष्टीत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले अनुभवी रंगकर्मी असल्याने, त्यांनी त्यांच्या योग्य त्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. या पॅनलकडून प्रसाद कांबळी हेच अध्यक्षपदाचे दावेदार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.‘आपलं पॅनल’मध्ये अधिकाधिक चमकते तारे असले, तरी ‘मोहन जोशी पॅनल’मध्ये तसा चेहरा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. एकूणच निवडणुकीच्या प्रक्रियेत मोहन जोशी रिंगणात नसल्याने, ‘मोहन जोशी पॅनल’चा अध्यक्षपदाचा दावेदार म्हणून दीपक करंजीकर यांच्या नावाची निवडणुकीपूर्वी चर्चा होती. मात्र, दीपक करंजीकर यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने, त्यांचे नाव या शर्यतीतून बाद झाल्याचे बोलले जात आहे. निवडणूक न लढवताही अध्यक्षपदावर दावा सांगता येतो, हे स्पष्ट झाल्यावर, स्वत: मोहन जोशी हेच पुन्हा एकदा या पॅनलच्या अध्यक्षपदाचे दावेदार बनले आहेत. साहजिकच, सध्या नाट्य परिषदेच्या आखाड्यात ‘कुणी प्रसाद घ्या, कुणी मोहन घ्या’ असे नाट्य रंगले असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे नाट्य विंगेतून थेट रंगमंचावर येणार आहे.

टॅग्स :entertainmentकरमणूकmarathiमराठी