शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू ?, 12 जिल्ह्यांना नाही सरकारमध्ये प्रतिनिधित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 06:36 IST

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केल्याने, आता कोणाला घरी बसावे लागणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केल्याने, आता कोणाला घरी बसावे लागणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात फेरबदलाची शक्यता आहे.विभागीय संतुलन पाहता, मुख्यमंत्री (नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन), वित्तमंत्री, सामाजिक न्याय, कृषी, ऊर्जा, उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती विदर्भाकडे आहेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार व अन्न आणि नागरीपुरवठा सोडले, तर महत्त्वाची खाती पश्चिम महाराष्ट्राकडे नाहीत, तसेच संख्याबळही कमी आहे. हा राजकीय अनुशेष विस्तारात भरून काढला जाऊ शकतो. मराठवाड्यातील आठपैकी पाच जिल्ह्यांना प्रतिनिधित्वच नाही. हा अनुशेष सर्वाधिक आहे. एकाच वेळी विरोधी पक्ष व शिवसेनेशी सामना करीत, तिथे ताकद वाढविण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील मराठवाड्याचा टक्का वाढू शकतो. विदर्भातील एक-दोन मंत्र्यांना कामगिरीच्या आधारे वगळले जाऊ शकते. त्यात एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तसे झाल्यास विदर्भातून किमान दोन नवे चेहरे दिसू शकतील. मुंबईत विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यापैकी मेहतांवर संक्रांत येऊ शकते. मात्र, मुंबईला आणखी एक मंत्रिपद नक्की दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.पंकजा मुंडे व विद्या ठाकूर या दोनच महिला मंत्री आहेत. त्यातही ठाकूर यांना वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास नाशिक शहरातून महिला आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. या जिल्ह्यात भाजपाचा एकही मंत्री नाही.>घरी बसविणे सोपे नाहीआदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर निष्क्रियता व घोटाळ्याचे आरोप झाले. विनोद तावडे हेही काही प्रकरणात अडचणीत आले. प्रकाश मेहता, पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप झाले असले, तरी त्या सर्वांनाच घरी बसविणे सामाजिक वा इतर समीकरणांमुळे सोपे नाही. एक-दोघांना डच्चू देऊन इतरांची खाती बदलली जाऊ शकतात.>उद्धव ठाकरेंनंतर खा. पटोले राहुल गांधींनाही भेटणारभाजपाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकºयांच्या मृत्यूंची चौकशी संयुक्त संसदीय समितीने करावी, या पटोले यांच्या मागणीचे ठाकरे यांनी समर्थन केले. आपण लवकरच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. -वृत्त/२>एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाची शक्यता दिसत नाही. पुण्यातील जमीनप्रकरणी त्यांच्या चौकशीचा अहवाल अद्याप विधिमंडळात सादर होऊ शकलेला नाही. हे बघता क्लीन चिट न मिळताच ते मंत्रिमंडळात परततील, अशी चिन्हे नाहीत.>उपरेपणाची भावना दूर करणार?लोकसभा वा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१४ मध्ये अन्य पक्षांतून भाजपात आलेले जवळपास ३५ आमदार आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही मंत्रिपद नाही. त्यामुळे भाजपात येऊनही उपरेपणाची वागणूक दिली जात असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे त्यापैकी एक-दोन जणांना संधी दिली जाऊ शकते. तथापि, आघाडी सरकारमध्ये मंत्री वा आमदार म्हणून प्रतिमा डागाळली होती, अशांना स्थान दिले जाणार नाही.>यांना नाही प्रतिनिधित्वसामाजिकदृष्ट्या विचार करता, माळी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही. एकही मुस्लीम मंत्री नाही.>हे जिल्हे आहेत मंत्र्यांविनारत्नागिरी, रायगड, वाशिम, भंडारा, वर्धा, सातारा, नंदुरबार, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड या १२ जिल्ह्यांना भाजपा वा शिवसेनेने मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वच दिलेले नाही. त्यातील काही जिल्ह्यांना निश्चितपणे संधी मिळेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसे