शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या संवर्धनाची जबाबदारी कोणाची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 09:22 IST

रायगड विकास प्राधिकरणाकडून विभागाला आणखी २० कोटी दिले जाणार आहेत.

जमीर काझी, वरिष्ठ मुख्य उपसंपादक

ऐतिहासिक, पुरातन काळातील वास्तू, दुर्ग आणि इमारतींचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी असलेल्या केंद्रीय पुरातत्त्व विभागाची रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबतची उदासीनता राज्यातील लाखो शिवप्रेमींमध्ये नाराजी निर्माण करणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या गडावर समर्थपणे चालविला, त्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ११ कोटींचा निधी पाच वर्षांपूर्वी देऊनही आतापर्यंत त्यापैकी केवळ तीन कोटींचा खर्च दुरुस्ती व विकासकामावर झाला आहे. आठ कोटींचा निधी तसाच पडून आहे. त्याशिवाय रायगड विकास प्राधिकरणाकडून विभागाला आणखी २० कोटी दिले जाणार आहेत. मात्र पूर्वीचाच निधी पडून असल्याने त्याचा वापर भविष्यात कधी होईल, याची शाश्वती राज्य सरकार आणि रायगड विकास प्राधिकरणालाही देता येणार नाही.

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याच्या आणि राज्याभिषेक दिनाला यंदा ३५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने रायगड किल्ल्यावर ५ व ६ जून रोजी मोठ्या थाटात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जेमतेम दोन महिन्यांचा अवधी उरल्याने त्याच्या नियोजनाची तयारी करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे व पालकमंत्री उदय सामंत यांनी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात बैठक घेतली. त्यावेळी रायगडच्या किल्ल्याचा विकास व संवर्धनाकडे ‘आर्कियालॉजी’ विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची बाब आधोरेखित झाली.

त्याबाबत बैठकीत संभाजीराजे, सामंत यांनी जाहीरपणे त्रागा व्यक्त केला. मात्र यावेळी विभागाचे अधिकारी जणू त्याच्याशी आपले काही देणेघेणे नसल्याप्रमाणे मख्खपणे भाव करून बसून होते. राज्य सरकारकडून ३५० कोटींचा निधी सोहळ्यासाठी खर्च केला जाणार आहे. मात्र रायगड किल्ल्याचा जीर्णाेद्धार आणि त्याठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्याचे काम अद्यापही प्राथमिक स्तरावर रेंगाळले आहे. रायगड विकास प्राधिकरण नेमून ६५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १२० कोटी रुपये प्राधिकरणाला मिळालेले असून, रायगड किल्ल्याच्या परिसरातील रस्ते व गडावर सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

त्यापैकी ११ कोटी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करून पाच वर्षांचा अवधी लोटला आहे. मात्र त्यांच्या स्तरावर गडाची करावयाची डागडुजी आणि अन्य सुविधांंच्या कार्यवाहीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही निधीचा वापर करण्यामध्ये त्यांची सुस्ताई कायम आहे. उलट प्राधिकरण व राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामासाठी विभागाची ‘एनओसी’ घेताना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. त्याचा फटका रायगड किल्ल्याच्या विकासकामावर होत आहे.