शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोण करतय भाजपमधील निष्ठावंतांची कोंडी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 17:44 IST

भाजप आणि शिवसेनेत या आयारामांना मोठ्या आदराने सामावून घेतले गेले आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पक्षाकडून संधी मिळेल या आशेवर अनेक कार्यकर्ते आहेत. अशा वेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी दिल्यास, गटबाजी होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचा झंझावात आणि विरोधकांची झालेली वाताहत यामुळे अनेकांना विधानसभेत निवडून येण्याची भ्रांत आहे. ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे, त्यांना मंत्रीपदाची ओढ आहे. तर काही नेत्यांना निर्माण केलेले साम्राज्य टिकून ठेवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षांतरावर जोर वाढला आहे. मात्र या पक्षांतरातून भाजप आणि शिवसेना यांच्यातील गटबाजी वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेत या आयारामांना मोठ्या आदराने सामावून घेतले गेले आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पक्षाकडून संधी मिळेल या आशेवर अनेक कार्यकर्ते आहेत. अशा वेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी दिल्यास, गटबाजी होण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही जागांवर भाजपने उमेदवार बदलले. त्यावेळी भाजपने नाराज नेत्यांची समजूत काढली तर अनेकांची बंडखोरी मोडीत काढली. विधानसभा पातळीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. त्यामुळे बंडखोरीही मोठ्या प्रमाणात होणार आहे. कदाचित ही बंडखोरी मोडीत काढण्यात भाजपला यशही येईल. परंतु, पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान वाटते तेवढे सोपे नाही.

पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या विजयासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना धडपड करावी लागणार आहे. निवडून आल्यानंतर या आयारामांचे मतदार संघात वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे या आयारामांना निवडून का आणायच, असा काहीसा प्रश्न कार्यकर्त्यांना पडू शकतो. हे रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी गटबाजी केल्यास, त्याचा फटका सहाजिकच पक्षाला बसणार आहे. त्यामुळे आयारामांची आणि पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची घडी भाजपला बसवावी लागणार आहे. अन्यथा आवक वाढीचा परिणाम गटबाजी वधारण्यावर होणार हे नक्की.