शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

द्रुतगती महामार्गाची श्वेतपत्रिका काढणार

By admin | Updated: June 29, 2016 00:50 IST

: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार करताना केलेली रचनाच चुकलेली असून, इंडियन रोड काँग्रेसने घालून दिलेले कोणतेही निकष काम करताना पाळण्यात आलेले नाहीत.

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार करताना केलेली रचनाच चुकलेली असून, इंडियन रोड काँग्रेसने घालून दिलेले कोणतेही निकष काम करताना पाळण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. अपघात रोखण्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी संपूर्ण रस्त्याचे तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण करून या रस्त्याची श्वेतपत्रिका राज्य शासनाला सादर केली जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी दिली. देशात मोठमोठे इंजिनिअर असतानाही कोणत्याही शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा वापर न करता तयार करण्यात आलेला हा रस्ता म्हणजे एक चेष्टाच आहे, अशी टीका करून अपघात रोखण्यासाठी लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात या महामार्गावर कुलकर्णी यांच्या गाडीला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे चालक नीरजसिंग यांच्या नावाने नीरज लाईफलाईन फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, नीरज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शरद हर्डीकर, शिरीष कुलकर्णी, अमित कुलकर्णी, विजय जगताप या वेळी उपस्थित होते. शिरोळे म्हणाले, ‘‘अपघात रोखण्यासाठी मोटार वाहन कायद्यात अनेक सुधारणा सुचविण्यात आल्या असून, हा सुधारित कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. याशिवाय, रस्त्यांच्या देखभालीसाठी तसेच रस्ते अपघातमुक्त करण्यासाठीही केंद्र शासनाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.’’ झगडे म्हणाले, ‘‘अपघातांची संख्या रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्या, तरी प्रामुख्याने अपघात होणारच नाहीत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची नियमित तापसणी यांसह वाहनचालकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. रस्ते रचनेत मूलभूत बदल करण्याची गरज निर्माण झाली असून, रस्त्यांच्या दुरवस्थेची आणि अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. ’’राज्यमंत्री शिवतारे यांनी राज्य शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच, यापुढे सुधारणांच्या उपाययोजना करण्याची खबरदारी घेण्यात येईल, असे सांगितले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. कोणताही रस्ता करताना त्यासाठी इंडियन रोड काँग्रेसने काही नियम घालून दिलेले आहेत. दुभाजकांची असलेली रचना, सर्व्हिस लेन, साईड गार्ड, आवश्यक त्या ठिकाणी रिटेनिंग वॉल, प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर चालकांना थांबण्यासाठी जागा, महामार्गावर वाहन चालविण्यासाठी विशेष प्रशिक्षण, रस्त्यांच्या कामाचा दर्जा असे कोणतेही निकष पाळलेले नाहीत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने महामार्गावरील अपघातांची जबाबदारी कोणावरही निश्चित नाही. त्यामुळेच या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून अपघात रोखण्यासाठीची लढाई सुरू केली जाणार आहे. - डी. एस. कुलकर्णी, व्यावसायिक