शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

किसान जनता अपघात विमा योजना ठरतेय पांढरा हत्ती!

By admin | Updated: July 14, 2014 23:54 IST

पाच वर्षात ४,८0१ प्रस्ताव नामंजूर

वाशिम: अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्य़ात आलेली शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संकटकाळी शेतकर्‍यांना हुलकावणीच देत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. वर्ष २00९ ते २0१३ या कालावधीत, राज्यातील १५,१0५ पैकी केवळ १0,३0४ प्रस्ताव मंजूर झाल्याने, उर्वरित ४,८0१ शेतकरी कुटुंबांना विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी, राज्य शासनाने २00५-0६ मध्ये राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एकूण १३ प्रकारच्या अपघातांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. पुढे या योजनेचे ह्यकिसान जनता अपघात विमा योजनाह्ण असे नामकरण करण्य़ात आले. योजनेचे नाव बदलले असले तरी, त्यामधील गुंता मात्र कायम असल्याचा आरोप, मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबियांकडून होत आहे. या विमा योजनेच्या हप्त्यांचा भार राज्य शासन उचलत आहे; मात्र विम्यापासून वंचित राहणार्‍या शेतकरी कुटुंबियांचा आकडा ह्यथांबता थांबेनाह्ण असेच वास्तव आहे. शासनाने २00९ मध्ये या विम्यापोटी ९ कोटी ५३ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले होते. त्या वर्षात एकूण २,७३९ प्रस्ताव भरपाईसाठी दाखल झाले होते. त्यापैकी १,७२३ मंजूर झाले, तर उर्वरीत प्रस्ताव फेटाळल्या गेले. वर्ष २0१३ मध्ये २,९५३ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी केवळ १,८५१ प्रस्ताव मंजूर, तर उर्वरीत १,१0२ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत.