शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

किसान जनता अपघात विमा योजना ठरतेय पांढरा हत्ती!

By admin | Updated: July 14, 2014 23:54 IST

पाच वर्षात ४,८0१ प्रस्ताव नामंजूर

वाशिम: अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्य़ात आलेली शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संकटकाळी शेतकर्‍यांना हुलकावणीच देत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. वर्ष २00९ ते २0१३ या कालावधीत, राज्यातील १५,१0५ पैकी केवळ १0,३0४ प्रस्ताव मंजूर झाल्याने, उर्वरित ४,८0१ शेतकरी कुटुंबांना विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी, राज्य शासनाने २00५-0६ मध्ये राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एकूण १३ प्रकारच्या अपघातांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. पुढे या योजनेचे ह्यकिसान जनता अपघात विमा योजनाह्ण असे नामकरण करण्य़ात आले. योजनेचे नाव बदलले असले तरी, त्यामधील गुंता मात्र कायम असल्याचा आरोप, मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबियांकडून होत आहे. या विमा योजनेच्या हप्त्यांचा भार राज्य शासन उचलत आहे; मात्र विम्यापासून वंचित राहणार्‍या शेतकरी कुटुंबियांचा आकडा ह्यथांबता थांबेनाह्ण असेच वास्तव आहे. शासनाने २00९ मध्ये या विम्यापोटी ९ कोटी ५३ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले होते. त्या वर्षात एकूण २,७३९ प्रस्ताव भरपाईसाठी दाखल झाले होते. त्यापैकी १,७२३ मंजूर झाले, तर उर्वरीत प्रस्ताव फेटाळल्या गेले. वर्ष २0१३ मध्ये २,९५३ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी केवळ १,८५१ प्रस्ताव मंजूर, तर उर्वरीत १,१0२ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत.