शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
5
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
6
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
7
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
8
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
9
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
10
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
11
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
12
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
13
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
14
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
15
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
16
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
17
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
18
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
19
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
20
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!

जे योगींनी केले, ते देवेंद्र कधी करणार?

By admin | Updated: April 6, 2017 05:08 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याचे सचिव उत्तरप्रदेशच्या अर्थसचिवांशी बोलतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणे

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याचे सचिव उत्तरप्रदेशच्या अर्थसचिवांशी बोलतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणे, ही आजवर शेकडो पथदर्शी योजना राबविणाऱ्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. पण तरीही जे योगींनी केले, ते देवेंद्रना कधी जमणार, असा सवाल करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या कामकाज बुधवारी सुरू होताच कर्जमाफीच्या मागणीवरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणिं काँग्रेसचे नारायण राणे यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडत शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. आजवर प्रशासन आणि राजकारभाराबाबत महाराष्ट्राने जगाला मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्राने योजना आणल्या आणि देशाने त्या स्वीकारल्या असाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. स्थानिक स्वराज संस्था, रोजगार हमी योजना, महिला आरक्षण असे शेकडो पथदर्शी निर्णय या महाराष्ट्राने घेतले. त्याच महाराष्ट्रावर आता कर्जमाफीसाठी उत्तरप्रदेशचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे. तुमच्या नाकर्तेपणाचे यापेक्षा मोठे उदाहरण सापडणार नाही, अशा शब्दात तटकरे यांनी टीका केली. तर गेल्या अडीच वर्षात राज्यात ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा का, असा सवाल राणे यांनी केला. कर्जमाफीबाबत एकाच पक्षाची दोन राज्यात वेगवेगळी भूमिका कशी असू शकते, असा सवाल करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. चालू अधिवेशनाच्या काळात सुमारे शंभर शेतक-यांनी आत्महत्या केल्यातरी सरकार गंभीर नाही. आमच्या संघर्षयात्रेची खिल्ली उडवतात, पण तुमच्या संघर्षयात्रेत गाड्यांना किती टनाचे एसी लागले होते आणि कोण कुठल्या सप्ततारांकित हॉटेलात उतरले होते, हे सारे आम्हाला माहीत आहे. आमची मागणी तुम्हाला राजकारण वाटते. पण, राज्यात आता कुठल्याच निवडणुका नाहीत तरीही तुम्हाला कर्जमाफी द्यायची नाही. यावरुन सरकार शेतकऱ्यांबाबत किती असंवेदनशील आहे हे सिद्ध होते, अशी टीका मुंडे यांनी केली. कर्जमाफीशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेत विरोधी बाकांवरील सदस्यांनी घोषणाबाजी केली. या गदारोळात सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार बांधील आहे. मात्र शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार नाही. यासाठी त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर द्यावा लागेल. कर्जमाफी कशापद्धतीने करावी, याबाबत सरकार अभ्यास करीत आहे, असे सांगितले. गदारोळात दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. (प्रतिनिधी)> वचनपूर्ती करा-सेनेची मागणीउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतक-यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. असा निर्णय घ्यायला आपल्याला अडीच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कशासाठी लागतोय, असा सवाल करत शिवसेना सदस्या नीलम गो-हे यांनीही शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. ‘काही घोषणा चुनावी जुमले नसतात, तर ती वचनपूर्ती असते’ असा चिमटाही काढला.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या कामकाजाला बुधवारी सुरुवात होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरुन विरोधकांनी ठिय्या आंदोलन केले.