शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

कुठे उष्णतेची लाट, तर कुठे पावसाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:56 IST

वातावरणात उल्लेखनीय बदल : मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर

मुंबई : राज्यासह देशाच्या वातावरणात मान्सूनपूर्व बदल नोंदविण्यात येत आहेत. विदर्भासह मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच, उत्तरेकडील काही राज्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशावर स्थिर असून, यापुढेही त्यात विशेष बदल होणार नाही. २२ तसेच २३ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २७ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, २२ मे रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. २३ मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. २४ आणि २५ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दुसरीकडे स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची, तर पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान व पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये धुळीच्या वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य भारतात, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हवामान कोरडे राहील. गुजरात, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील. बिहार आणि झारखंडमध्ये पाऊस पडेल. तेलंगणात उष्णतेची लाट येईल.

रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाऊस पडेल. २२ आणि २३ मे रोजी पंजाब आणि हरयाणामध्ये बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील. वारे वेगाने वाहतील. वाढलेल्या तापमान आणि उष्णतेमुळे काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.राज्यातील शहरांचेमंगळवारचे कमाल तापमाननांदेड ४४.५, सांगली ४१.४, मालेगाव ४३.८, पुणे ४१.१, सोलापूर ४५, सातारा ४१.९, सांताक्रुझ ३४, नाशिक ४०.१, चिखलठाणा ४२.६, परभणी ४५.६(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)