शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बेपत्ता मुले अखेर जातात तरी कुठे?

By admin | Updated: July 27, 2014 01:30 IST

कल्याण(मुंबई)मधील बेपत्ता तरुण इराकमध्ये दहशतवादी प्रशिक्षणासाठी गेल्याचे वृत्त आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे देशभरातील बेपत्ता मुलांचा-तरुणांचा प्रश्न कधी नव्हे तेवढ्या

तपास यंत्रणांपुढे प्रश्न : कसून शोध घेण्याचे आदेश नरेश डोंगरे - नागपूर कल्याण(मुंबई)मधील बेपत्ता तरुण इराकमध्ये दहशतवादी प्रशिक्षणासाठी गेल्याचे वृत्त आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे देशभरातील बेपत्ता मुलांचा-तरुणांचा प्रश्न कधी नव्हे तेवढ्या गांभीर्याने तपास यंत्रणांमध्ये चर्चेला आला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘बेपत्ता मुले गेलेत तरी कुठे, त्यांचा कसून शोध घ्या. तुमच्या भागातील किशोरवयीन मुलांची डोकी भडकविण्याचे कारस्थान सुरू आहे काय, त्याचीही गांभीर्याने तपासणी करा, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून तपास यंत्रणांना मिळाले आहेत. विविध शहरातून खासकरून महानगरातून किशोरवयीन मुले, तरुण बेपत्ता होण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. एकट्या नागपुरातून २०११-१२ मध्ये १६८६ जण बेपत्ता झाले. त्यात ६३८ मुलांचा आणि तरुणांचा समावेश होता. २०१३ मध्ये १०५४ जण बेपत्ता झाले तर, जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यात ५४० जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी १५० जण १५ ते २८ वयोगटातील (किशोरवयीन मुले आणि तरुण) असल्याचे सांगितले जाते. बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असताना ते परत येण्याचे (सापडण्याचे) प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे बेपत्ता मुले-तरुण जातात तरी कुठे, असा प्रश्न आतापर्यंत सर्वसामान्यांना सतावत होता. कल्याणमधून बेपत्ता झालेले चार तरुण आयसीस (आयएसआयएस) या इराकमधील दहशतवादी संघटनेत (प्रशिक्षणासाठी) गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. अन् ‘बेपत्ता मुले अखेर जातात तरी कुठे’, असा प्रश्न तपास यंत्रणांचीही डोकेदुखी वाढवणारा ठरला. त्यामुळे आता प्रत्येकच ठिकाणच्या किशोरवयीन बालके आणि तरुणांच्या बेपत्ता होण्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्याची गरज तपास यंत्रणांना वाटत आहे. परिणामी बेपत्ता होण्यापूर्वी ‘तो’ कुणाच्या संपर्कात होता, बेपत्ता झाल्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागला काय, त्याचे सध्याचे वास्तव्य कुठे आहे, मुलांची डोकी भडकविण्याचे कारस्थान तर सुरू नाही ना, त्याचाही शोध घेण्याच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकासह सर्वच ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत.