शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

स्वयंचलित हवामान केंद्र गेले कुठे?, महत्त्वाची उपकरणे चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:49 IST

शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत एप्रिल महिन्यात नागपुरात पहिले स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले.

मंगेश व्यवहारे/ मुकेश कुकडे नागपूर : शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत एप्रिल महिन्यात नागपुरात पहिले स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले. पाच महिनेही पूर्ण झाले नाहीत तोच येथील उपकरण चोरीला गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या केंद्राचे उद्घाटन केले होते, हे विशेष.हवामानाचा अचूक अंदाज घेता येत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊनही शेतकºयांना शासनाकडूनही मदत मिळत नाही. या दुष्टचक्रातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी शासनाने राज्यात २०५९ व नागपूर जिल्ह्यात ६४ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले. पहिल्या केंद्राची स्थापना नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी रोडवरील डोंगरगाव येथे झाली. ३० एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन झाले होते.या केंद्राला लोकमत चमूने सोमवारी भेट दिली असता केंद्रातील सौरपॅनल तसेच हवामानातील घटकांची नोंद घेणाºया यंत्रणेची मोडतोड करून त्याची चोरी झाल्याचे आढळले. एक खांब आणि उद्घाटनाची कोनशिलाच केंद्राच्या स्थळी होते. केंद्राला चारही बाजूने लोखंडी जाळीचे कम्पाऊंड व गेट बसविले आहे. हा संपूर्ण परिसर जंगली गवत व झाडांनी व्यापला आहे. केंद्रात जायलासुद्धा सुरळीत पायवाट नाही.>स्कायमेटकडे होती जबाबदारीस्वयंचलित हवामान केंद्राच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या केंद्राची जबाबदारी ही स्कायमेट या संस्थेकडे होती. स्कायमेटच्या माध्यमातूनच ही यंत्रणा हाताळण्यात येणार होती. पहिल्या स्वयंचलित केंद्राची मोडतोड झाली असली तरी त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही स्कायमेटची आहे.ग्रा.पं.तर्फे तिथे एक लाइटही लावण्यात आला होता. परंतु यंत्रणेसोबतच लाइटही चोरून नेला आहे. याची तक्रार आम्ही पोलिसात करणार आहोत. भविष्यात महत्त्वाच्या यंत्रणेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही ठेवू.- देवेंद्र गौर, सरपंच, डोंगरगाव ग्रा.पं.